Thursday, November 15, 2007

एकद्दयाचे कायते होवून ज्याउद्दये ! ईती:-पिंग-पॉंग-च्यू

" एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये " इती, पिंग-पॉन्ग-चू
त्याचं काय झालं, मी अलिकडेच लिहीलेला एक लेख " माणूस मुलतः शाकाहारीच आहे " वाचून माझ्या एका स्नेह्यानी मला लिहीलं " नमस्कार , काल तुमच्या ब्लॉगला भेट दिली. २-३ कविता आणि माणुस शाकाहारी प्राणी कसा आहे ते वाचले. पण सर्व लोक शाकाहारी झाले तर अन्न-धान्य पुरेल का ? अन्न-धान्य यांच्या किंमती किती वाढतीले ? अशी भीती वाटते. " असो. त्यांचा प्रश्न फार चांगला होता.पण त्यांचा प्रश्नाचा आशयपाहून असं दिसून आलं की जणू अन्नधान्य अगदी पुरण्या इतकं विपूल मिळूं लागलं, आणि अगदी खूप स्वस्तपण झालं तर " आपण बुवा शाकाहारी व्हायला तयार आहो " असंच त्याना म्हणायच आहे.माणूस मुलतः शाकाहारी असावा हा प्रश्न निसर्गानेच हाताळला आहे.हे मी माझ्या त्या लेखांत काही उदाहरणे देऊन चर्चा केली आहे.इतकं करून अन्नधान्याचे भाव वाढतील म्हणून काही एखादा मांसाहारी होत नाही.धान्याचे भाव आणि धान्याच्या उत्पन्नाची पुर्तता,तसेच त्याच्या मधले राजकारण,मांस उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्याची " लॉबी " असे अनेक गहन प्रश्न आडवे येणारच.आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी किंवा अति गहन करण्यासाठी राजकारणी जन्माला आले आहेतच.माझा उद्देश एव्हडाच आहे की " तुम्ही जन्माने शाकाहारीआहात मग मांसाहारी का होता? शाकाहारी असल्याने तुमच्या तब्यतीच्या समस्या कमी असतात कारण ते निसर्गाला मान्य आहे.म्हणून " मऱ्हाठा तितुका मिळवावा शाकाहारी धर्म पाळावा" त्यासाठी असा एक प्रपंच.
मांसाआहार सोडून शाकाहारी होणं तिककं सोपं नाही हे मला पण माहित आहे.कारण मांसाहाराला माणूस एव्हडा ऍडिक्ट झाला आहे की त्याच परिवर्तन व्हायला अनेक उपाय योजावे लागतील.सध्या जगात काहिही अशक्य नाही.शेती मधे इतकी सुधारणा झाली आहे की किडमुंग्या आणि टोळ(भैरव!)उभ्या उभ्या एव्हडं शेत फस्त करतात ते होऊ नये म्हणून बीजाचे जीन बदलून त्याला किड लागणारच नाही असा बंदोबस्त केला जातो.शेतीचे उत्पादन भरपूर वाढवण्यासाठी एव्हडे उपाय उपलब्ध आहेत की श्रीमंत देशात शेतमालाचा बाजारपेठेत भाव कमी होऊ नये म्हणून धान्य जाळून टाकतात.तेव्हा माणसाने जर का ठरवलंच की शाकाहारी होणार तरते व्हायला अशक्य काही नाही." ईच्छा आहे तिथे मार्ग आहे " तेव्हा शाकाहारी अन्न कमी पडतं म्हणून मांस खावं लागतं अशातला प्रकार नसावा.म्हणून म्हटलं माणूस मुलतः शाकाहारी असताना मांसाहारी कसा झाला.कारण माणसाला निसर्गाने (देवाने म्हणा हवं तर) बुद्धिचातुर्य दिलं आहे ना! हेच मी माझ्या त्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.