गुणगुणे सारी ही हवा
खणखणती साऱ्या ह्या दिशा
मन माझे आनंदूनी बोले
तू यावे,तू यावे,तू यावे
झुमझुमती सारे ऋतू
घळघळती सारे घन
स्वप्ना मागून स्वप्ने सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे
धडधडत्या मनावरली तुटली बंधने
प्रीतिच्या दंवानी धुवूनी गेली शरिरे
मनातल्या उत्कंठेने तोडली सारी वचने
प्रीतिच्या नशेतूनी सारे श्वास धुतले
स्वप्ने सजू लागली स्वर गाऊ लागले
फुला मागूनी फुले सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Friday, May 30, 2008
Thursday, May 29, 2008
एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.”
तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो,
“तुला मी इकडे नवीनच पहात आहे.”
ते ऐकून तो म्हणाला,
“होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो. माझ्या एका मित्राने मला ह्या होटेलची माहिती दिली.मी पुर्वीपण गोव्याला येत जात असे.मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
मी त्याल विचालं,
“असं का?”
तो म्हणाला,
मुंबईच्या मानाने गोवं खूपच लहान आहे.इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात.आता तुमचंच घ्या ना,तुम्ही माझ्याशी मुद्दाम वेळ काढून बोलत आहात.मुंबईच्या लोकाना कुठे वेळ आहे.एखादं हास्य फेकतील किंवा हलो-हाय करतील.त्यांचा पण दोष नाही.कारण त्यामानाने गोव्याचं लाईफ जरा स्लोच आहे.”
हे त्याचं म्हणणं ऐकून मला पण थोडं त्याच्याशी बोलावसं वाटलं आणि तो पण माझ्या सारखा बडबड्या आहे असं वाटलं.
“तू ह्या होटेलमधे काय काम करतोस?”
ह्या माझ्या दुसऱ्या प्रश्नाची तो जणू वाटच पहात होता असं वाटलं.लगेचच म्हणाला,
“मी इकडे वेटरचं काम करतो.आलेल्या गिऱ्हाईकाला प्रथम कॉफी देतो.इकडच्या होटेलचा तसा रिवाज आहे.मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हल्लीच्या जीवनात ऑन-लाईन-चॅट,ऑन- लाईन- शॉपिंग आणि बरचसं ऑन-लाईन झाल्यामुळे माणसा माणसा मधल्या दुव्यासाठी कुणालाही भूक नसते.
इकडे त्यामानाने हे सर्व कमीच असल्याने,घरी दुध घेवून माणूस केव्हा आला,पेपर टाकून पोऱ्या केव्हा गेला,नातवंडं आता काय करतात असल्या गोष्टीवर बोलायला अजून वेळ सापडतो.कधी कधी माझी पण चौकशी करतात.माझं कसं चाललंय म्हणून पण विचारतात.
असलं हे जीवन इकडे जास्त जीवंत वाटतं.”
मला म्हणाला,
“काका,तुम्हाला वेळ असेल तर एक किस्सा सांगतो”
एव्हडं बोलणारा हा वेटर काय सांगतो म्हणून ऐकण्याची माझी पण जिज्ञासा वाढली.मी आणखी एक कॉफी ओतायला सांगून म्हणालो,
“तुझं ऐकायला काढतो वेळ हवा तर”
हे ऐकून त्याला बरं वाटलं.
मला म्हणाला,
“एकदा,मी इकडच्या होटेलच्या मागे एक “फुंकणाऱ्या” लोकांसाठी एक स्पेशल खोली आहे,तिथे कॉफी घेवून गेलो होतो.एक म्हातारी आजी बराच वेळ वाट बघत असलेली दिसली.तिला मी कॉफी दिली.मला माझ्या आजीची आठवण आली
मला म्हणाली,
” मला एक पाव आणि मटण प्लेट मिळेल काय?”
