Sunday, September 14, 2008

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा…..

कोकणातल्या तुळस नावांच्या एका खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळसकरची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला.
इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“काय रे बाबा! तू मला मुंबईत शिकत होतास असं कुणी तरी मागे सांगितलं होतं.मग तू मुंबईहून इकडे केव्हा आलास?”
मला रमाकांत म्हणाला,
“शिक्षण संपल्यावर थोडेदिवस नोकरी केली.पण माझं मन मुंबईत रमेना.मी मुंबईत सामाजिक कार्य आणि समाजसुधारणा वगैरे विषयावर खूप वाचलं आणि भाषणं पण ऐकली.मोठ्या मोठ्या गप्पा मारून आयुष्य फूकट घालवण्यापेक्षा आपण स्वतः काही तरी करून दाखवावं असं मनात आलं.मग करून दाखवायचं तर मग आपल्या गावातच का तसं करू नये असा विचार येऊन,मी मुंबई सोडली.आणि सरळ तुळसीला आलो.

मला असं वाटतं,आपण राहतो त्या पृथ्वीला भेडसावत असलेल्या समस्या बद्दल काळजी करीत राहून त्या समस्याना जर सामोरं न जाता राहिलो तर तसं करणं निव्वळ निष्फळ ठरेल.जर उपाय केले गेले तरच जग सुधारल जाईल.
माझी खात्री आहे की सामान्य व्यक्तिला असामान्य गोष्टी करता येतील.मला वाटतं सामान्य आणि असामान्य व्यक्ति मधला फरक कुणाला कसली उपदी आहे ह्या वर अवलंबून नसून त्या व्यक्ति आपलं जग आपणासर्वांसाठी किती चांगलं करतात ह्यावर आहे.काही लोक जे कार्य अंगिकारतात ते तसं कां करतात ह्याची मला कल्पना नाही.मी जेव्हा लहान होतो,तेव्हा मी मोठा झाल्यावर कोण होईन हे माहित नव्हतं. मला निदान काय व्हायचं नाही ते नक्कीच माहित होतं. मी मोठा होऊन, लग्न करावं,दोन चार मुलं असावीत म्हणजे सर्व साधारण लोकाना इच्छा असतात तसं व्हायचं नव्हतं.तसंच एखादा राजकारणी वगैरे नक्कीच व्हायचं नव्हतं.राजकारणाचा अर्थ तरी काय असावा हे पण मला त्यावेळी माहित नव्हतं.

माझा मोठा भाऊ जन्मापासूनच कानाने बहिरा होता.मी त्याचं नेहमी संरक्षण करायचो.एखादं व्यंग असणं हे आपलं कमनशीब समजलं पाहिजे पण म्हणून उभं आयुष्य जगण्यासाठी त्या व्यंगावर मात करून आपल्यात उपजिवीकेचे साधन असण्यासाठी शिक्षणा सारखी दुसरी गोष्ट नाही. आणि त्यातूनच मी हा मार्ग पत्करला ज्या मार्गाने मला जो मी आता आहे ते घडवलं.
ज्यावेळी मी आमच्या गावांत पहिला कार्यक्रम म्हणजे शाळा काढायचं ठरवलं त्यावेळी आम्ही फक्त तिनजण होतो.मला ह्या कार्या साठी लागणारी माहिती आणि दोनचार दुसर्‍या कल्पना असल्याने ही योजना कशी हाताळायची हे माहित होतं.
पण मनात यायचं समजा कोणी प्रतिसाद दिला नाही तर? कुणी पर्वाच केली नाही तर?पण एव्हडं माहित होतं की ह्या प्रश्नांना उत्तर म्हणजे एकच की हे चॅलेंज स्विकारायला हवं.मला एकट्याला त्याची क्षमता यायला मी माझ्या गावातल्या आणखी व्यक्तिंना बरोबर घेऊन होतो म्हणून.
रामू गाबित,दाजी सकपाळ,मुकुंद अवसरे ह्यांच्या सारखी गावातली शेकडो मंडळी मिळून आम्ही एकत्र आलो होतो. सगळे एकत्र येऊन गावात काही असामान्य बदल करायला पुढे सरसावलो होतो.
शाळेसाठी शाळा नव्हती.ते काम म्हणजे प्रत्येकाच्या अंगातली इर्षा होती. त्यामुळे अख्या गावात चैतन्य आणून काही निराळी गोष्ट ती आमची इर्षा हे करून दाखवीत होती.

माझी खात्री होती की मी जे काही माझा हक्क आणि माझी जबाबदारी म्हणून कार्य करीत होतो,ते माझ्या गावात दंगे मारामारीला प्रोत्साहन देणारं नव्हतं तर उलट ते कार्य म्हणजे गावातल्या सर्वांच्या समस्यांची सोडवणूक करायचा प्रयत्न होता.मला वाटतं अलीकडे धैर्याने आपलं मत सांगणं आणि धैर्याने माहिती मिळवणं ही पण एक कला झाली आहे. मला खात्री आहे की अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि गावातल्या लोकांना ते बोलून दाखवणं हे कदाचीत सर्वमान्यही नसेल आणि समाधान देणारं ही नसेल.पण मला वाटतं जीवन म्हणजे काही “पॉप्युल्यारीटी कॉनटेस्ट ” नाही.लोक माझ्या विषयी काय बरळत असतील त्याची मला पर्वा नाही,आणि माझ्यावर विश्वास ठेव,लोकानी खूप गरळ ओकली आहे.माझ्या पुरतं बोलायचं झाल्यास,माझ्या दृष्टीने मी योग्य कार्य करीत असताना कुणी दुसर्‍यानी ढुकून माझ्याकडे बघीतलं नाही तरी चालेल.
मला नक्की एव्हडं माहित आहे की शब्द वापरणं सोपं आहे.आपण जे कार्य करतो तेच आपल्यासाठी सत्यकथा आहे. आणि माझी खात्री आहे, जरूर तेव्हड्या सामान्य लोकानी आपल्या कार्याला पाठींबा दिला तर नक्कीच कसलंही असामान्य कार्य करायाला कसलीच आडकाठी येत नाही.
एव्हडं सगळं ऐकून झाल्यावर मला रमाकांत गावात फिरायला घेऊन गेला.रसत्यातला जो तो त्याला वाकून अभिवादन देतानापाहून मला त्याचं धन्य वाटलं.माझी प्रतिक्रिया येण्यापूर्वीच तो मला म्हणाला,
“सामान्य माणसाकडून मिळणारा हा प्रतिसाद मला मुंबईत राहून लाखो रुपये कमवून विकत घेता आला नसता.”
त्याची पाठ थोपटण्या पलिकडे मला त्याला शब्दाने शिफारस करण्यासाठी शब्दच आठवले नाहीत.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, September 12, 2008

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला,
“भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं.”
सकाळच्याच गप्पाचा विषय पुढे सांगत मला म्हणाला,
“कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असावं.पण खरं नाही ते.मला वाटतं जे वेगळे असतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.जगातला प्रत्येक जण जर का दुसर्‍यासारखाच असता तर ? प्रत्येक जण दुसर्‍यासारखच बोलला असता,वागला असता,तेच संगीत ऐकू लागला असता, तोच टी.व्ही. प्रोग्राम बघू लागला असता. असं झाल्यावर मग मात्र सर्व जग अगदी निषक्रीय,निष्तेज वाटलं असतं.
मला वाटतं जसे लोक असतात तसाच त्यांचा स्विकार करायला हवा.प्रत्येकात असलेला फरक तसाच महत्वाचा असतो आणि त्याला मान दिला गेला पाहिजे. उदा.ईतिहासातल्या गोष्टी पडताळून पाहिल्यास जगातले महत्वाचे लोक एकमेकापासून वेगळे समजले जातात.
सांगायचं झाल्यास,महात्मा गांधी,अब्राहम लिंकन,माऒ-त्से-तूंग,लेनीन.आईन्स्टाईन वगैरे.ह्या महान व्यक्तिनी प्रचंड असं काही कार्य केलं.पण काही लोकाना वाटतं,हे लोक विक्षीप्त होते.पण त्यांना त्यांच्या कार्यावर विशेष भरवंसा होता.
ह्या वेगळेपणाचा संदर्भ देण्याचं कारण मला पण बरेच वेळा अशा प्रसंगाला तोंड द्दावं लागलं आहे.

हे सर्व माझ्या प्रायमरी शाळेतून सुरू झालं.माझ्या लक्षात आलं,मी इतरांसारखा नव्हतो.माझी आई मला म्हणायची की मी ठराविक गोष्टीचा ध्यास घेत रहायचो.कमनशिबाने,माझ्या ह्या विषयात इतर शाळेतल्या मुलांना दिलचस्पी नसायची.माझ्या गुरूजीना पण नसायची.
गम्मत म्हणजे माझे हे गुरूजी एकदा मला म्हणाले की,” तू जर का साप आणि पालीचा आणखी एकदा उल्लेख केलास तर तुझ्यावर मी रागावणार.तुझं वर्गात लक्ष नाही असं ठरवून तुला मी शिक्षेला पात्र करणार.”
आणि इथ पासून मला मुलांकडून चिडवण्याची छळणूक चालू झाली.

तिसर्‍या इयत्तेत,मला माझे गुरूजी म्हणाले की मला त्याच त्याच गोष्टी बद्दल परत परत बोलण्याची संवय लागली आहे.नंतर मी माझ्या आईला ह्या बद्दल विचारलं,त्यावेळी ती म्हणाली,
” डोळ्यांसमोर आडपडदा आणून मला एका वेळेला फक्त एकच गोष्ट दिसते आणि दुसर्‍या एखाद्दा गोष्टीवर फोकस करायला जमत नाही.जसं मी ज्याला त्याला टार्झनच्या मर्दुमकी बद्दल सांगत बसतो कारण टार्झनच्या मर्दूमकीचं मला विषेश आकर्षण होतं. आणि त्यावळी टार्झन ही व्यक्ति शाळेत विशेष प्रसिद्धीत नसताना माझं असं करणं मी मला स्वतःलाच चिडवून घेण्याचं लक्ष करीत होतो.
मी वेगळा वाटायचो कारण मला इतर मुलापेक्षा निराळ्या विषयात दिलचस्पी असायची.पण म्हणून माझ्याशी एव्हडं निष्टूर आणि हलक्या वृत्तिने वागण्याची त्याना जरूरी नव्हती.मला सर्वात जास्त विषय आवडतो त्याची ही मुलं जास्त टर उडवायची.

देवमासा,ज्वालामुखी,चक्रीवादळ असल्या विषयावर मला शास्त्रीय माहिती असल्याने त्या विषयाची लोक टिंगल करीत असत.कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊन मी असल्या विषयावर स्पर्धा जिंकली तरी मी जादा हुषार आहे म्हणून माझी अवहेलना व्हायची.
कुणास ठाऊक एखाद दिवशी मी इलेक्ट्रॉनीक इंजिनीयर होऊन टारझनचा एक रोबॉट पण बनवू शकेन.मला तसं स्वप्न पहाता येईल.नाही कां येणार?

कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असायला हवा.पण खरं नाही ते.मला वाटतं जे इतरांसारखे नसतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.कारण मला वाटत, आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.”
हे सगळं ऐकून मला त्या मुलाबद्दल आणि त्याच्या विचारा बद्दल खरोखरंच कुतुहल झालं होतं.पुढल्या खेपेला मी जेव्हा भाऊसाहेबाना भेटलो त्यावेळी न विसरता ह्या मुलाचा विषय काढून त्याची जास्त चौकशी केली.
प्रो.देसाई म्हाणाले,
“अहो त्या मुलाला “Asperger’s Syndrome ” असल्याने तसं लहान असताना ह्या मुलाना त्यांच्या विषयी त्यावेळेला काय वाटतं ते तो सांगत होता. त्यांच म्हणणं त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर होतं.हळू हळू ती विकृती कमी होत जात ही मुलं नंतर नॉर्मल वागू लागतात.भाऊसाहेबाना त्यांच्या नातवाने हे त्याच्या बद्दल सांगितलं होतं. ही लहानपणातली विकृती असते.आता तो नॉरमल आहे.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 10, 2008

असशी तरी कोण तू?

फूलबाग जीवनाची सजविलीस तू
असशी तरी कोण तू?
माझ्या एकाकी मनाला फुलविलेस तू
असशी तरी कोण तू?

चाले मी एकटा कुणी मित्र नव्हता
बोले मी कुणाला कुणी साथी नव्हता
असूनी मी तुझाच गुपित ठेविलेस तू
असशी तरी कोण तू?

नसेल ना स्वप्न जे माझे समजावे
जीवलग समजावे की प्राणप्रिया समजावे
असूनी समोर चेहरा लपविलास तू
असशी तरी कोण तू?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, September 8, 2008

बालपण देगा देवा!

“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

“त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्याइराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,
“बसा,बसा”
असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज वाटली.

संचालकाने मला एका कोपऱ्यात नेऊन प्रत्येक चेहऱ्याच्या मागे दडलेली कथा माझ्या कानी घातली.
ते ऐकून क्षणभर माझ्या मनात आलं की जर का हा वृद्धाश्रम नसता तर कदाचीत ह्यातले बरेचसे आजीआजोबा रस्त्या भिक्षेंदाही करीत असते.ही संस्था जणू एखाद्या मुलासारखी असून आजीआजोबांच्या त्या कापणाऱ्या हाताना एखाद खोल रुतलेलं मूळ प्रेमाचा आधारच असावा.

एका आजीचा नवरा हयात नव्हता आणि तिला मुलगा पण नव्हता.समवयस्क मित्र,मैत्रीणी बरोबर ती बिचारी अन्ताक्षरी खेळत होती.ती मजा करत होती.तिला जवळचे नातेवाईक पण नव्हते.
ह्या अशा संस्थेमधे तिला संगीताच्या सुरात मित्र गवसले होते.ह्या संस्थेतल्या संगीताच्या सूरानी तिला शेवटच्या श्वासापर्यंत उसंत दिली होती.पण एका वृद्ध चेहऱ्याने माझ्या मनाला एव्हडी ओढ लावली होती, की भग्न आणि सुरकुतल्यांचे जाळं असलेला तो चेहरा आठवून माझं मन विचलीत झालं.

ते संचालक म्हणाले “पंधरा दिवसापुर्वी एक उमदा, लाघवी तरूण, ह्या आजीला इथे घेऊन आला,ती त्याची अनाश्रीत शेजारीण,तिला प्रेमाचे असं कोणी नाही. तिचा नवरा निर्वतल्या नंतर ती एकाकीच झाली.
क्षुल्लक पेन्शनची ती अपेक्षित आहे,ती एकटी असल्याने , आजारी पडली तर तिची देखबाल कोण करणार?,आणि दुसरंकाही झालं तर कोण बघणार?” म्हणून ह्या सुस्वभावी उमद्या तरुणाने प्रेमाचा ओलावा ठेऊन तिला एकडे आणून सोडली.

”धन्य,धन्य”, शेजारी असून सुद्धा शेजारधर्म पाळून आणि तिच्या भविष्याची खंत ठेऊन त्याने तिला इकडे आणून सोडलीत्याचा गौरव करीत मी माझ्याशी पुटपुटलो.

संचालक पूर्ण शांत राहून म्हणाले,
” अगदी खरं,पण ह्या तरुणाचा खरा गौरव अजून बाकीच आहे.हा मदतीचा हात पुढे करणारा उमदा तरूण तिचा सख्खा मुलगा आहे.”
“काय?”
असं म्हणताना, माझ्या हातातल्या चहाच्या कपातला चहा डुचमळला,पण मी काही थरथरलो नाही.

“होय,इथे आल्यावर पहिले दहा दिवस ती कधी हसलीच नाही,की काही बोलली नाही.
एखाद्या जीवंत मुडद्या सारखी ती अबोलच राहिली. अलीकडेच थोडा भराव वाटल्यावर म्हणाली,
“माझ्या मांसाचा तो गोळा आहे,असं मूल कुणाचं असूं शकतं का?”
आणखी माहिती देण्याच्या उद्देशाने संचालक बोलून गेले.

“काय?”
ह्या माझ्या निरपराधी प्रश्नाचे उत्तर, जीवंत मुडदा म्हणून भटकत होतं.
“वृद्धाश्रम म्हणजे काय कृतघ्ज्ञ आणि भांडकुदळ मुलांनी, घाण म्हणून आईवडिलांना फेकून देण्याची गायरी आहे काय? कृतज्ञअसण्याचा गूणाचा लोप होत आहे”
संचालक तावातावाने सांगत होते.

जंगली जनावराना, शाळेत न शिकता सुद्धा नैसर्गिक ओढ असते ती ह्या सुशिक्षीत समजणाऱ्या मुलांकडे नाही.गौरवशील घराची व्याखा म्हणे फ्रिज,गाडी, टी.वी.,सेलफोन असतो ते,अशी केली जाते पण ज्या घरात आंतरीक जिव्हाळ्याचे धागेदोरेनाहीत ते घर जरी बाहेरून “ताज महाल” वाटला तरी आतून एखादी “कबर” असते.

विभागलेल्या कुटुंबात आजीआजोबाना स्थान नसतं. आईवडिलानी आपल्या मुलांना
“ते आपल्या कुटुंबाचे भाग आहेत”
हे दर्शविलं पाहिजे.एक संघ राहिलं पाहिजे.

वयोमानामुळे वृद्ध माणसे कधी कधी “सरफिरे” होतात,हट्टी बनतात.
घरी कधी कधी वाद होतात.जसे दिवस जातात तसे वाद कमी होतात,संपर्क वाढतात.
पैशाच्या आणि तारुण्याच्या प्राप्तीमुळे मुलानी कृतघ्ज्ञ होवू नये.त्यांच्या वार्धक्यामुळे आलेल्या त्यांच्या अक्षमतेवर भाष्य करण्याचा चालून आलेला आपला अधिकार आहे असे ग्राह्य धरू नये.

घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनरावृतीस प्रवृत्त होते.
हे काही शाळेत शिकवलं जात नाही,मुलं ते पाहून आणि समजून तसं करतात.

“तुम्ही काही आमच्यावर उपकार केले नाहीत, तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत”
किंवा
“आम्हाला जन्म देण्याची आम्ही तुमच्याकडे याचना केली नव्हती”
असले उदगार काढणाऱ्या काही व्यक्ती निवडून काढायला कठीण नाहीत.असे विचार किंवा अशा विचाराची मुळधारणा असल्यावर तिकडेच सर्व संपतं. नमून वागण्यात जर कमीपणा मानला तर त्या मुलाची वृद्धी कशी व्हायची?.

अलिकडे, वडिलमाणसं सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्यावर स्वतःची मंडळं स्थापून,
”आता आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे,चांगली पुस्तकं वाचायची आहेत,चांगली नाटकं पहायची आहेत, देशात आणिबाहेर जग फिरायचं आहे,घरातली कामं आणि कर्तव्यं करायची नाहीत.”
असं म्हणणारे नवीन आजीआजोबा दिसतात.
पन्नास वर्षापुर्वीचे ते आजी आजोबा आता राहिले नाहीत.

स्वतःचं स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जरी अशी वृत्ति आणली आणि मुलांवर अवलंबून न रहाण्याचे जरी मनात असलं तरी तो संपर्क तो दुवा ठेवणं आवश्यक आहे,कारण आयुष्याच्या उतरणीवर मुलांची मिळणारी प्रेमाची आस्था मुकून जाणं योग्य नाही.
ही एकमेकाची जरुरी असते.हट्टवादी राहून शेवटी एकमेकास असून नसल्यासारखे होणं ह्यातून काही साध्य होत नाही.

हजारो लोक आजुबाजुला असून सुद्धा आपल्या यशाची शिफारस अथवा पाठ थोपटण्यासाठी आपलं माणूस जवळ नसल्यास किंवा,
”जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको “
असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझेकॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, September 6, 2008

डाव वेळेने साधला

दुःखाच्या ह्या दरी मधे
रथ खुषीचा लोपला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला

कुणी समजावे प्रेमातल्या
ह्या नीष्ठूर संकटाना
दोन जीवाने इच्छीले ते
इतराना काही केल्या पटेना

हंसण्या आधीच प्रीतिला
का आवडे रडायला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला

नेत्रा समोर प्रीतिचा
पुरावा कोणत्या कारणा
म्हणावे जर ह्या जीवन
मग काय म्हणावे ह्या मरणा

प्रीतिचे दैव जाता निद्रे मधे
दाह दुःखाचा भोगला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 4, 2008

समाजाची सेवा करण्याचा संकल्प.

आज मी बराच वेळ प्रों.देसायांची तळ्यावर वाट बघत बसलो होतो.काळोख होत आला आहे आता काही भाऊसाहेब नक्कीच येत नाहीत असं मनात आणून जवळ जवळ उठलो होतो.तेव्हड्यात लगबगीने येणार्‍या प्रो.देसांयाबरोबर आणखी एक व्यक्ति येताना पाहिली.घरी कोणही नवी व्यक्ति आल्यावर भाऊसाहेब माझ्याशी त्याची ओळख करून देण्यात नेहमीच आनंद मानत.
“थांबा, थांबा तुम्हाला डॉ.धारणकरांची ओळख करून देतो.उद्दा ते चालले आहेत.”
असं मला लांबून ओरडून म्हणाले.
मी ते दोघे जवळ आल्यावर त्यांना म्हणालो,
“प्रोफेसरानी आपल्या नावाचा बरेच वेळां मला संदर्भ दिल्याचं आठवतं.विषेश म्हणजे आपण समाजाची सेवा करायला वाहून घेतलं आहे.आणि आपल्या जीवनावर एक पुस्तक पण लिहीत आहा असं मी त्यांच्या तोंडून ऐकलंय.आता प्रत्यक्ष तुमच्या तोंडूनच थोडं काही ऐकायला मला खूप आनंद होईल”.

एव्हडं बोलल्यावर डॉ.धारणकर सांगू लागले,

“नेहमीच यथायोग्यच काम करण्याच्या संवयीचं आणि नेहमीच स्वतःला आणखी सुधारणा करून घ्यायच्या संवयीचं उप -अंग म्हणजे कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहल आणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच असावं. समाजावर काहीतरी पॉझिटीव्ह प्रकाश टाकण्याची माझी जबाबदारी आहे असं मला नेहमीच वाटत असतं.त्यामुळेच मी हा संकल्प पूरा व्हावा म्हणून लोकसेवा करण्याचा एक भाग म्हणून मी वैद्यकिय शास्त्राचा अभ्यास करून आणि शास्त्रज्ञ होऊन, लागण होणार्‍या रोगाबरोबर दोन हात करण्याचा विडा उचलला आहे.
माझा हा प्रयत्न ही माझी मला मिळालेली देणगीच मी समजतो.समाजाला ह्या त्रासदायक समस्येतेतून परावृत्त करण्यासाठी ही देणगी माझ्या ह्या प्रयत्नाला आणि मदतीला सोप करते.

माझी तिन तत्वं आहेत.
पहिलं,
ज्ञानासाठी मला कधीही तृप्त न होणारी तहान आहे.ज्ञान आणि सत्य एकाच माळेचे दोन मणी आहेत अशी माझी धारणा आहे.प्रत्येक व्यक्ति रोज ज्ञान मिळवत असते.प्रयोगशाळेतून,शास्त्रावरिल लिहिलेल्या पुस्तकामधून,आणि आजार्‍याची देखभाल करून.हे करीत असताना मी क्वचितच कंटाळतो.
दुसरं,
उत्तमत्तोम मिळवीण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात मी विश्वास ठेवतो.म्हणूनच कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहलआणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच मला सतर्क ठेवतं.आणि हे कुतुहलच मला मायूस बनवतं.त्यामुळे माझ्यात एकप्रकारचं टेन्शन येऊन ते टेन्शन माझा एक दुवा वाटून मला माझ्या अपेक्षाना आधार देतं. त्यामुळे मी आता चांगला डॉक्टर आणि चांगला संशोधक झालो आहे.टेन्शन नसतं तर मी एव्हडा एकाग्र राहिलो नसतो.मी मनाशी ठरवलंय की मला हवं तेव्हडं सगळं ज्ञान मिळवता येणार नाही. त्यामुळे आणखी आणखी माहिती मिळवण्यासाठी मी धडपडत असतो.आणि तसं करण्यात मला मजा येते.
तिसरं,
डॉक्टर म्हणून मला ह्या समजाची सेवा करणं हा माझा गोल होवून राहिला आहे. माझं हे सर्व जीवन लोकांची सेवा करण्यात घालवलेलं आहे. त्यातला बराचसा भाग,संशोधन करण्यात,रुग्णांची काळजी घेण्यात,सांथींपासून लोकांचं संरक्षण करण्यात गेलं आहे.
आता हेच बघा,AIDS वर मी एकाग्र होऊन काम करू लागलो तेव्हा माझे सहकारी मला हा रोग “गे लोकांचा रोग” आहे आणि त्याकडे माझं ध्यान देणं हे निर्थक आहे असं म्हणायचे.मला ह्या रोगाची इथ्तंभूत माहिती असल्याने हा रोग समाजाचा र्‍हासाला कारणीभूत होणार हे मला त्यावेळीच माहित होतं.त्यामुळे ह्या रोगाचं उच्चाटन कसं होईल ह्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं.
ह्या रोगाला काबूत आणायला आपण अपयशी होणं हा काही त्याच्यावर पर्याय होऊ शकत नाही.”
मी डॉ.धारणकराना विचारलं,
“मग तुम्ही काय करायचं ठरवलं?”
त्यावर ते म्हणाले,
” त्यामुळे त्या रोगाचं आणखी ज्ञान घेण्यावर मी भर द्दायला लागलो आहे.आणि यथायोग्य माहिती मिळेपर्यंत मी त्याच पिच्छा सोडणार नाही. कारण समाजाचं भलं हे माझ्या अस्तित्वा पेक्षां जास्त महत्वाचं आहे अशी माझी धारणा आहे.”
जाता जाता मी त्यांना म्हणालो,
“तुमच्या ह्या संकल्पाला घवघवीत यश येवो हीच माझी प्रार्थना.”
अशा दृढ-संकल्प करणार्‍या व्यक्ति बरोबर दोन घटका चर्चा करायला वेळ मिळवून दिल्या बद्दल मी प्रो.देसायांचे पण आभार मानायला विसरलो नाही.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 2, 2008

कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?

कसे विचारू ह्या गोमट्या कमलिनीला
लपून छपून भ्रमर होऊनी येई तो रात्रीला
घेऊनी खबर तुझी चोरीतो तुझ्या मनाला

का विचारसी तू असे त्या कळीला
प्रेमात होतोच असा घात त्या घटकेला
बाण फेकूनी नजरेने बोलाविते जादूला
खेचून घेता जवळी दोष का मग भ्रमराला

निर्दय भ्रमर गुंजन करूनी फिरतो गली गली
कसा करावा भरवंसा जो चुंबित जाई कळी कळी
चोखंदळ ह्या भ्रमराला साथ देईल कुठली कळी
विसरूनी जाई भान अपुले जेव्हा भेटे कमलिनी

कळी गोमटि भ्रमर सावळा, संगत कशी निभेल रे !
काळ्या मेघा संगे बिजली, कशी राहते विचार रे !
गोरे सावळे रात्रंदिनी, मिळवूनी घेती असे कसे?
रात्र काळी चंद्र गोमटा, रास मिलनाची करती कसे?
कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com