प्रोफेसर देसाई आज जरा खुषीत दिसले.मला म्हणाले,
“सामंत, तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चं “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटतं बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात. दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ करण्याचं काही झालं तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत? त्यांची “एकॉनॉमीच” म्हणे तशीच आहे.क्रेडीट कार्डावर कर्ज घ्या. फेडायचा विचार सध्या करूं नका.कमीत कमी हाप्ता फेडत चला.पुढचं पुढे.त्यामुळे जो तो आपला पैसा खर्च करतो.गिफ्ट द्दा, गिफ्ट घ्या पण खरेदी करा.
अहो,प्रे.बुशने तर ९/११ झाल्यावर चक्क सांगितलं,
“खर्च करा,घरी बसू नका.हिंडा फिरा.”
शेवटी पैशासाठी हवरटपणा एव्हडा वाढला की कुणाची पैसे परत फेडायची लायकी असो वा नसो “कर्ज काढा, घरं घ्या” असा संदेश देत कर्ज देणारे मागे लागले.आणि शेवटी काय झालं सर्व एकॉनॉमी कोसळली. आणि आता पुढचं रामायण सर्वश्रूत आहे.आता सगळे “बचत करा बचत करा” म्हणून सांगायला लागलेत.
अहो आपले संस्कार म्हणजे काटकसर करा.अंथरूण बघून पाय पसरा.पैशाचा अपव्यय करूं नका.बचत केलीत तर कधी पुढे अडीअडचणीत तिचा उपयोग होईल.ऋण काढून सण करूं नका.सर्वच दिवस सारखे नसतात…..वगैरे वगैरे एक ना दोन सांगणी असतात.
ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.”
असं म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.
अमेरिकन फन
पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शहेन्शहा शहांजहा म्हणे
ऐष- आरामात रहात असे
करातून आलेल्या मिळकतीतून
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल बांधायला
त्याला कसलीच अडचण नसे
आपले बुजुर्ग सांगत आले
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, March 30, 2009
Saturday, March 28, 2009
ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?
”अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो,
“काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?”
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं.
लागलीच ती मला म्हणाली,
मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे. एखाद्दा शहरी मोठ्या शाळेतल्या मुलांच्या ज्ञानाच्या जरूरी एव्हड्या ह्या शाळेतल्या मुलांच्या आवश्यक्यता असतात.त्यांच्या पूर्वपीठिका आणि त्यांच्या गरजा आव्ह्यानात्मक असतात आणि वास्तविक असतात.त्यामुळे त्याचे परिणाम त्यांचं आचरण एक ना एक प्रकारे असुकर करतात.
मी तिला म्हणालो,
“मागे एकदा तू मला तुझ्या वर्गातल्या एका मुली बद्दल सांगितलं होतंस.आता ती बरीच मोठी तरूणी झाली असेल.”
ह्याची आठवण दिल्यावर अलका म्हणाली,
“त्या विद्दार्थीनीने माझ्या मनात कायमची छाप ठेवली आहे.दहा वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही ह्या शाळेचं उध्घाठन केलं त्यावेळच्या त्या लहानश्या वर्गापासून ती होती.
एक दिवशी तिने मला तिला घरी वागणूक कशी मिळते त्याचं वर्णन करून सांगितलं होतं त्याची आठवण येऊन आता ही माझ्या अंगावर कांटा येतो.आम्ही तिच्या त्या वातावरणात बदल घडवून आणला तरी त्याची झालेली क्षती दूरगामी आणि कायम स्वरूपाची होती. मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?
माझ्या वर्गातल्या खूर्चीच्यामागे एका फळीवर माझ्या पसंतीची एक उक्ति लिहिलेली होती.
“आपण मोठमोठाल्या गोष्टी करूं शकणार नसूं पण फक्त लहान लहान गोष्टी विशेष प्रेमाने करूं शकतो.”
असे बरेच दिवस यायचे की मी निराश व्हायची पण जेव्हा त्या फळीवरच्या “प्रेमाने” ह्या शब्दावर नजर जायची तेव्हा त्याने माझ्या स्मृती जागृत व्हायच्या आणि त्या शब्दाचं प्रभूत्व मनावर बिंबायचं.”