तिचा तो पेहराव आणि चेहऱ्यावरून ती एक दोन दिवस उपाशी असल्या सारखी दिसली.मी तिला एक पाव आणि आमलेट आणून दिलं.मी खोटं खोटंच तिला सांगितलं की एका गिऱ्हाईकाने त्याची ऑरडर कॅनसेल केली ते मी तुला आणून दिलं. खावून झाल्यावर ढेकर देत ती मला म्हणाली,
” मला पाचएक रुपये मिळतील काय?”
मी माझ्या टिप मधली मिळकत तिला दिली.
मला म्हणाली,
“मी परत आल्यावर तुझे पैसे परत करीन.”
असं म्हणत ती आनंदी चेहरा करून मेन दरवाजातून निघून गेली.
ती तिन आठवड्यानंतर ती सकाळीच आली आणि माझे पैसे देवून गेली.तिला कुठेतरी काम मिळाल्याने तिच्या कमाईतून तिने मला पैसे दिले.मला तिने सकाळचा ब्रेकफास्ट पण देऊ केला.
मी त्या वेटरला म्हणालो,
” ह्यातून तू काय शिकलास?”
मला तो वेटर सांगू लागला,
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.
मी गिऱ्हाईकाला कॉफी देताना त्याच्या नजरेशी नजर मिळवतो,”कसं काय?” म्हणून विचारतो.आणि मग तो काय म्हणतो ते ऐकतो.माझा जॉब गिऱ्हाईकाची सेवा करण्याचा आहे पण मला वाटतं ह्यातून एकमेकाचा दुवाही साधला जातो आणि एकमेकाच्या मदतीला हात पुढेही करता येतो.”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो,
“तुला मी इकडे नवीनच पहात आहे.”
ते ऐकून तो म्हणाला,
“होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो. माझ्या एका मित्राने मला ह्या होटेलची माहिती दिली.मी पुर्वीपण गोव्याला येत जात असे.मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
मी त्याल विचालं,
“असं का?”
तो म्हणाला,
मुंबईच्या मानाने गोवं खूपच लहान आहे.इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात.आता तुमचंच घ्या ना,तुम्ही माझ्याशी मुद्दाम वेळ काढून बोलत आहात.मुंबईच्या लोकाना कुठे वेळ आहे.एखादं हास्य फेकतील किंवा हलो-हाय करतील.त्यांचा पण दोष नाही.कारण त्यामानाने गोव्याचं लाईफ जरा स्लोच आहे.”
हे त्याचं म्हणणं ऐकून मला पण थोडं त्याच्याशी बोलावसं वाटलं आणि तो पण माझ्या सारखा बडबड्या आहे असं वाटलं.
“तू ह्या होटेलमधे काय काम करतोस?”
ह्या माझ्या दुसऱ्या प्रश्नाची तो जणू वाटच पहात होता असं वाटलं.लगेचच म्हणाला,
“मी इकडे वेटरचं काम करतो.आलेल्या गिऱ्हाईकाला प्रथम कॉफी देतो.इकडच्या होटेलचा तसा रिवाज आहे.मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हल्लीच्या जीवनात ऑन-लाईन-चॅट,ऑन- लाईन- शॉपिंग आणि बरचसं ऑन-लाईन झाल्यामुळे माणसा माणसा मधल्या दुव्यासाठी कुणालाही भूक नसते.
इकडे त्यामानाने हे सर्व कमीच असल्याने,घरी दुध घेवून माणूस केव्हा आला,पेपर टाकून पोऱ्या केव्हा गेला,नातवंडं आता काय करतात असल्या गोष्टीवर बोलायला अजून वेळ सापडतो.कधी कधी माझी पण चौकशी करतात.माझं कसं चाललंय म्हणून पण विचारतात.
असलं हे जीवन इकडे जास्त जीवंत वाटतं.”
मला म्हणाला,
“काका,तुम्हाला वेळ असेल तर एक किस्सा सांगतो”
एव्हडं बोलणारा हा वेटर काय सांगतो म्हणून ऐकण्याची माझी पण जिज्ञासा वाढली.मी आणखी एक कॉफी ओतायला सांगून म्हणालो,
“तुझं ऐकायला काढतो वेळ हवा तर”
हे ऐकून त्याला बरं वाटलं.