आता यांच्या प्रश्नाला उत्तरच द्दयायचे म्हटल्यास दुसरा उपाय करून पाहू या असा विचार केला.त्यासाठी थोडं संशोधन करावं लागलं."शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड" अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.आणि मग ठरवलं " एकद्दयाचं कायते होओन ज्यावूद्दया " (ईती दिलीप प्रभावळकर त्यांच्या चिनी माणसाच्या भुमिकेतलं एक वाक्य) असो.प्रत्येक मांसाहारी माणसाने अर्ध्यानें मांस कमी खाल्लं तर अब्जानें प्राण्यांवरचे दुष्ट अत्याचार कमी होऊन त्यांचे मरण्यापासून प्राण वाचतील.जरी तुम्हाला मांस खायाला आवडलं,तरी प्राण्यांवर होणारा दुष्ट अत्याचार वाचवुं शकता.पाश्चात देशातील खेड्यातल्या सुंदर शेतीवाडी वरच्या वर्णनांवरच्या आनंदायी कवितांचे रुपांतर आता दुर्गंधीयुक्तकारखान्यातल्या प्राण्यांच्या शेतीत झाले आहे.दहा,दहा हजार कोंबड्या एके ठिकाणी पिंजऱ्यात बघून मनस्वी धक्का बसतो.अंडी देणाऱ्या कोंबडींना अतिशय गर्दी असलेल्या पिंजऱ्यात डांबले जाते,तसेच गरोदर डुक्करीना हलायला पण जागा नसलेल्या कोंडाण्यात जखडून ठेवतात.पाश्चात्य देशात गेल्या अर्ध्या शतकानंतर प्राण्यांची शेती घरोघरी करण्या ऐवजी आता मोठमोठ्या कारखानावजा शेतात केली जाते.आणि प्राण्यांकडे दुःख आणि छळ सहनकरणारा जीव असे न पाहता एक वस्तु म्हणून पाहिले जाते.लोकाच्या नजरेपासून दुर ठेवून प्राण्यांच्या मोठमोठ्या शेतीच्या जागी त्यांचा होणारा छळ दुर्लक्षीत झाला जरी,तरी अलिकडे अधीक अधीक लोक अशा गोष्टीना विरोध करू लागले आहेत. पृथ्वी वरचे वाढते तपमान,समुद्राची वाढती पाण्याची पातळी, धृवावरची बर्फाच्छादनाची वाढती वितळण्याची क्रिया , महासागराच्या प्रवाहामधे होणारे बदल, वातावरणात होणारे बदल,तपमानात होणारे बदल हे सर्व मनुष्यजातीला सामोरे जाणारे आव्हान आहे. घरगुती प्राण्यांची मोठ्या प्रमाणातील शेतीचा, वरिल गोष्टीना कारणीभूत व्हायला १८% ग्रीनहाऊस गॅसCO2 च्या रुपात निर्माण करायला सहभाग आहे.आणि हा सहभाग दळणवळणापासून होणाऱ्या सहभागापेक्षा जास्त आहे.
माझ्या मते मांसाहारी लोक जर का ह्या घरगुती प्राण्यांच्या मोठया शेतीकारखान्याला एकदा भेट देतील आणि पाहातील की ह्या ठिकाणी ह्या प्राण्यांचे कशाप्रकारे उत्पादन होते आणि त्यांच्यावर कशाप्रकारे प्रकिया होतेतर ते पाहून आच्शर्यचकीत होतील,आणि कदाचित अशी प्रतिज्ञापण करतील की पुन्हा मांस खाणार नाही.म्हणूनआधूनिक घरगुती प्राण्याचा शेतीव्यवसाय करणाऱ्या लोकाना वाटते की जितके म्हणून होईल तितके मांसाहारी व्यक्तिला त्याच्या आहाराच्या थाळीत प्रत्यक्ष मांस पडेपर्यंत काय घडत असेल त्याची वाच्यता न झालेली बरी.आणि हे जर खरं असेल तर हे नितीमत्येच्या दृष्टीने योग्य होईल का? हे काय चालले आहे हे कळण्यास नकारात्मक राहील्याने मांसाहारी, शाकाहारी होतील ही आपली काळजी दूर होईल असं त्यांना वाटतं.