मी अलकाला म्हणालो,
“पण सगळेच काही प्रेम करून घेण्याच्या लायकीचे नसतात.असं मला वाटतं.”
त्यावर ती म्हणते कशी,
“मला वाटतं,जे प्रेम करून घ्यायला कठीण आहेत अशांवर प्रेम करणं म्हणजे महाकठिण आणि फार खास काम असतं.तो दिवस संपून गेल्यावर वाटायचं की निदान मी प्रयत्न तरी केला. मी आराधाना करायचे की निदान मी प्रयत्न करण्याची पराकाष्टा तरी केली असं माझ्या विद्दार्थ्यानां वाटावं आणि अनेक वेळां न झाल्यास मला त्यांनी माफ करावं.”
“तुम्हा शिक्षाकांचं एक बरं असतं,हे सर्व विद्दार्थी आणि विद्दार्थिनी मोठी झाल्यावर तुम्हाला माहित नसेल त्यापेक्षा तुमच्याशी उपकृत असतात.”सारांश “सिनेमातला तो मंत्री आणि मुलाच्या अस्थी परदेशातून आल्यावर वेळेवर मिळत नाहित म्हणून बेजार झालेले ते त्याचे वडील पण त्या मंत्र्याचे गुरूजी,ह्यातला संवाद आठवला की “धन्य तो शिक्षकी पेशा असं मला वाटायचं.”
माझं हे उदाहरण ऐकून काही तरी तिचा अनुभव तिला सांगावासा वाटला.
अलका मला म्हणाली ह्याच संदर्भाने मला तुम्ही आठवण करून दिलीत तो किस्सा सांगते,
“अलिकडेच एका दिवशी लंच घेतानाची आठवण झाली.माझे बाकी शिक्षक सहकारी एका उमद्दा होतकरू क्रिकेटपटू बद्दल चर्चा करीत होते.तो माझा विद्दार्थी होता असं मी त्यांना अभिमानाने सांगत होते.आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं.
त्याच दिवशी संध्याकाळी वर उल्लेखलेली आता एक तरूणी झालेली मुलगी तिच्या मित्राला घेऊन मला भेटायला आली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी हंसली आणि ती लगेचच म्हणाली,
” ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं.”
मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले.तिच्या त्या एका वास्तविक विवरणावर मी जरी जगातले सर्व क्रिकेटपटू ओवाळून टाकले असते तरी ते स्विकृती लायक नव्हते.”
मला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला.म्हणूनच मी तिला म्हणालो,
” अलका,तुम्हा शिक्षकांच्या परंपरा असतात.आणि तुमचे विद्दार्थी आणि विद्दार्थिनी आपल्या मनात त्या जोपासून ठेवीत असतात नाही काय?”
अलका म्हणते,
“दिवसाच्या शेवटी किंवा आपल्या आयुष्याचा अखेरीस श्रेष्टतेची व्याख्या मौलिक अर्थाने भ्रामिकच असावी.मला वाटतं,जी व्यक्ति माझ्या समोर आहे त्या व्यक्तिवर मी प्रेम करण्याची आवश्यकता आहे.कदाचीत पुढे कधी तरी अशी ही प्रेम केलेली व्यक्ति येईल एक दिवशी आणि सांगेल,
”त्यामुळे फरक पडला.”
कदाचीत ती व्यक्ति तसं सांगणारही नाही.इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यासारखं काही माझं जीवन नाही.पण माझं नांव, ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्यांच्या कदाचीत हृदयात लिहिण्यासारखं राहिल. ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला? “
खरंच किती सत्य आहे अलकाच्या म्हणण्यात!
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
“काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?”
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं.
लागलीच ती मला म्हणाली,
मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे. एखाद्दा शहरी मोठ्या शाळेतल्या मुलांच्या ज्ञानाच्या जरूरी एव्हड्या ह्या शाळेतल्या मुलांच्या आवश्यक्यता असतात.त्यांच्या पूर्वपीठिका आणि त्यांच्या गरजा आव्ह्यानात्मक असतात आणि वास्तविक असतात.त्यामुळे त्याचे परिणाम त्यांचं आचरण एक ना एक प्रकारे असुकर करतात.
मी तिला म्हणालो,
“मागे एकदा तू मला तुझ्या वर्गातल्या एका मुली बद्दल सांगितलं होतंस.आता ती बरीच मोठी तरूणी झाली असेल.”
ह्याची आठवण दिल्यावर अलका म्हणाली,
“त्या विद्दार्थीनीने माझ्या मनात कायमची छाप ठेवली आहे.दहा वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही ह्या शाळेचं उध्घाठन केलं त्यावेळच्या त्या लहानश्या वर्गापासून ती होती.
एक दिवशी तिने मला तिला घरी वागणूक कशी मिळते त्याचं वर्णन करून सांगितलं होतं त्याची आठवण येऊन आता ही माझ्या अंगावर कांटा येतो.आम्ही तिच्या त्या वातावरणात बदल घडवून आणला तरी त्याची झालेली क्षती दूरगामी आणि कायम स्वरूपाची होती. मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?
माझ्या वर्गातल्या खूर्चीच्यामागे एका फळीवर माझ्या पसंतीची एक उक्ति लिहिलेली होती.
“आपण मोठमोठाल्या गोष्टी करूं शकणार नसूं पण फक्त लहान लहान गोष्टी विशेष प्रेमाने करूं शकतो.”
असे बरेच दिवस यायचे की मी निराश व्हायची पण जेव्हा त्या फळीवरच्या “प्रेमाने” ह्या शब्दावर नजर जायची तेव्हा त्याने माझ्या स्मृती जागृत व्हायच्या आणि त्या शब्दाचं प्रभूत्व मनावर बिंबायचं.”
मी अलकाला म्हणालो,
“पण सगळेच काही प्रेम करून घेण्याच्या लायकीचे नसतात.असं मला वाटतं.”
त्यावर ती म्हणते कशी,
“मला वाटतं,जे प्रेम करून घ्यायला कठीण आहेत अशांवर प्रेम करणं म्हणजे महाकठिण आणि फार खास काम असतं.तो दिवस संपून गेल्यावर वाटायचं की निदान मी प्रयत्न तरी केला. मी आराधाना करायचे की निदान मी प्रयत्न करण्याची पराकाष्टा तरी केली असं माझ्या विद्दार्थ्यानां वाटावं आणि अनेक वेळां न झाल्यास मला त्यांनी माफ करावं.”
“तुम्हा शिक्षाकांचं एक बरं असतं,हे सर्व विद्दार्थी आणि विद्दार्थिनी मोठी झाल्यावर तुम्हाला माहित नसेल त्यापेक्षा तुमच्याशी उपकृत असतात.”सारांश “सिनेमातला तो मंत्री आणि मुलाच्या अस्थी परदेशातून आल्यावर वेळेवर मिळत नाहित म्हणून बेजार झालेले ते त्याचे वडील पण त्या मंत्र्याचे गुरूजी,ह्यातला संवाद आठवला की “धन्य तो शिक्षकी पेशा असं मला वाटायचं.”
माझं हे उदाहरण ऐकून काही तरी तिचा अनुभव तिला सांगावासा वाटला.
अलका मला म्हणाली ह्याच संदर्भाने मला तुम्ही आठवण करून दिलीत तो किस्सा सांगते,
“अलिकडेच एका दिवशी लंच घेतानाची आठवण झाली.माझे बाकी शिक्षक सहकारी एका उमद्दा होतकरू क्रिकेटपटू बद्दल चर्चा करीत होते.तो माझा विद्दार्थी होता असं मी त्यांना अभिमानाने सांगत होते.आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं.
त्याच दिवशी संध्याकाळी वर उल्लेखलेली आता एक तरूणी झालेली मुलगी तिच्या मित्राला घेऊन मला भेटायला आली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी हंसली आणि ती लगेचच म्हणाली,
” ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं.”
मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले.तिच्या त्या एका वास्तविक विवरणावर मी जरी जगातले सर्व क्रिकेटपटू ओवाळून टाकले असते तरी ते स्विकृती लायक नव्हते.”
मला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला.म्हणूनच मी तिला म्हणालो,
” अलका,तुम्हा शिक्षकांच्या परंपरा असतात.आणि तुमचे विद्दार्थी आणि विद्दार्थिनी आपल्या मनात त्या जोपासून ठेवीत असतात नाही काय?”
अलका म्हणते,
“दिवसाच्या शेवटी किंवा आपल्या आयुष्याचा अखेरीस श्रेष्टतेची व्याख्या मौलिक अर्थाने भ्रामिकच असावी.मला वाटतं,जी व्यक्ति माझ्या समोर आहे त्या व्यक्तिवर मी प्रेम करण्याची आवश्यकता आहे.कदाचीत पुढे कधी तरी अशी ही प्रेम केलेली व्यक्ति येईल एक दिवशी आणि सांगेल,
”त्यामुळे फरक पडला.”
कदाचीत ती व्यक्ति तसं सांगणारही नाही.इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यासारखं काही माझं जीवन नाही.पण माझं नांव, ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्यांच्या कदाचीत हृदयात लिहिण्यासारखं राहिल. ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला? “
खरंच किती सत्य आहे अलकाच्या म्हणण्यात!
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, March 26, 2009
दिवस जूने भुलायचे
आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला सुंदर दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला.नवीन कायदा पास करून हेल्थ स्कीममधे सिनियर सिटीझनना ही सवलत दिली गेली.
भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले,
“आमचे जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.आता काळजी वाचून जगायला हरकत नाही.”
उद्दा जेव्हा तळ्यावर भेटू तेव्हा एक कविता लिहून आणा जी ह्या घटनेशी समर्पक असेल.मला त्यांचे “दिवस भुलायचे,काळजीवाचून जगायचे” हे शब्द सारखे मनात घोळू लागले.आणि पाडगांवकरांच्या त्या गाण्याची याद आली.
(दिवस तुझे फुलायचे
झोपाळ्यावांचून झुलायचे)
आणि मग अशी कविता सुचली.ती ऐकून दुसर्या दिवशी प्रो.देसाई फारच खूष झाले.
दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे
झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे
थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे
माझ्या ह्या खूर्ची पाशी
थांब तूं गं! जराशी
पापण्या मिटून हंसायचे
काळजी वाचून जगायचे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले,
“आमचे जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.आता काळजी वाचून जगायला हरकत नाही.”
उद्दा जेव्हा तळ्यावर भेटू तेव्हा एक कविता लिहून आणा जी ह्या घटनेशी समर्पक असेल.मला त्यांचे “दिवस भुलायचे,काळजीवाचून जगायचे” हे शब्द सारखे मनात घोळू लागले.आणि पाडगांवकरांच्या त्या गाण्याची याद आली.
(दिवस तुझे फुलायचे
झोपाळ्यावांचून झुलायचे)
आणि मग अशी कविता सुचली.ती ऐकून दुसर्या दिवशी प्रो.देसाई फारच खूष झाले.
दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे
झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे
थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे
माझ्या ह्या खूर्ची पाशी
थांब तूं गं! जराशी
पापण्या मिटून हंसायचे
काळजी वाचून जगायचे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, March 24, 2009
तो होता देवाचा स्विमिंगपूल
हेमंत माहात्मे काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
“डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरिरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं.”
असं सद्गदीत होऊन हेमंत मला म्हणाला.
“रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी फाटकी पिशवी फेकून देण्यासारखी असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.”
असं तो त्याच्या आजोबांना म्हणाला.
“डॉक्टरांची चूक नाही म्हणा.संवयीचा परिणाम.”
हे सर्व हेमूकडून ऐकून त्यांच्या नातवाच्या मनातली भावना कवितेत सुचली.
कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय
गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरिर
अमुच्या चिमुकल्या गादिवर
पोसलीस तू आम्हा किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने
भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल
करू नको गे! दुःख त्याचे
रीत आहे ही निसर्गाची
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावतो झडकर
द्दा टाकून झाला वापर
असेच म्हणती ते डॉक्टर
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
“डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरिरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं.”
असं सद्गदीत होऊन हेमंत मला म्हणाला.
“रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी फाटकी पिशवी फेकून देण्यासारखी असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.”
असं तो त्याच्या आजोबांना म्हणाला.
“डॉक्टरांची चूक नाही म्हणा.संवयीचा परिणाम.”
हे सर्व हेमूकडून ऐकून त्यांच्या नातवाच्या मनातली भावना कवितेत सुचली.
कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय
गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरिर
अमुच्या चिमुकल्या गादिवर
पोसलीस तू आम्हा किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने
भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल
करू नको गे! दुःख त्याचे
रीत आहे ही निसर्गाची
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावतो झडकर
द्दा टाकून झाला वापर
असेच म्हणती ते डॉक्टर
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, March 22, 2009
“अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर”
“अमेरिकेत प्रथमच येणार्यांनी आपले जुने संस्कार न विसरता रहावं.तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्यात सुधारणा करून घ्यावी.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच आपण पंचाईत करून घेत असतो. नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही.अहो गाईचं मांस,डुकराचं मांस मिळालं म्हणून आपण खायचं काय?ते न खाता इकडे जगतां येत नाही काय?दुसरं इकडे ऋण काढून सण करण्याची प्रथा आहे.अहो अंथरूण बघून पाय पसरायला नको काय?अलिकडे एकॉनॉमीचा बट्याबोळ झाल्यावर इकडच्या लोकांना आता जरा जरा कळायला लागलंय. निगेटिव्ह सेव्हिंग असणार्या लोकांनी आता पांच परसेन्ट पर्यंत सेव्हिंग केलं आहे म्हणे. अहो,ह्यां लोकात पैशाचा हावरटपणा वाढल्याने हे असं झालंय ते त्यांना कळलंय आता.क्रेडिट कार्डावर हवे तसे पैसे मिळतात म्हणून आवाक्या बाहेर कर्ज काढून आता नोकर्या गेल्यावर कर्जबाजारी होऊन दिवाळी काढीत राहले आहेत.ह्यात आपल्या लोकांचं प्रमाण त्या मानाने कमी जरी असलं तरी आहे.आणि वाटेल तसं फास्ट फूड खावून-स्वस्तात मिळतं म्हणून - मध्यम वर्गीय आणि गरिब लोक लठ्ठ होत राहिले आहेत.अहो, ह्या मासांत प्रोटिन्स अफलातून असतात.ते हजम करायला एक्झरसाईझ घेतला पाहिजे पण आहे कुणाला वेळ.? अनावश्यक लठ्ठपणा कसा होत आहे हे पण आता एकडच्या आरोग्य संभाळणार्या लोकाना कळलं आहे.”
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.मी त्याना म्हणालो,
” हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र्य आहे.मूभा आहे.संस्काराबद्दल म्हणालात तर,
“कायदा न मोडता तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा”
हेच इकडचे संस्कार आहेत.
कसले संस्कार घेऊन बसलात भाऊसाहेब?”
असं मी त्याना म्हणालो.
थोडेसे नाराज होऊन मला म्हणाले,
”सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का?
” अरे संसार संसार ” तेच शब्द् “अरे संस्कार संस्कार” अशा अर्थाने माझ्या मनांत घोळत आहेत.
बहिणाबाईने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे?तसंच काही तरी संस्कारावर लिहा.”
पुढल्या खेपेला भेटलो तेव्हा त्यांना मी ही कविता वाचून दाखवली.
अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!
अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!
अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता इथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!
अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!
अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!
अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishanas@gmail.com
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.मी त्याना म्हणालो,
” हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र्य आहे.मूभा आहे.संस्काराबद्दल म्हणालात तर,
“कायदा न मोडता तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा”
हेच इकडचे संस्कार आहेत.
कसले संस्कार घेऊन बसलात भाऊसाहेब?”
असं मी त्याना म्हणालो.
थोडेसे नाराज होऊन मला म्हणाले,
”सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का?
” अरे संसार संसार ” तेच शब्द् “अरे संस्कार संस्कार” अशा अर्थाने माझ्या मनांत घोळत आहेत.
बहिणाबाईने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे?तसंच काही तरी संस्कारावर लिहा.”
पुढल्या खेपेला भेटलो तेव्हा त्यांना मी ही कविता वाचून दाखवली.
अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!
अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!
अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता इथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!
अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!
अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!
अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishanas@gmail.com
Friday, March 20, 2009
अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.
”सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे.”
माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा.
त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली.
मी त्याला म्हणालो,
“सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला तुझ्या वकिली पेशात बरीच उपयोगी होत असेल.”
मला म्हणाला,
” हो मला सत्याचा पाठपुरावा केल्याशिवाय चैन पडत नाही.ती पैज हरल्याचं अजून मला लागतं.पण त्यानंतर मी अयशस्वी झालो तरी सत्याचा पाठपुरावा सोडत नाही. “
मी काही तरी दहा वर्षाचा असेन.आमच्या शेजारच्या एका मुलाला जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्याला मी विचारलं,
“वेसावं हे ठाण्याच्या पश्चिमेला जास्त आहे की बोरिवली पश्चिमेला जास्त आहे?.”
त्याचं म्हणणं बोरिवली.पण खरं उत्तर वेसावं आहे. त्याच्या उत्तराची त्याला इतकी खात्री होती की तो माझ्याशी पैज मारायला तयार झाला.
मला म्हणाला,
“लागली शंभर रूपयांची पैज”
मी घरातून नकाशा आणला.त्याकडे पाहून तो मला म्हणाला,
“हा नकाशाच चमत्कारीक आहे”
खरं तसं नव्हतं.
मी त्याला म्हणालो,
“अरबी समुद्राला उत्तर दक्षिण समांतर रेष काढलीस तर वेसावं,रेषेच्या समुद्राच्या बाजूला जास्त दिसतं.आणि समुद्र हा रेषेच्या पश्चिमेला आहे हे निश्चित.
त्याचं म्हणणं ती रेषा काही कामाची नाही.कारण ती समुद्रातून जात नाही.मी त्याला म्हणालो,
” ह्या उत्तर दक्षिण समांतर रेषा असतात त्या दोन ठिकाणामधे कोणतं ठिकाण पूर्वेला किंवा पश्चिमेला आहेत ते दाखवतात.आणि ह्या रेषा जमिनीवर आहेत की समुद्रात आहेत याचा फरक पडत नाही.”
मला एक दुस्तर अडचण होती. तो माझ्यापेक्षां गलेलठ्ठ होता.म्हणून मला चूप बसावं लागलं.
ह्या लहानशा गोष्टीतून मी बर्याच निष्कर्षाला आलो.
सत्य ही एक चीज आहे.परंतु,बरेच वेळां,त्याकडे आपण अबाधीत स्वारस्य ठेवून दुर्लक्ष तरी करतो किंवा सरळ सरळ त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो.दूसरं म्हणजे एखाद्दा गोष्टीवर विचार केला म्हणून ती गोष्ट खरी होत नाही.
सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे आणि सत्याला मागोवा असतो.खरंच काय झालं?.खरंच जे आहे त किती खरं आहे?.असा तो मागोवा असतो. त्याचा पाठपुरावा करावा लागतो.
पंधरा वर्षापूर्वी मी अशाच एका निरपराध व्यक्तिच्या कथेवर लडखडलो होतो.वकिली हा माझा पेशा असल्याने त्याला मरणाच्या दाढेतून ओढून काढायाला यशस्वी झालो.ते जरी माझं हार्डवर्क होतं,तरी त्यात माझं थोडं लक होतं आणि रोगविज्ञान संबंधी एक डोक्यात सणकही होती. शेवटी त्यात मी यशस्वी झालो.
मी त्या गोष्टीच्या मागे लागण्याचं कारण मला वाटायचं सर्व प्रश्नांना उत्तरं असावीत.”त्यानेच ते केलं काय?”,”तो अपराधी होता की निरपराधी?” “त्याने ते केलं नसेल तर कुणी केलं?”
अशी सर्व छान-बिन केल्यावर मला यश मिळालं.आपण छान-बिन करतो त्यात कधी यश येतं कधी येत नाही.अगोदरचं कळायला काही मार्ग नसतो.प्रश्नांना उत्तरं असणार असं मनात आणून मार्गस्थ व्हावं लागतं.उत्तर मिळेल अशा तत्वावर भरवंसा ठेवून पुढाकार घ्यावा लागतो उत्तर जरी मिळालं नाही तरी. उत्तराला पर्याय मात्र अस्वीकारणीय असतो.
मला कधीच माहित होणार नाही की त्या शेजारच्या मुलाला वेसावं,बोरीवलीच्या दिशेच्या संबंधाने माझ्या भावार्थाचं तर्कट खरं कळलं की नाही.किंवा त्याला सर्व कळलेलं होतं पण तो कबूल करायला तयार नव्हता.किंवा ते त्याला कळलं असेल पण त्याला पैजेचे पैसे द्दायचे नव्हते.मला हे कदापीही कळणार नाही.
एव्हडंच मला कळलं होतं की माझे शंभर रूपये मला मिळाले नाहीत.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा.
त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली.
मी त्याला म्हणालो,
“सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला तुझ्या वकिली पेशात बरीच उपयोगी होत असेल.”
मला म्हणाला,
” हो मला सत्याचा पाठपुरावा केल्याशिवाय चैन पडत नाही.ती पैज हरल्याचं अजून मला लागतं.पण त्यानंतर मी अयशस्वी झालो तरी सत्याचा पाठपुरावा सोडत नाही. “
मी काही तरी दहा वर्षाचा असेन.आमच्या शेजारच्या एका मुलाला जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्याला मी विचारलं,
“वेसावं हे ठाण्याच्या पश्चिमेला जास्त आहे की बोरिवली पश्चिमेला जास्त आहे?.”
त्याचं म्हणणं बोरिवली.पण खरं उत्तर वेसावं आहे. त्याच्या उत्तराची त्याला इतकी खात्री होती की तो माझ्याशी पैज मारायला तयार झाला.
मला म्हणाला,
“लागली शंभर रूपयांची पैज”
मी घरातून नकाशा आणला.त्याकडे पाहून तो मला म्हणाला,
“हा नकाशाच चमत्कारीक आहे”
खरं तसं नव्हतं.
मी त्याला म्हणालो,
“अरबी समुद्राला उत्तर दक्षिण समांतर रेष काढलीस तर वेसावं,रेषेच्या समुद्राच्या बाजूला जास्त दिसतं.आणि समुद्र हा रेषेच्या पश्चिमेला आहे हे निश्चित.
त्याचं म्हणणं ती रेषा काही कामाची नाही.कारण ती समुद्रातून जात नाही.मी त्याला म्हणालो,
” ह्या उत्तर दक्षिण समांतर रेषा असतात त्या दोन ठिकाणामधे कोणतं ठिकाण पूर्वेला किंवा पश्चिमेला आहेत ते दाखवतात.आणि ह्या रेषा जमिनीवर आहेत की समुद्रात आहेत याचा फरक पडत नाही.”
मला एक दुस्तर अडचण होती. तो माझ्यापेक्षां गलेलठ्ठ होता.म्हणून मला चूप बसावं लागलं.
ह्या लहानशा गोष्टीतून मी बर्याच निष्कर्षाला आलो.
सत्य ही एक चीज आहे.परंतु,बरेच वेळां,त्याकडे आपण अबाधीत स्वारस्य ठेवून दुर्लक्ष तरी करतो किंवा सरळ सरळ त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो.दूसरं म्हणजे एखाद्दा गोष्टीवर विचार केला म्हणून ती गोष्ट खरी होत नाही.
सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे आणि सत्याला मागोवा असतो.खरंच काय झालं?.खरंच जे आहे त किती खरं आहे?.असा तो मागोवा असतो. त्याचा पाठपुरावा करावा लागतो.
पंधरा वर्षापूर्वी मी अशाच एका निरपराध व्यक्तिच्या कथेवर लडखडलो होतो.वकिली हा माझा पेशा असल्याने त्याला मरणाच्या दाढेतून ओढून काढायाला यशस्वी झालो.ते जरी माझं हार्डवर्क होतं,तरी त्यात माझं थोडं लक होतं आणि रोगविज्ञान संबंधी एक डोक्यात सणकही होती. शेवटी त्यात मी यशस्वी झालो.
मी त्या गोष्टीच्या मागे लागण्याचं कारण मला वाटायचं सर्व प्रश्नांना उत्तरं असावीत.”त्यानेच ते केलं काय?”,”तो अपराधी होता की निरपराधी?” “त्याने ते केलं नसेल तर कुणी केलं?”
अशी सर्व छान-बिन केल्यावर मला यश मिळालं.आपण छान-बिन करतो त्यात कधी यश येतं कधी येत नाही.अगोदरचं कळायला काही मार्ग नसतो.प्रश्नांना उत्तरं असणार असं मनात आणून मार्गस्थ व्हावं लागतं.उत्तर मिळेल अशा तत्वावर भरवंसा ठेवून पुढाकार घ्यावा लागतो उत्तर जरी मिळालं नाही तरी. उत्तराला पर्याय मात्र अस्वीकारणीय असतो.
मला कधीच माहित होणार नाही की त्या शेजारच्या मुलाला वेसावं,बोरीवलीच्या दिशेच्या संबंधाने माझ्या भावार्थाचं तर्कट खरं कळलं की नाही.किंवा त्याला सर्व कळलेलं होतं पण तो कबूल करायला तयार नव्हता.किंवा ते त्याला कळलं असेल पण त्याला पैजेचे पैसे द्दायचे नव्हते.मला हे कदापीही कळणार नाही.
एव्हडंच मला कळलं होतं की माझे शंभर रूपये मला मिळाले नाहीत.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, March 18, 2009
नको बागेत तू येऊस
केशभार तू असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या त्या सांवल्याना
नको लज्जीत करूस
प्रीतिच्या महतीचे गुणगान
नको तू ही बागेत गाऊस
ऐकून ते गीत भ्रमाकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाच्या गोडव्याचे भ्रमाला
कुठून असावे ज्ञान
मी तुला काय सांगू
त्या कळ्यांना तू विचार
शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
लफंगा असे हा भूंगा
घेशील मग तू माझाच पंगा
नच शोभते रे तुला
असे भ्रमराला बोलणे
पावित्र्य त्या प्रीतिचे
असे झडकरी विटवीणे
देशील का रे तू मज
साथ तुझी हाती घेऊनी हात
जाशील जेव्हा त्या तिथे
हे क्षीतज झुकते पुर्ण जिथे
येईन मी ही तुझ्या संगती
नको होऊस वाटेत वेगळा
प्रेम अपुले कुतुहले पाही
हा जमाना सगळा
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
नको बागेत येऊस
फुलांच्या त्या सांवल्याना
नको लज्जीत करूस
प्रीतिच्या महतीचे गुणगान
नको तू ही बागेत गाऊस
ऐकून ते गीत भ्रमाकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाच्या गोडव्याचे भ्रमाला
कुठून असावे ज्ञान
मी तुला काय सांगू
त्या कळ्यांना तू विचार
शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
लफंगा असे हा भूंगा
घेशील मग तू माझाच पंगा
नच शोभते रे तुला
असे भ्रमराला बोलणे
पावित्र्य त्या प्रीतिचे
असे झडकरी विटवीणे
देशील का रे तू मज
साथ तुझी हाती घेऊनी हात
जाशील जेव्हा त्या तिथे
हे क्षीतज झुकते पुर्ण जिथे
येईन मी ही तुझ्या संगती
नको होऊस वाटेत वेगळा
प्रेम अपुले कुतुहले पाही
हा जमाना सगळा
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