मला म्हणाला,
“एकदा,मी इकडच्या होटेलच्या मागे एक “फुंकणाऱ्या” लोकांसाठी एक स्पेशल खोली आहे,तिथे कॉफी घेवून गेलो होतो.एक म्हातारी आजी बराच वेळ वाट बघत असलेली दिसली.तिला मी कॉफी दिली.मला माझ्या आजीची आठवण आली
मला म्हणाली,
” मला एक पाव आणि मटण प्लेट मिळेल काय?”
तिचा तो पेहराव आणि चेहऱ्यावरून ती एक दोन दिवस उपाशी असल्या सारखी दिसली.मी तिला एक पाव आणि आमलेट आणून दिलं.मी खोटं खोटंच तिला सांगितलं की एका गिऱ्हाईकाने त्याची ऑरडर कॅनसेल केली ते मी तुला आणून दिलं. खावून झाल्यावर ढेकर देत ती मला म्हणाली,
” मला पाचएक रुपये मिळतील काय?”
मी माझ्या टिप मधली मिळकत तिला दिली.
मला म्हणाली,
“मी परत आल्यावर तुझे पैसे परत करीन.”
असं म्हणत ती आनंदी चेहरा करून मेन दरवाजातून निघून गेली.
ती तिन आठवड्यानंतर ती सकाळीच आली आणि माझे पैसे देवून गेली.तिला कुठेतरी काम मिळाल्याने तिच्या कमाईतून तिने मला पैसे दिले.मला तिने सकाळचा ब्रेकफास्ट पण देऊ केला.
मी त्या वेटरला म्हणालो,
” ह्यातून तू काय शिकलास?”
मला तो वेटर सांगू लागला,
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.
मी गिऱ्हाईकाला कॉफी देताना त्याच्या नजरेशी नजर मिळवतो,”कसं काय?” म्हणून विचारतो.आणि मग तो काय म्हणतो ते ऐकतो.माझा जॉब गिऱ्हाईकाची सेवा करण्याचा आहे पण मला वाटतं ह्यातून एकमेकाचा दुवाही साधला जातो आणि एकमेकाच्या मदतीला हात पुढेही करता येतो.”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, May 28, 2008
थोडक्यात, न विचारलेला विचार.
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे”
यालाच,
”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात.
जीवनात,
”कधी खुषी कधी गम”
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
“नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “
असं म्हणता,म्हणता
“कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”
असं म्हणे पर्यंत,
”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार”
असं म्हणताना
“जीवनात ही घडी अशीच राहूदे”
असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही.
आणि,नंतर
“थकले रे नंदलाला”
असं म्हणायला काहिही वाटत नाही.
”जन पळभर म्हणतील हाय,हाय “
म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत
“आम्ही जातो अमुच्या गांवा”
म्हणावं लागतं,
थोडक्यांत काय
”फिरून जन्मेन मी”
असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं.
असं जाणकार म्हणतात.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
यालाच,
”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात.
जीवनात,
”कधी खुषी कधी गम”
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
“नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “
असं म्हणता,म्हणता
“कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”
असं म्हणे पर्यंत,
”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार”
असं म्हणताना
“जीवनात ही घडी अशीच राहूदे”
असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही.
आणि,नंतर
“थकले रे नंदलाला”
असं म्हणायला काहिही वाटत नाही.
”जन पळभर म्हणतील हाय,हाय “
म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत
“आम्ही जातो अमुच्या गांवा”
म्हणावं लागतं,
थोडक्यांत काय
”फिरून जन्मेन मी”
असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं.
असं जाणकार म्हणतात.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
अरे! माझ्या भोळ्या मना
अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
उमेदीने भरल्या मना मधे
जखमाना जरा जागा दे
भडकलेल्या निखाऱ्याना
थंड अशी झुळक दे
होवूनी जावू दे हवे तर
हे जीवन कथेचा खजाना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
साधणार काय फिरयाद करूनी
मिळणार काय अश्रू ढाळूनी
निष्फळ आहे हे सगळे
होणार असे काय निराळे
क्षणभरात अपुले होईल
काय हे कळेना
अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
दुःखाने तू घाबरू नको ना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
उमेदीने भरल्या मना मधे
जखमाना जरा जागा दे
भडकलेल्या निखाऱ्याना
थंड अशी झुळक दे
होवूनी जावू दे हवे तर
हे जीवन कथेचा खजाना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
साधणार काय फिरयाद करूनी
मिळणार काय अश्रू ढाळूनी
निष्फळ आहे हे सगळे
होणार असे काय निराळे
क्षणभरात अपुले होईल
काय हे कळेना
अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, May 26, 2008
सुखाची निवड
“जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.”
शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा व्याधि असूं शकतो हे तिथे कसं कुणाला माहित असावं. मग अशी व्यक्ति जरा विक्षिप्त वागू लागली की त्याला फक्त वेड्यात काढणं ह्याच्या सारखं दुसरं अनुमान असूच शकत नाही ही भावना सर्वांच्या मनात राहिल्यास त्यासाठी कुणाला दोष देणार.मग मृणालीसारख्या चतुर,प्रेमळ मुलीला डॉक्टर रमेश शिरवईकरने समजावून सांगितल्यावर तिच्या उभ्या आयुष्यात परिवर्तन झाल्यास काय नवल.आणि हा योगायोग यायला मृणालिनीचं नशिबच कारण असावं.
डॉक्टर शिरवईकर आणि मृणालिनीचा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत शिरोड्याला गेले होते.त्यावेळी मृणालीच्या मुलाला पाहून डॉक्टर तिच्या भावला म्हणाला ह्या मुलाला Autism चा व्याधि आहे. आणि ही सर्व गोष्ट तिने मला अलिकडेच सांगितली.
मला म्हणाली,
“पुर्वी मी विश्वास करत असायची की अनिश्चीत-भविष्यचक्र माझं भविष्य ठरवित असावं.कधी चांगलं म्हणून तर कधी वाईट म्हणून.मी मला भवितव्याचाच बळी झालेली समजत असे.माझं आयुष्य जणू एक कच्चा दोरा आहे असं संभोधून त्याला माझ्या अनिश्चित जगात मनमानेल तसं गरगर फिरवावा,मोजावा आणि निष्टूर होवून तोडूनही टाकावा.आता मी जरा नव्याने विश्वास करू लागले आहे.मला वाटतं,सुखी असणं ही आपली स्वतःची निवड आहे.
नऊ वर्षापुर्वी माझ्या लक्षात आलं की सुखाची निवड करणं न करणं हे माझ्या ताकदीवर अवलंबून आहे.माझा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर खूपच बडबड करायचा.पण आपल्याच विश्वात असायचा.आजुबाजुचं त्याला कसलंच ध्यान नसायचं.एका जाग्यावर बसायचा नाही.एकडून तिकडे पळत सुटायचा.विनाकारण ओरडायचा.थोडक्यात आजुबाजुच्याला नाही म्हटलं तरी त्रास होईल असं करायचा.शाळेतून त्याच्या बद्दल शिक्षकाच्या खूप तक्रारी यायच्या.
मी हे सर्व बघून पुर्ण गर्भगळीत झाले.सारख्या नकारात्मक भावना माझ्या मनात येऊ लागल्या.दुःख,हतबलता,राग आणि दुसवास ह्या गोष्टी मनात सतत घर करून राहिल्या.त्याचा माझ्या प्रकृतीवर पण दुष्परिणाम होवू लागला.आल्यागेल्याशी माझे संबंध दुरावले.
हळुहळु मला वाटू लागलं,की सुख हे माझ्या नशिबातच नाही.
अशा ह्या माझ्या अत्यंत कठिण प्रसंगी डॉक्टर शिरवईकरानी माझे डोळे उघडले.त्यानी मला एक गिफ्ट दिली.ते एक पुस्तक होतं.मला माझ्या मानसिक धक्क्यातून उत्तेजीत करण्यासाठी त्या पुस्तकात बरंच काही लिहिलं होतं.मला त्यांच खूपच कौतुक वाटल.
मला आठवतं मी खूप सद्गदीत झाले.एखादा पुस्तकातला विषय वाचून झाल्यावर माझ्या विचारात मला मदत करू शकेल असं त्यांना वाटावं ह्याने मी थोडी खजील झाले.मी रात्र जागून ते पुस्तक वाचून काढलं.कसं का होईना त्यांच्या त्या छोट्याश्या कृतीचा आणि अपेक्षा आणि अपेक्षाभंग होण्याबाबतच्या त्या पुस्तकात असलेल्या विषयाबद्दल विचार करून मला नक्कीच वाटलं,की मी माझी परिस्थिती जरी बदलू शकली नाही तरी मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात बदल करू शकते.
कालांतराने मी माझी पुर्वीच्या मनस्थितीला विसरून जाण्याची धडपड करू लागले.कुणाशीही दुसवास करायचं मी सोडून दिलं.आणि मुलाला घरीच शिकवायला लागले. माझ्या मधेच मनःशांति आणण्याचे उपाय मी करू लागले.
आता मला वाटू लागलं की सुख मिळणं दुरापास्थ नाही.आपलं भवितव्य हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे अघटीत घटनेवर नाही.मला आता कळून चुकलं की आपण कसलाच अपराध केला नाही अशी समजूत करून किंवा यातना आपल्याला होणार नाहीत अशी समजूत करून घेवून सुद्धा सुख हे पटकन मिळणारं भाग्य नाही.माझ्या जीवनातल्या अत्यंत कठीण समयामुळे नवा मुद्दा मला दिसू लागला. जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा व्याधि असूं शकतो हे तिथे कसं कुणाला माहित असावं. मग अशी व्यक्ति जरा विक्षिप्त वागू लागली की त्याला फक्त वेड्यात काढणं ह्याच्या सारखं दुसरं अनुमान असूच शकत नाही ही भावना सर्वांच्या मनात राहिल्यास त्यासाठी कुणाला दोष देणार.मग मृणालीसारख्या चतुर,प्रेमळ मुलीला डॉक्टर रमेश शिरवईकरने समजावून सांगितल्यावर तिच्या उभ्या आयुष्यात परिवर्तन झाल्यास काय नवल.आणि हा योगायोग यायला मृणालिनीचं नशिबच कारण असावं.
डॉक्टर शिरवईकर आणि मृणालिनीचा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत शिरोड्याला गेले होते.त्यावेळी मृणालीच्या मुलाला पाहून डॉक्टर तिच्या भावला म्हणाला ह्या मुलाला Autism चा व्याधि आहे. आणि ही सर्व गोष्ट तिने मला अलिकडेच सांगितली.
मला म्हणाली,
“पुर्वी मी विश्वास करत असायची की अनिश्चीत-भविष्यचक्र माझं भविष्य ठरवित असावं.कधी चांगलं म्हणून तर कधी वाईट म्हणून.मी मला भवितव्याचाच बळी झालेली समजत असे.माझं आयुष्य जणू एक कच्चा दोरा आहे असं संभोधून त्याला माझ्या अनिश्चित जगात मनमानेल तसं गरगर फिरवावा,मोजावा आणि निष्टूर होवून तोडूनही टाकावा.आता मी जरा नव्याने विश्वास करू लागले आहे.मला वाटतं,सुखी असणं ही आपली स्वतःची निवड आहे.
नऊ वर्षापुर्वी माझ्या लक्षात आलं की सुखाची निवड करणं न करणं हे माझ्या ताकदीवर अवलंबून आहे.माझा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर खूपच बडबड करायचा.पण आपल्याच विश्वात असायचा.आजुबाजुचं त्याला कसलंच ध्यान नसायचं.एका जाग्यावर बसायचा नाही.एकडून तिकडे पळत सुटायचा.विनाकारण ओरडायचा.थोडक्यात आजुबाजुच्याला नाही म्हटलं तरी त्रास होईल असं करायचा.शाळेतून त्याच्या बद्दल शिक्षकाच्या खूप तक्रारी यायच्या.
मी हे सर्व बघून पुर्ण गर्भगळीत झाले.सारख्या नकारात्मक भावना माझ्या मनात येऊ लागल्या.दुःख,हतबलता,राग आणि दुसवास ह्या गोष्टी मनात सतत घर करून राहिल्या.त्याचा माझ्या प्रकृतीवर पण दुष्परिणाम होवू लागला.आल्यागेल्याशी माझे संबंध दुरावले.
हळुहळु मला वाटू लागलं,की सुख हे माझ्या नशिबातच नाही.
अशा ह्या माझ्या अत्यंत कठिण प्रसंगी डॉक्टर शिरवईकरानी माझे डोळे उघडले.त्यानी मला एक गिफ्ट दिली.ते एक पुस्तक होतं.मला माझ्या मानसिक धक्क्यातून उत्तेजीत करण्यासाठी त्या पुस्तकात बरंच काही लिहिलं होतं.मला त्यांच खूपच कौतुक वाटल.
मला आठवतं मी खूप सद्गदीत झाले.एखादा पुस्तकातला विषय वाचून झाल्यावर माझ्या विचारात मला मदत करू शकेल असं त्यांना वाटावं ह्याने मी थोडी खजील झाले.मी रात्र जागून ते पुस्तक वाचून काढलं.कसं का होईना त्यांच्या त्या छोट्याश्या कृतीचा आणि अपेक्षा आणि अपेक्षाभंग होण्याबाबतच्या त्या पुस्तकात असलेल्या विषयाबद्दल विचार करून मला नक्कीच वाटलं,की मी माझी परिस्थिती जरी बदलू शकली नाही तरी मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात बदल करू शकते.
कालांतराने मी माझी पुर्वीच्या मनस्थितीला विसरून जाण्याची धडपड करू लागले.कुणाशीही दुसवास करायचं मी सोडून दिलं.आणि मुलाला घरीच शिकवायला लागले. माझ्या मधेच मनःशांति आणण्याचे उपाय मी करू लागले.
आता मला वाटू लागलं की सुख मिळणं दुरापास्थ नाही.आपलं भवितव्य हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे अघटीत घटनेवर नाही.मला आता कळून चुकलं की आपण कसलाच अपराध केला नाही अशी समजूत करून किंवा यातना आपल्याला होणार नाहीत अशी समजूत करून घेवून सुद्धा सुख हे पटकन मिळणारं भाग्य नाही.माझ्या जीवनातल्या अत्यंत कठीण समयामुळे नवा मुद्दा मला दिसू लागला. जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, May 24, 2008
दाखविली मातेची व्यथा कौतुके
तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी
वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी
शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी
गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले
शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला
मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला
शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी
सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने
म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”
नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी
एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली
(एका लेखाच्या आधारावर काव्य माझे)
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी
वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी
शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी
गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले
शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला
मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला
शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी
सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने
म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”
नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी
एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली
(एका लेखाच्या आधारावर काव्य माझे)
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, May 22, 2008
अंजली अंजली तूच माझी रागिणी
अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली
प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी
जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन
भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची
प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कविना माझी ही कवितांजली
पाहिले तुला जेव्हां झालो तुझा तेव्हां
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली
प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी
जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन
भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची
प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कविना माझी ही कवितांजली
पाहिले तुला जेव्हां झालो तुझा तेव्हां
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