एकाच पिंजऱ्यात अनेक प्राणी ठेवल्याने आर्थिक दृष्ट्या सुलभ असते.प्रत्येक प्राण्यामागे लाभ कमी झाला तरी प्रत्येक पिंजऱ्यामागे लाभ वाढतो.एका पिंजऱ्यातगर्दी करून प्राण्याना ठेवल्याने त्यांची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न खाऊन त्याचे वजन वाढते आणि त्यामुळे प्रत्येक प्राण्यामागे मांस जास्त मिळून मांसाचे ऊत्पादन वाढते आणि प्रत्येक प्राण्यापेक्षा पिंजऱ्याची किंमत जास्त असल्याने शेवटी कमी पिंजरे वापरून प्राणी चोंदून ठवल्याने जास्त फायदा होतो.म्हणजेचप्राणी स्वस्त असतो आणि त्यामानाने पिंजरा महाग असतो.
डुक्करांची कथाशेतीवरच्या लोकांना उपदेश दिला जातो." डुक्कर हा एक प्राणी आहे हे विसरा आणि त्याला एक कारखान्यातले यंत्र आहे असे समजा" सतत पिंजऱ्यात असल्याने ह्या प्राण्याला त्यांच्या अपुऱ्या आयुष्यात कधीही सूर्यदर्शन होत नाही.सुकल्या गवतावर लोळायला मिळत नाही.चिखलात कुदायला मिळत नाही.गर्भवती डुक्करीणीला कधी पिंजऱ्यात जरा हलायला मिळत नाही.खाली लोखंडाच्या नळ्या असल्याने त्यावर झोपावं लागत.आणि त्यांची विष्टा त्या मधल्या फटीमधून खाली असलेल्या डबक्यांत पडते,आणि चोहिकडे दुर्गंधी सुटलेली असते.
खाटिकखान्याला जर का कांचेच्या भिंती असत्या तर हे दृश्य दिसलं असतं.प्राण्याना मारण्यापुर्वी त्यांना अर्धबेशुद्ध करण्याचा कायदा आहे,पण......त्यांना अतिशय कृरतेने मारतात,त्याचे वर्णन करणे पण कठीण आहे.म्हणून म्हणतो,मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते, त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?प्रश्न ह्या प्राण्याना आपली बाजू मांडता येत नाही हा नाही,प्रश्न त्याना बोलता येत नाही हा पण नाही,तर प्रश्न हा आहे की त्यानी हालहाल होऊन मरावे काय?
अंदाजे २ लाख डुक्करे खाटिकखान्यात मृतावस्तेत आणली जातात.आणि त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण त्याना आणताना अपुरी हवा आणि अतिशय गरम वातावरणात आणले जाते हे आहे. ते खाटिकखान्यात येण्यापुर्वीच मरतात.
सहजतेने हाताळले जावे म्हणून हे मांसासाठी वाढवलेले प्राणी विजेचा धक्का देऊन अर्धमेले केले जातात.परंतु,ही पद्धत त्यांना खरोखरच अर्धमेले करतात का? कधीकधी त्या विजेच्या धक्क्याच्या गुंगीत ते अतिशय निघृण दुखापतीत जीवंत राहून, हे सर्व प्राणी अशा परिस्थितित जेव्हा उकळत्या पाण्याच्या टाकीत टाकले जातात तेव्हा ते पाण्यात उकळून तरी मरतात किंवा त्या पाण्यात बुडून मरतात.गुप्त व्हिडीयो टेपने सर्व रेकॉर्ड करून हे उजेडात आणले आहे.
कोंबड्या ह्या प्राण्याबद्दल सर्वसाधारण समजूत आहे ते खरं नाही.त्या अगदीच बावळट नसतात.उलट त्यांची वागणूकबरीच गुंतागुंतीची असते.शिकण्यात बऱ्याच तत्पर असतात मिळून मिसळून रहाण्यात फार उत्सुक असतात.आणि निरनिराळ्या आवाजाला साद देण्यात फार तल्लख असतात. तसेच त्यांच्या समुहात प्रत्येकाची स्वतःची ओळख असते.
