खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची सोय करून ठेवली होती.त्यामुळे बारमास शेतीला पाणी मिळायचं.त्याच कारणाने हा सर्व परिसर गर्द झाडीने भरलेला असून नारळ, पोफळ,सुपारी,पानवेली आणि इतर रानटी झाडांच्या डोंगरा वरच्या आणि उतारावरच्या जमिनीवर विखूरलेल्या झाडीने भर उन्हात सुद्धा संध्याकाळ निर्माण करण्याचं वेगळंच वातावारण निर्माण झालं होतं. तशात ते सपाटी वरचे भातशेतीचे हिरवे गार कुणगे-चौकोनी आकाराच्या जमिनी-गालिच्या सारख्या वाटतात.डोंगरच्या एका जास्त खोलगट जागेत धामापुरचं प्रसिद्ध तळं निर्माण झालं होतं.आणि त्याच तळ्याच्या आजूबाजूला लोकांची कौलारू घरं होती. मधेच एक देवीचं सुंदर मंदिर होतं.
अश्या ह्या रम्य परिसरांवर चित्रपट काढणार्यांचं लक्ष गेलं नाही तर नवल म्हणावं लागेल. चिं.त्र्य.खानोलकरांच्या चानी ह्या कादंबरी वरून “चानी” -खारीला-स्किवरल- मालवणीत चानी म्हणतात-ह्या चित्रपटाचं बाह्य चित्रीकरण इकडेच झालं असं म्हणतात.
माझी मामेबहिण वासंती उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन रहायची.त्यानंतर ती पुढे लग्न झाल्यावर आपल्या नवर्याबरोबर थोडी वर्षं इंग्लंडला जावून राहिली होती.नंतर उतार वयात ती आपल्या नवर्याबरोबर धामापुरला आपल्य वडलांच्या घरात स्थाईक झाली.मामाची एकुलती एक मुलगी असल्याने तिला ते सर्व घरदार मिळालं होतं.लहानपणापासून धामापुरातच वाढल्याने ह्या परिसराची तिला ओढ असणं स्वाभाविक होतं.तिची मुलं नातवंडं पण मुंबईला स्थाईक झाली होती.
वासंतीच्या लहानपणीचच तिच्या समोर वाढीला लागलेल्या एका पिंपळाच्या झाडावर तिचा खूप जीव होता.ते मोठं झाल्यावर त्या झाडाच्या बुंध्याखाली बसून अभ्यास करायची.मी आणि ती ह्या झाडाखाली गप्पा मारायचो.
ह्यावेळेला तिची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा बोलता बोलता ह्या झाडाचा विषय निघाला.आता ते झाडपण बरंच उंच झालं होतं.आता वासंतीचे विचार जरा फिलॉसॉफीकल झाले होते.
मला ती म्हणाली, काही लोकांना त्या पिंपळाच्या झाडाच्या आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्याला जास्त महत्व द्दावसं वाटतं पण माझा ह्यावर विश्वास नाही. मला तसं वाटत नाही.
आमच्या घराच्या पडवीत बसून तांदूळ निवडताना माझी ती मानलेली बहिण माझ्या इतकीच वृद्ध झालेली
पिंपळाचं झाड माझी करमणूक करते.
ते झाड खूप उंच आहे.जवळ जवळ चाळीस फूट उंच.आणि जवळ जवळ माझ्या इतकंच वयाने असेल.ते आता थोडं वाकलं आहे,मी पण तशीच वाकली आहे.
ते झाड अनेक पक्षांची काळजी घेतं.ते सर्व बघायला मला पण खूप आनंद होतो.त्यावर राहणारे पक्षी प्रेम करतात,भांडतात पण.आणि त्या झाडाच्या फांद्दांवर घरटी पण बांधतात.सणावारी काही देवभोळ्या बायका ह्या झाडाच्या बुंध्याची पुजा करतात.
ते झाड अजून हिरवं गार आहे.आणि बर्याच फांद्दा जुन्या आणि पिंगट रंगाच्या झाल्या आहेत.जणू माझे केस अधून मधून पांढरे असून त्यावर काळ्या केसांच मधूनच वेष्टन आहे तसंच.
आम्ही दोघी उन्हात करपतो आणि हवेत गारठतो आणि सुखाने जगण्याची धडपड करतो.एकना- एक दिवस ते पडणार आणि मातीशी एक रूप होणार. जमिनीला खत मिळणार.जसं माझं पण तसंच होणार.माझा मनाला धीर देणारा हा विचार असावा. आपली मुलं आणि नातवंड त्यांच्या आणि आपल्याच आयुष्याची साखळी करून पुढे सरसावतात.एक अदभूत शक्ति मझ्यात आणि त्या पिंपळाच्या झाडात आहे हाच विचार मला जास्तीत जास्त त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ नेतो.
चाळिस वर्षापूर्वी मी आणि माझे पति ह्या धामापुराच्या परिसरात येवून राहिलो.आमची राहती जागा त्या तळ्याच्या सभोवतालच्या उंच उंच पोफळीच्या आणि सुपारीच्या झाडांच्या गराड्यात वसली आहे.घराच्या उतरंडीवरून एकदम सपाटी दिसू लागते आणि सर्व परिसर मावळत्या सूर्याच्या केशरी किरणानी उजळून निघतो.तुझे आईवडिल इकडे एकदा येवून गेले तेव्हा त्याना हा परिसर खूपच आवडला होता.मी तशी शहरी मुलगी असल्याने मला आनंद व्हावा म्हणून कदाचीत ते मला प्रोत्साहन देत असावे.
माझी आई निर्वतल्या नंतर मी एकटी झाले आणि तिची मला जरूरी होती. मी तळ्याकाठी असलेल्या सुंदर मंदिरात जाऊन मुसमुसून रडले.देवळातल्या पुजार्याची आणि माझी तोंड ओळख होती.पण त्याने मला पाहिलं न पाहिल्या सारखं केलं.मी देवळातून त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांकडे बघून माझी मी समजूत घातली.निदान त्या क्षणाला तरी.त्या घटने नंतर मी चिखलात खणायचे पण गांडूळाना दोष देत नव्हते.माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे ना?त्या परिसरात असल्या प्रवृती पासून मी दूरच रहात होते.नव्हे तर ती आता माझी नित्याची संवयच झाली होती.दर गुरवारी मी त्या देवळात जाऊन माझा असा वेळ घालवीत होते.
एकदा मी अशीच त्या तळ्याच्या आत जाणार्या पायर्यावर पाण्यात पाय बडवून उभी होते.बारिक बारिक मासे माझ्या पायाच्या तळव्या पासून बोटांच्या टोकांपर्यंत चावा घेत असताना करमणूक करून घेत होते.पायाला हलक्याश्या गुदगुदल्या होत होत्या.त्याची मजा घेत घेत त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांचा तो उजाळलेला परिसर पाहून धुंद झाली असताना अशीच एक अनोळखी व्यक्ति त्या तळ्यावर फिरायला आली असताना माझ्याकडे बघून मला म्हणाली,
“तुम्हाला मी वरचेवर ह्या तळ्यावर येवून हे सूर्य दर्शन घेताना पाहातोय आपण हे धार्मिक दृष्टीने करता की आध्यात्माच्या?”
मी म्हणाले,
“मी हे आध्यात्माच्या दृष्टीने करते”
त्याचं कारण त्याने विचारल्यावर मी त्याला माझ्या बहिणी सारख्या वाटणार्या त्या पिंपळाच्या झाडाबद्दल सांगून म्हणाले,
” कुणी तरी मला सांगितलंय की एखादा परिसर किती सुंदर आहे ते त्या परिसरात खूप वर्ष राहून कळतं,तशी मी वरचेवर माझ्या मुलांना आणि नातवंडाना भेटायला शहरात जावून येत असते.त्यांना भेटल्यामुळे मला निराळंच समाधान वाटतं.अजूनही मी तसंच वरचेवर करीत असते,पण ह्या परिसराला मी मुकत असते. वहिवाटीत विचार करून राहणारे चांगल्या समजणार्या लोकांच्या स्वर्ग-नरकात जाण्याच्या विचारांचे विषय आता पार मी विसरून गेली आहे.त्या पिंपळाच्या झाडात आणि त्याच्यावर वास करणार्या पक्षी-प्राण्यात मला एखादी अद्भूत शक्ति दिसायला लागली आहे.छोटे छोटे गाणी गुणगुणनारे पक्षी त्या लालपोट्या सुतार पक्षाला आपल्या घरट्याच्या खूपच जवळ झाडाच्या बुंध्याला टोच मारताना पाहून त्याच्या विरूद्ध गलगलाट करताना पाहून मी विचारात पडते.मश्गूल होवून जाते.एका विचारातून दुसर्या विचारात जाण्याची क्रिया पुर्ण झाल्यासारखी वाटते.
मी त्या पिंपळाच्या झाडाला देत असलेलं महत्व पाहून इतर लोक उलट मला महत्व देण्यात धन्य वाटून घेतात.पण मला ते पटत नाही. त्यांची समजूत आहे की मला स्वर्गात एक खास जागा आहे पण मला ते काही पटत नाही.माझं पिंपळाचं झाड आणि त्या झाडावर वस्ति करणारे पक्षि-प्राणी ह्याना मी मानते.आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धतही मानते.माणूस म्हणून जितकं जगावं, वागावं तेव्हडं वागण्याचाच मी प्रयत्न करते.माझं पिंपळाचं झाड आपलं कर्तव्य करून त्या अद्भुत शक्तिच्या इच्छेनुसार जसं वागतं तसंच.
वासंतीचं हे सर्व ऐकून मी तिला म्हणालो,
“जस जसं माणसाचं वय होत जातं तस तसं ते जास्त
फिलॉसॉफीकल होतं हे तुझ्याच उदाहरणावरून दिसतं”
माझं हे ऐकून वासंती गालातल्या गालात हंसली.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, July 10, 2008
Tuesday, July 8, 2008
काय समजू तू असशी कोण
बहरले जीवन माझे तुझ्यामुळे
काय समजू तू असशी कोण
मनाच्या वाळवंटी फुलला
बगिच्या तुझ्यामुळे
काय समजू तू असशी कोण
भटकत होतो मी एकटा
कुणी मित्र ही नव्हता
सांगू कुणा मी मनातले
कुणी ऐकणारा नव्हता
ठेऊ कुणावरी मी भरवंसा
कुणी लपवीणारा नव्हता
कुठले स्वप्न मी माझे समजू
कुणा माझे प्राण समजू
कुणा माझी जान समजू
घुंघट ओढूनी तुझ्या माथ्यावरी
येई संशयाचा माझ्यावरी ताण
काय समजू तू असशी कोण
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
काय समजू तू असशी कोण
मनाच्या वाळवंटी फुलला
बगिच्या तुझ्यामुळे
काय समजू तू असशी कोण
भटकत होतो मी एकटा
कुणी मित्र ही नव्हता
सांगू कुणा मी मनातले
कुणी ऐकणारा नव्हता
ठेऊ कुणावरी मी भरवंसा
कुणी लपवीणारा नव्हता
कुठले स्वप्न मी माझे समजू
कुणा माझे प्राण समजू
कुणा माझी जान समजू
घुंघट ओढूनी तुझ्या माथ्यावरी
येई संशयाचा माझ्यावरी ताण
काय समजू तू असशी कोण
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, July 7, 2008
मरण मला पाहून हंसले
मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता
असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील
खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम
जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता
असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील
खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम
जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, July 6, 2008
अशी ही एक श्रद्धा
“मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्तिमाझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.”
मधूकर सामंतांच्या घरी एकदा रवीवारी त्यांना भेटायला आणि गप्पा गोष्टी करायला म्हणून गेलो असता,त्यांचा एक विद्दार्थी त्यांना भेटायला म्हणून आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर मी त्याला असंच कधी तरी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं.
देव,धर्म,श्रद्धा,आध्यात्म ह्या विषयावर त्याचा गाढा अभ्यास होता.त्याने त्याच्या डॉक्टरेटचा प्रबंध ह्याच विषयावर अभ्यासला होता.
“तुझा देवाच्या अस्थित्वार विश्वास आहे की नाही”
असा त्याला सरळ प्रश्न करून त्याचा विचार समजून घ्यायला मी थोडा उत्सुक्त होतो.
तो मला म्हणाला,
“माझा देवाच्या अस्थित्वावर विश्वास आहे.माझी आई मला लहान असताना त्या आसमंतातल्या अगाध शक्ति बद्दल-जी नेहमीच होती आणि नेहमीच असणार- असं वर्णन करून सांगायची त्या देवावर नव्हे.
मी चार वर्षाचा असताना माझे वडील रागाने घरातून निघून गेले त्यावेळी मला ज्याने आपल्या कवेत घेवून समजावूनसांगितलं त्या देवावर माझा विश्वास आहे.
घरात अन्नाचा कणही नसताना, पांघरायला गोधडी नसताना, आई चूल पेटवण्याच्या परिस्थितीत नसताना,
ज्याने चतकोर भाकरी दिली रहायला आसरा दिला आणि धीर दिला त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्यावेळी माझी आई पण खंगून खंगून मृत पावली,अशावेळी मी जेव्हा पोरका झालो त्यावेळी मला जवळ घेवून माझी समजूत घालून मला कानात सांगितलं “सर्व काही ठीक होणार.काळजी करू नको” ज्यावळी मला आदर दाखवून “बाळा” असं म्हटलं,त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्या देवाने त्याच्या अस्थित्वा बद्दल माझ्या अंतरात विश्वास निर्माण केला.थंडी वाऱ्या पासून माझं संरक्षण केलं,ज्याच्या आवाजाने माझ्या जीवनात आलेल्या घनघोर वादळात मी यकःश्चीत आहे असं सांगितलं जाताना,
” नाही,तसं नाही तू पण काहीतरी आहेस “
असं सांगून ज्याने मला दिलासा दिला,मला ज्याने जन्म दिला,ज्याचं नांव मी लावतो,तो मला सोडून गेल्यावर,
“तू माझाच आहेस”
असं म्हणून मला जगण्याचा दिलासा दिला.त्या देवाचं अस्थित्व मी मानतो.
एखाद्दाचे वडिल त्या मुलाचा हात हातात घेवून फिरायला जाताना पाहून मला त्यांचा हेवा वाटतो.त्या वडिल-मुलांमधल्या होणाऱ्या पक्षी,झाडं,फूलं फूलपाखारं ह्यांच्या चर्चे बद्दल किंवा कसलीच चर्चा न करता अगदी जवळून चालताना एकमेकाचा श्वासाचा भास होईल इतकं जवळून चालताना,एकमेकाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकं जवळून चालताना पाहून सुद्धा हेवा वाटतो.
मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.
मी अठरा वयाचा असताना मला आठवतं माझ्या डोळ्यात एक ही टीप न आणता अपघातात निर्वतलेल्या माझ्या वडिलांचं प्रेत पहात उभा होतो. मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.
अनेक वर्षा नंतर मी घरात टांगलेल्या वडिलांच्या तस्विरी समोर उभा राहून गेली कित्येक वर्षे त्यांच्याशी होवू घातलेला पण न झालेला संवाद करण्यासाठी आज माझ्या डोळ्यातून घळघळा वहाणारे अश्रू न रोखता जणू सांगत होतो की मी आता एक उमदा तरूण झालो असून माझ्या आयुष्यात त्यानी असायला हवं होतं ह्याची मी किती आतुरतेने इच्छा करत होतो. पण आता मला कळून चुकलं होतं की त्यांच्या गैरहजेरीची पोकळी देवाच्या अस्थित्वाच्या मानण्याने भरून निघाली होती.”
हे सर्व ऐकून मी त्याल म्हणालो,
“खरंच एखादा देवा बद्दल असा पण विचार करू शकतो.हे तुझं ऐकून त्या देवाच्याच माणसाला विचार करू देण्याच्या देणगीचं कौतुक केलं पाहिजे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
मधूकर सामंतांच्या घरी एकदा रवीवारी त्यांना भेटायला आणि गप्पा गोष्टी करायला म्हणून गेलो असता,त्यांचा एक विद्दार्थी त्यांना भेटायला म्हणून आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर मी त्याला असंच कधी तरी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं.
देव,धर्म,श्रद्धा,आध्यात्म ह्या विषयावर त्याचा गाढा अभ्यास होता.त्याने त्याच्या डॉक्टरेटचा प्रबंध ह्याच विषयावर अभ्यासला होता.
“तुझा देवाच्या अस्थित्वार विश्वास आहे की नाही”
असा त्याला सरळ प्रश्न करून त्याचा विचार समजून घ्यायला मी थोडा उत्सुक्त होतो.
तो मला म्हणाला,
“माझा देवाच्या अस्थित्वावर विश्वास आहे.माझी आई मला लहान असताना त्या आसमंतातल्या अगाध शक्ति बद्दल-जी नेहमीच होती आणि नेहमीच असणार- असं वर्णन करून सांगायची त्या देवावर नव्हे.
मी चार वर्षाचा असताना माझे वडील रागाने घरातून निघून गेले त्यावेळी मला ज्याने आपल्या कवेत घेवून समजावूनसांगितलं त्या देवावर माझा विश्वास आहे.
घरात अन्नाचा कणही नसताना, पांघरायला गोधडी नसताना, आई चूल पेटवण्याच्या परिस्थितीत नसताना,
ज्याने चतकोर भाकरी दिली रहायला आसरा दिला आणि धीर दिला त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्यावेळी माझी आई पण खंगून खंगून मृत पावली,अशावेळी मी जेव्हा पोरका झालो त्यावेळी मला जवळ घेवून माझी समजूत घालून मला कानात सांगितलं “सर्व काही ठीक होणार.काळजी करू नको” ज्यावळी मला आदर दाखवून “बाळा” असं म्हटलं,त्या देवावर माझा विश्वास आहे.
ज्या देवाने त्याच्या अस्थित्वा बद्दल माझ्या अंतरात विश्वास निर्माण केला.थंडी वाऱ्या पासून माझं संरक्षण केलं,ज्याच्या आवाजाने माझ्या जीवनात आलेल्या घनघोर वादळात मी यकःश्चीत आहे असं सांगितलं जाताना,
” नाही,तसं नाही तू पण काहीतरी आहेस “
असं सांगून ज्याने मला दिलासा दिला,मला ज्याने जन्म दिला,ज्याचं नांव मी लावतो,तो मला सोडून गेल्यावर,
“तू माझाच आहेस”
असं म्हणून मला जगण्याचा दिलासा दिला.त्या देवाचं अस्थित्व मी मानतो.
एखाद्दाचे वडिल त्या मुलाचा हात हातात घेवून फिरायला जाताना पाहून मला त्यांचा हेवा वाटतो.त्या वडिल-मुलांमधल्या होणाऱ्या पक्षी,झाडं,फूलं फूलपाखारं ह्यांच्या चर्चे बद्दल किंवा कसलीच चर्चा न करता अगदी जवळून चालताना एकमेकाचा श्वासाचा भास होईल इतकं जवळून चालताना,एकमेकाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकं जवळून चालताना पाहून सुद्धा हेवा वाटतो.
मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.
मी अठरा वयाचा असताना मला आठवतं माझ्या डोळ्यात एक ही टीप न आणता अपघातात निर्वतलेल्या माझ्या वडिलांचं प्रेत पहात उभा होतो. मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.
अनेक वर्षा नंतर मी घरात टांगलेल्या वडिलांच्या तस्विरी समोर उभा राहून गेली कित्येक वर्षे त्यांच्याशी होवू घातलेला पण न झालेला संवाद करण्यासाठी आज माझ्या डोळ्यातून घळघळा वहाणारे अश्रू न रोखता जणू सांगत होतो की मी आता एक उमदा तरूण झालो असून माझ्या आयुष्यात त्यानी असायला हवं होतं ह्याची मी किती आतुरतेने इच्छा करत होतो. पण आता मला कळून चुकलं होतं की त्यांच्या गैरहजेरीची पोकळी देवाच्या अस्थित्वाच्या मानण्याने भरून निघाली होती.”
हे सर्व ऐकून मी त्याल म्हणालो,
“खरंच एखादा देवा बद्दल असा पण विचार करू शकतो.हे तुझं ऐकून त्या देवाच्याच माणसाला विचार करू देण्याच्या देणगीचं कौतुक केलं पाहिजे”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Friday, July 4, 2008
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं
तुझ्या सारखा अन तुझ्या सारखा
हवा प्रियकर मला
तुझ्या वरती अन तुझ्या वरती
करू दे प्रीति मला
छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं
तुझेच विचार अन तुझ्याच स्मृति
असती माझ्याच त्या मिळकती
पापण्याच्या घरात अन स्वप्नाच्या दुनियेत
राहूदे सदैव मला तुझ्याच नजरेत
माझेच स्थान असे तुझ्याच हृदयात
प्रसिद्धी मी पावले तुझाच शहरात
छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
हवा प्रियकर मला
तुझ्या वरती अन तुझ्या वरती
करू दे प्रीति मला
छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं
तुझेच विचार अन तुझ्याच स्मृति
असती माझ्याच त्या मिळकती
पापण्याच्या घरात अन स्वप्नाच्या दुनियेत
राहूदे सदैव मला तुझ्याच नजरेत
माझेच स्थान असे तुझ्याच हृदयात
प्रसिद्धी मी पावले तुझाच शहरात
छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, July 2, 2008
पानी तेरा रंग कैसा?
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोधलागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हापण त्यातलाच प्रकार असावा.”
मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते”
मी म्हणालो,
” आपण अवश्य ऐकू या”
“देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
“माझा देवावर विश्वास आहे” असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की “मला वाटतं देव नाही” अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.
“माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्याश्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही.”
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, “गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही.”
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मीबरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं.”
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
” हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स.”
मी त्याला म्हणालो,
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिचतर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हापण त्यातलाच प्रकार असावा.”
मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते”
मी म्हणालो,
” आपण अवश्य ऐकू या”
“देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
“माझा देवावर विश्वास आहे” असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की “मला वाटतं देव नाही” अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.
“माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्याश्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही.”
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, “गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही.”
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मीबरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं.”
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
” हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स.”
मी त्याला म्हणालो,
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिचतर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, July 1, 2008
ही केशरी संध्याकाळ
ही केशरी संध्याकाळ
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
ते दोन दोन विहंग
उडून गगनी होती धूंद
लक्षावधी गगने येवूनी
करिती माझ्या मनी आक्रंद
सप्तरंगात मी हरवली
झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा
येवूनी बिलगे माझ्या शरिरा
रंगात मिसळूनी रंग
गगनी दिसती हे पतंग
विहार करिती एकमेका संग
ही केशरी संध्याकाळ
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
ते दोन दोन विहंग
उडून गगनी होती धूंद
लक्षावधी गगने येवूनी
करिती माझ्या मनी आक्रंद
सप्तरंगात मी हरवली
झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा
येवूनी बिलगे माझ्या शरिरा
रंगात मिसळूनी रंग
गगनी दिसती हे पतंग
विहार करिती एकमेका संग
ही केशरी संध्याकाळ
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
