नको नजर लावू अशी
होईल मला तुझी नशा
नकळत करीन मी माझी
अवचित दुर्दशा
सांग कसा मी मलाच सावरूं
नको रोखूस तू मला
सांग कसा मी मलाच रोखू
म्हणशी नीष्ठूर तू मला
सांग कसा मी मलाच सावरूं
काजळ तुझ्या नयनातले
असुंदे जसेच्या तसे
होवूनी तू अशीच धुंद
राहुदे केस तुझे सैलसे
असेच येवून धुंदी मधे
बहकलो मी तुला पाहूनी
पाप घेतले होवूनी बेचैन
नको ऐकवू बोल तुझे
नाजुक तुझ्या ओठातून
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, March 31, 2008
Sunday, March 30, 2008
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
पाहूनी मला तू अशीच हंसशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
म्हण हवे तर मला परदेशी बावळा
अथवा म्हणशी मला अपरशी खूळा
मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
मग्न होवूनी हरवून बसशी
चालती फिरती जणू प्रतिमा जशी
भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
म्हण हवे तर मला परदेशी बावळा
अथवा म्हणशी मला अपरशी खूळा
मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
मग्न होवूनी हरवून बसशी
चालती फिरती जणू प्रतिमा जशी
भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Friday, March 28, 2008
पालीचं शेपूट
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.”
“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.
अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती. बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी “कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे.
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,तसंच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली. त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.
अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती. बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी “कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे.
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,तसंच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली. त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, March 26, 2008
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, March 24, 2008
“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया”
“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”
मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.
चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे,
“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,
निरोगी मौज
पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी
मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी
खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल
करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे
ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं “सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.
ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि
एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.
“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”
मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.
चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे,
“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,
निरोगी मौज
पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी
मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी
खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल
करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे
ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं “सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.
ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि
एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.
“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, March 22, 2008
प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं
"तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?"
त्यावर तो म्हणाला,
"त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे."
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
"अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?"
हंसत,हंसत मला म्हणाला,
"आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत.
माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मी जणू हातात हात घालून शिकत होतो.
एकदा मी आणि माझा डॉक्टर मित्र शास्त्रावर बोलण्याऐवजी श्रद्धेवर चर्चा करीत होतो.आम्ही दोघे भिन्न भिन्न रितीरिवाजात वाढल्याने त्याने मला विचारलं,
"तुला थोडक्यात एका वाक्यात सर्वांत महत्वाची तुझ्या धर्माची अगदी आंतरीक कल्पना सांगायची झाली तर तू ती कशी सांगशील? "
त्यावर क्षणभर मुग्ध झालो आणि जणू नकळत येणाऱ्या श्वासाप्रमाणे मी म्हणालो,
"प्रत्येक व्यक्ति अमुल्य असते ही आमची धारणा आहे."
माझं वैदकीय शिक्षण पुरं होता होता माझी रेसिडेन्सी चालू झाली.आणि माझे आध्यात्मीक आयुष्याचे विचार हळू हळू दूर जायला लागले.लहान मुलांचे दुखण्यांचे हाल पाहून त्या दयाशील दयाघनाच्या अस्थित्वाशी माझं मन एक रुपता करू शकत नव्हतं.
एकदा,मी माझ्या राऊंडवर असताना एक जोडपं अत्यंत सद्गदीत होवून आपल्या छोट्याश्या बालकाच्या बेडजवळ त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना पाहून,मी तितकाच सद्गदीत झालो आणि आठवतं मला त्यांच्याकडे पाहून मनात म्हणालो,
"काही उपयोग आहे का याचा?"
त्यावेळी मी माझ्या आध्यात्माच्या श्रद्धेशी आणि त्यापासून दूर जाण्याऱ्या विचाराशी दुवा लावायला धडपड करीत होतो. ज्याक्षणी मी माझ्या विशेष वैद्यकीय ज्ञानाची कसोटी लावत होतो,त्याचक्षणी माझ्या मनातल्या त्या श्रद्धेच्या फाटक्या झालेल्या लक्ताराच्या कडाकडांना शिवण्याचा प्रयत्न करीत होतो.
एकदिवशी माझ्याच प्रांतातल्या एका तज्ञाने मला एका कोवळ्या बालकाला बाहेरून आर्टीफिशीयल श्वास देवून ते स्वतः श्वास घेवू शकत नसल्याने कसं श्वास घ्यायला लावायचं ते शिकवलं.
त्यादिवशीच माझ्या आयुष्याला एक कलाटणी आली.दुसऱ्यांचे आयुष्य थोपवणारे ते श्वास न थोपवण्याची मी जबाबदारी घेतली होती.माझ्या मनातलं ते आध्यात्म जागृत झालं.आता जेव्हां,जेव्हां आजाऱ्याच्या श्वासाची उमळ, कान लावून ऐकत असताना, त्यांच्या फुफुसात प्राणवायू दाबूनदपटून घालताना,किंवा त्यांचं ब्लडप्रेशर कमी होत चाललेलं पाहून त्यावर चटकन उपाय करताना, अलगद त्यांचा हात हातात घेवून त्यांची आंसवं पुसताना,अक्षरशः त्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा भास मी माझ्या मनात निर्माण करीत होतो.
मी त्याला विचारलं,
"असं करून तुला काय होत असेल नाही?"
तो म्हणाला,
"कदाचीत काही लोकांना,ही क्षमता एक प्रकारची अंगात आलेली ताकद वाटत असावी.पण मला ती जबरदस्त अबलता वाटत होती.माझ्या लक्षात यायचं की मी अशा पवित्र जागेवर उभा राहून त्या आजाऱ्यांना सन्मान देण्यात कमी पडून त्यांच्या आयुष्याला धोका तर देत नाही ना?
प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे ही माझी धारणा माझ्या अंतःकरणापासून आहे.प्रत्येक वेळी मी माझ्या आजाऱ्यावर कडी नजर ठेवून असतो आणि ते ज्यावेळी जास्तीत जास्त हतबल असतात त्यावेळी त्यांच संरक्षण करतो.त्यामुळे माझी श्रद्धा जीवंत होते,अगदी त्यांच्या प्रत्येक श्वासाकणीक."
हे त्याचं सगळं ऐकून मी त्याला नकळत म्हणालो,
"खरंच, तू पण ग्रेट आहेस आणि तुझा व्यवसाय पण ग्रेट आहे."
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
"तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?"
त्यावर तो म्हणाला,
"त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे."
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
"अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?"
हंसत,हंसत मला म्हणाला,
"आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत.
माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मी जणू हातात हात घालून शिकत होतो.
एकदा मी आणि माझा डॉक्टर मित्र शास्त्रावर बोलण्याऐवजी श्रद्धेवर चर्चा करीत होतो.आम्ही दोघे भिन्न भिन्न रितीरिवाजात वाढल्याने त्याने मला विचारलं,
"तुला थोडक्यात एका वाक्यात सर्वांत महत्वाची तुझ्या धर्माची अगदी आंतरीक कल्पना सांगायची झाली तर तू ती कशी सांगशील? "
त्यावर क्षणभर मुग्ध झालो आणि जणू नकळत येणाऱ्या श्वासाप्रमाणे मी म्हणालो,
"प्रत्येक व्यक्ति अमुल्य असते ही आमची धारणा आहे."
माझं वैदकीय शिक्षण पुरं होता होता माझी रेसिडेन्सी चालू झाली.आणि माझे आध्यात्मीक आयुष्याचे विचार हळू हळू दूर जायला लागले.लहान मुलांचे दुखण्यांचे हाल पाहून त्या दयाशील दयाघनाच्या अस्थित्वाशी माझं मन एक रुपता करू शकत नव्हतं.
एकदा,मी माझ्या राऊंडवर असताना एक जोडपं अत्यंत सद्गदीत होवून आपल्या छोट्याश्या बालकाच्या बेडजवळ त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना पाहून,मी तितकाच सद्गदीत झालो आणि आठवतं मला त्यांच्याकडे पाहून मनात म्हणालो,
"काही उपयोग आहे का याचा?"
त्यावेळी मी माझ्या आध्यात्माच्या श्रद्धेशी आणि त्यापासून दूर जाण्याऱ्या विचाराशी दुवा लावायला धडपड करीत होतो. ज्याक्षणी मी माझ्या विशेष वैद्यकीय ज्ञानाची कसोटी लावत होतो,त्याचक्षणी माझ्या मनातल्या त्या श्रद्धेच्या फाटक्या झालेल्या लक्ताराच्या कडाकडांना शिवण्याचा प्रयत्न करीत होतो.
एकदिवशी माझ्याच प्रांतातल्या एका तज्ञाने मला एका कोवळ्या बालकाला बाहेरून आर्टीफिशीयल श्वास देवून ते स्वतः श्वास घेवू शकत नसल्याने कसं श्वास घ्यायला लावायचं ते शिकवलं.
त्यादिवशीच माझ्या आयुष्याला एक कलाटणी आली.दुसऱ्यांचे आयुष्य थोपवणारे ते श्वास न थोपवण्याची मी जबाबदारी घेतली होती.माझ्या मनातलं ते आध्यात्म जागृत झालं.आता जेव्हां,जेव्हां आजाऱ्याच्या श्वासाची उमळ, कान लावून ऐकत असताना, त्यांच्या फुफुसात प्राणवायू दाबूनदपटून घालताना,किंवा त्यांचं ब्लडप्रेशर कमी होत चाललेलं पाहून त्यावर चटकन उपाय करताना, अलगद त्यांचा हात हातात घेवून त्यांची आंसवं पुसताना,अक्षरशः त्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा भास मी माझ्या मनात निर्माण करीत होतो.
मी त्याला विचारलं,
"असं करून तुला काय होत असेल नाही?"
तो म्हणाला,
"कदाचीत काही लोकांना,ही क्षमता एक प्रकारची अंगात आलेली ताकद वाटत असावी.पण मला ती जबरदस्त अबलता वाटत होती.माझ्या लक्षात यायचं की मी अशा पवित्र जागेवर उभा राहून त्या आजाऱ्यांना सन्मान देण्यात कमी पडून त्यांच्या आयुष्याला धोका तर देत नाही ना?
प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे ही माझी धारणा माझ्या अंतःकरणापासून आहे.प्रत्येक वेळी मी माझ्या आजाऱ्यावर कडी नजर ठेवून असतो आणि ते ज्यावेळी जास्तीत जास्त हतबल असतात त्यावेळी त्यांच संरक्षण करतो.त्यामुळे माझी श्रद्धा जीवंत होते,अगदी त्यांच्या प्रत्येक श्वासाकणीक."
हे त्याचं सगळं ऐकून मी त्याला नकळत म्हणालो,
"खरंच, तू पण ग्रेट आहेस आणि तुझा व्यवसाय पण ग्रेट आहे."
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, March 20, 2008
प्रो.देसाई म्हणतात……..
“लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?”
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.
मला म्हणाले,
” जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.
मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते. आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.
दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच “होयगावडा” होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शात असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com
काय झालं आहे या लोकानां?”
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.
मला म्हणाले,
” जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.
मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते. आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.
दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच “होयगावडा” होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शात असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