पाश्चात्य देशात घरातल्या पाळीव प्राण्याचा (कुत्रा,मांजर,ससा वगैर) छळ होऊ नये म्हणून जे कडक कायदे आहेत ते जर ह्या मांसोद्पानासाठी शेती होत असलेल्या प्राण्याना लागू केले तर बेकायदा वागणुकीसाठीजबर शिक्षा होईल.कुत्रा,मांजरे,ससा वगैरे प्राण्यांचा समुह आणि कोंबडी,डुक्कर,गाई,म्हशी ह्यांचा समुह ह्या दोन समुहात पहिल्या समुहाला कायद्दयाचे संरक्षण असावे हा पंक्तिप्रपंच का असावा?ही दुर्लक्षीत वागणूक तशीच चालू राहाण्याचे कारण खूप कमी लोकाना त्या प्राण्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीचीमाहिती असते.आणि त्यापेक्षाही कमी लोकांना त्यांच्यावरहोणाऱ्या अत्याचाराची माहिती असते.पण जर का याचीजागृती झाली तर बऱ्याच लोकांना मानसिक धक्का बसेल,आणि त्याचे कारण प्राण्यांच्या सुलभतेने जगण्याच्या ह्क्कावरून नसून,त्यांचा विश्वास बसेल की प्राण्याना पण ईजा होते आणि दुखते सुद्धा.त्याशिवाय माणूस सुद्धा माणुसकीच्या दृष्टीने आणि नितीमत्तेच्या दृष्टीने कुणालाही असे दुःख देण्यापासून परावृत्त होईल.
गाईला बछडा(बछडी नव्हे) झाल्यावर भविष्यात त्याचा दुध उत्पन्नासाठी काहीच उपयोग नसल्याने त्याचा जन्म होताच एक दोन दिवसानंतर आई पासून दूर करून त्या बछड्यासाठी निराळ्या प्रकारचे दुधवजा अन्न दिले जाते.आणि गाईचे दुध उद्पातीत करतात.नंतर हा बछडा १८,२० आठवड्यानंतर कोवळे गुलाबी मांस (tender pale coloured meat) म्हणून खाण्यासाठी कत्तलखान्यात नेतात.
ऐतिहासीक दृष्टीने मनुष्य जेव्हा नितीमत्तेची गरज खूप विकसीत करीत जात होता तेव्हा अज्ञान आणि मुळगरजा कमी करीत गेला, प्रथम कुटुंब आणि जमातीच्या पलिकडे जाऊन, नंतर धर्म ,जात,आणि देशाच्या पलिकडे जाऊन. ही त्याच्या नितीमत्तेची विकसीत होण्याची मर्यादा वाढवून ईतर प्राण्यांनापण सामाऊन घेण्याच्या निर्णयासाठी, सध्यातरी तो अशी टोकाची भुमिका घेईल हे कल्पने पलिकडचे वाटते.पण एक दिवस,म्हणजे दशके गेल्यानंतर किंवा शतके गेल्यानंतर कदाचित त्याला "सुसंकृतीच्या" नांवाखाली ह्या प्राण्यांना सामाऊन घेण्याचा विचार करावा लागेल.
माणसाचे आणि प्राण्यांचे एकमेकाचे नातेसंबध असे विचीत्र आहेत की एकाच वेळी माणसाचे प्राण्याविषयी भावनीक प्रेम आणि क्रुरपणा शेजारी शेजारी वास्तव्य करत असतात.एकदा मझ्या वाचनात आलं " अमेरिकेत नाताळच्या उत्सवात कुत्र्या मांजराना बक्शीशी दिली जाते,अन त्याच वेळेला डुक्कराच्या दुरदैवी आयुष्याची कुणालाही चुकून सुद्धा आठवण येत नाही,कुत्र्या मांजरा एव्हडे त्याला सुद्धा तेव्हडीच बुद्धिमत्ता असून संध्याकाळच्या जेवणात "खिस्मस हॅम "(डुक्कराचे मांस) ही चवदार "डिश" मेजवानी म्हणून फस्त केली जाते.
शाकाहारी व्यक्तिची प्रकृती ठिकठाक असते.रक्तदाब कमी असतो,वजन कमी असतं,कोलेस्टेरोल कमी असते,टाईप टूडायाबीटीस,हृदय रोग,प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर हे रोग कमी असतात. असे असण्याच्या अनेक कारणापैकीमांसाहार न घेणे हे पण एक कारण असावे असे ज्ञानी लोकाना वाटू लागले आहे.
एक निरपराधी मुल एका पाणकोंबडीवर ह्ळुवारपणे हात फिरवीत म्हणते कसं " If I knew you, I wouldn't eat you"काही दृष्टीने हे खरंच तितकं सोपं आहे.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

No comments: