Sunday, February 28, 2010

वाचक हो, तुमच्यासाठी

(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)

आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
पाच शतके लेखनाची लिहूनी अमुच्या ब्लॉगवर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी

लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी

रक्षिता लेखन स्वातंत्र्या कायदा घेऊनी हाता
तुमच्यास्तव आमुची लेखने तुमच्यास्तव कविता
एकट्या लेखकासाठी लेखने अनंत होती
वाचक हो, तुमच्यासाठी
वाचक होss तुमच्याssसाठीsss

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 25, 2010

कमलचा आनंदाचा क्षण

“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.”

ते जून महिन्याचे दिवस होते.उन्हाळा प्रचंड भासत होता.पाऊसही पडेल अशी शक्यता वाटत होती.अशावेळी आम्ही आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन थंड हवेत गप्पा मारतो.माझी चुलत बहिण कमल कोकणातून चार दिवस माझ्याकडे राहायला आली होती.तीला भेटायला म्हणून माझी बहिण आणि माझा धाकटा भाऊ पण माझ्याकडे आले होते.जेवणं झाल्यावर आम्ही गच्चीवर गेलो.
एक विषय म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आपल्या जीवनातला एखादा आनंदाचा क्षण सांगावा असं माझा भाऊ म्हणाला.
आणि त्याची सुरवात केली ती कमलने.

“मी माझ्या मनात आलेला एक विचार सांगते.तसा ऐकायला तो काही विशेष भीषण नाही.त्यामुळे मी म्हणते, ते ऐकल्यावर तुमच्या मनात असलेले महत्वाचे विचार काही बदलणार नाहीत. फक्त एव्हडाच फरक पडेल की माझं हे ऐकून कदाचीत काही क्षण तुम्ही लक्षात आणून क्षणभर थांबून तुमच्या जीवनातल्या एखाद्या क्षणाची विशेष प्रशंसा करायला उद्युक्त व्हाल.अर्थात मला म्हणायचं आहे ते अत्यंत आनंदायी क्षणाबद्दल.”
खूप दिवसानी कमलला आम्ही भेटत असल्याने पूर्वीच्या आठवणी आणून कमल काहीतरी विशेष स्वारस्य येईल असं सांगत आहे असं समजून आम्ही ऐकायला लागलो.

“अनपेक्षीत आणि अनिमंत्रीत क्षण ज्यावेळी येतात अशा क्षणाबद्दल मी म्हणते. असे क्षण आले की बहुतेकजण त्यावर विश्वास ठेवतात,आणि अशा क्षणावर मी पण विश्वास ठेवते.
माझ्या आयुष्यातला सांगण्यासारखा क्षण म्हणजे ज्यावेळी विनय अगदी लहान असतानाचा.विनयच्यावेळी माझं पहिलं बाळंतपण होतं.तो जन्माला आला, तो तो क्षण नव्हता. कदाचीत तुमच्या सर्वांच्या मनात तसं आलं असेल.ती वेळ निराळीच होती.ती वेळ माझी परिक्षा घ्यायला आलेली वेळ होती.पांडूरंगाशी माझं नुकतच लग्न झालं होतं.”

“मी समजले.त्या दिवसात मी तुझ्याकडे राहायला आले होते. रंगाभाऊजीनी बिझीनेस काढला होता.तू पण त्यांना मदत करायचीस.”
माझी बहिण कमलला म्हणाली.

“हो,तू आली होतीस त्यावेळी नुकतीच आमची सुरवात होती.”
कमल म्हणाली.आणि पुढे सांगू लागली,
“त्यांचा नव्याने चालू केलेला धंदा त्यावेळी तसा नीटसा चालत नव्हता.त्यामुळे आमच्या डोक्यावर कर्जाच्या परत फेडीचा मोठा ताण होता.आणि हे रोजचच झालं होतं.
एक दिवस मात्र अतीच झालं..बॅन्केने आम्हाला परत फेडीचा अंतीम दिवस दिला होता.मोठं कठीण झालं होतं.त्या रात्री मला आठवतं मी गणपतीची प्रार्थना केली,मुसमुसून रडले आणि बिछान्यावर तशीच पडले.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.काही अवधी गेला असेल, विनय त्यावेळी नऊ महिन्याचा असावा. काळोखात विनयचं रडणं ऐकून जाग आली. उठायला जीवावर येत होतं.मी माझे डोळे घट्ट मिटले पांघरूणात गुरफटून घेतलं आणि मनात म्हणाले
“रडूदेत हवा तेव्हडा.”

चर्चेचा विषय आनंदी क्षणाचा आहे हे लक्षात घेऊन मी मधेच अडवीत कमलला म्हणालो,
“आपण आनंदायी क्षणाबद्दल चर्चा करणार आहोत.हे तुझ्या लक्षात आहे ना?”

माझ्याकडे बघून हंसत हंसत कमल म्हणाली,
“हो,माझ्या चांगलंच लक्षात आहे.दुःख आणि आनंद एकमेकाशी पाठशिवण खेळत असतात.”
माझं कुतूहल वाढवीत कमल पुढे सांगू लागली,
“थोडावेळ गेल्यानंतर जसा मी त्याचा विषाद्पूर्ण रडण्याचा आवाज ऐकत राहिले,तसं माझ्या नैराश्याचे पडसाद त्याच्या रडण्यात मला दिसायला लागले.माझ्या यातना खूपच तीव्र झाल्या आणि मी त्याला त्याच्या पाळण्यातून बाहेर काढण्यासाठी उठले.”

“म्हणजे त्याला रागाने चापटी वगैर मारलीस नाही ना?”
माझा धाकटा भाऊ आता माझ्यापेक्षा चिंताग्रस्त होऊन तीला म्हणाला.

“मी त्याला अंगावर घेऊन खोलीत फिरत राहिले.त्याच्यासाठी गाणं म्हटलं,त्याला पाळण्यात घालून झोके देऊन पाहिलं,त्याच्या कानाजवळ हळू गुणगुणून पाहिलं पण काही उपयोग होईना.एका क्षणाला मला वाटू लागलं की त्याला गप्प करण्याचा काहीच उपाय दिसत नाही.बाहेर पहाट झाल्याचं लक्षण दिसायला लागल्यावर मी अगदी हताश झाले. त्याला मांडीवर घेऊन आराम खूर्चीवर मी अगदी निपचीत बसून राहिले.त्याला मी माझ्या छाती जवळ घेऊन थोपटूं लागले.जरा शांत झाल्यासारखा भासला पण झोपत नव्हता.वळून माझ्याकडे बघू लागला.रडून,रडून काहिश्या सुजलेल्या डोळ्याने माझ्याकडे टवकारून बघत होता.आणि पहिल्याच वेळी मला
“आई” म्हणाला.”
हे ऐकून कमल बरोबर आमच्याही डोळ्यात पाणी आलं.

“त्या क्षणाचा मला झालेला आनंद जणू एखादा तीक्ष्ण तीर माझ्या काळजात घुसल्यासारखा वाटला.त्याचा चेहरा माझ्या त्या क्षणाच्या आनंदाची साक्ष देत होता.माझ्या जीवनात आलेली निराशा मला त्याक्षणी खास वाटत नव्हती.त्या एकाच क्षणाला माझं जीवन मला परिपूर्ण वाटलं.त्या क्षणाला माझ्या मनात आनंदाशिवाय काहीही नव्हतं.निष्कपटतेचा तो क्षण मला खास वाटत होता.कदाचीत इतराना त्या क्षणाचं महत्व नसावं,पण मला होतं.”
डोळे पुसत आम्हाला कमल सांगत होती.

मी कमलचा हात माझ्या हातात घेत तीला बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“तो तुझ्या श्रद्धेचा आणि आत्मबळाचा क्षण होता.तुझ्या नैराश्येमधे तुला आशा दिसायला लागली असावी.आणि भविष्यातल्या संभाव्य समस्या साध्या वाटू लागल्या असाव्यात.”

“हो अगदी बरोबर”
असं म्हणत कमल म्हणाली,
“तो क्षण माझ्या स्मृतिमधे एक चमकता तारा बनून रहिला आणि माझ्या कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरला.असे क्षण जगण्यासाठीच जीवन आहे असं वाटायला लागलं.”

हे ऐकून माझी बहिण कमलला म्हणाली,
“ह्या घटनेतून मला दिसून आलं की,खरोखरंच आनंदाचे क्षण आयुष्यात येतात.समयातले ते क्षण एक स्थिर-चित्रासारखे असून त्यातला एकूण एक तपशील जसाच्या तसा असतो.तुझ्या एकूण वर्णनावरून दिसलं”

कमल म्हणाली,
“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.”

“कुणास ठाऊक कदाचीत आणखी एखादा असाच क्षण आसपास आलाही असेल.”
असं म्हणत माझा धाकटा भाऊ आपली गोष्ट सांगायला सुरवात करणार एव्ह्ड्यात जोराचा वारा आला.पाऊस नक्कीच पडणार असं वाटल्यामुळे आम्ही गच्चीतून उतरून घरात आलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 23, 2010

किशोर आणि प्रकाश.

“ह्या प्रकाशावर आणि त्याच्यात असलेल्या अंतीम दयाशीलतेवर- जी दयाशीलता आपणा सर्वांत चमकून दिसते- त्यावर माझा दृढविश्वास आहे.”

असं म्हणतात चूका करतो तो माणूस असतो.पण त्याचत्याच चूका करतो तो माणूस नसतो.किशोर पाटलाने जरी त्याचत्याच चूका केल्या तरी तो माणूस होता.हा अपवाद एव्ह्ड्यासाठी की त्या चूका त्याने त्याच्या किशोर वयात केल्या होत्या.त्या वयात मेंदूचा पुढचा भाग तेव्हडा विकसीत झालेला नसतो असं म्हणतात.त्यामुळे किशोर वयात निर्णय घेणं कठीण होतं.

किशोर थोडा मोठा झाल्यावर कोकणात राहायला गेला.त्याचे आईवडीलपण त्याच्याबरोबर गेले.शहरात असताना त्याचं शिक्षणाकडे विशेष लक्ष नव्हतं. वाईट मुलांची संगत लागल्याने त्याची ही परिस्थिती झाली होती.सहाजीकच त्याच्या आईवडीलाना खूप दुःख व्हायचं.मी त्यांची नेहमी समजूत घालायचो.शेवटी त्यांनी त्याला घेऊन कोकणात जाण्याचा बेत केला.मलाही त्यांचा निर्णय आवडला.
इकडच्या वाईट संगतीला खंड येईल आणि तिकडे जाऊन थोडं फार शिकून निदान उदरनिर्वाहाला लागेल असं त्याच्या आईवडीलाना वाटलं असावं. आणि हे खरं ठरलं.किशोर तीकडे अकरावी पर्यंत शिकला आणि बॅन्केकडून कर्ज घेऊन त्याने कपड्याचं दुकान काढलं.लग्न करून आता तो सुखी झाला.

मी त्याला भेटायला गेलो होतो.गप्पा करताना मी त्याला म्हणालो,
“बाबारे,विधिलिखीत आहे ते होणारच.पण तुझं चांगलं झालं हे पाहून मला खूप आनंद होतो.”
कुणाचं चूकलं,कुणाचं बरोबर होतं,कुणी त्याला त्यावेळी फसवलं,आणि कुणी त्याला मार्गदर्शन केलं त्या जून्या आठवणी काढून तो मला सांगण्याचा प्रयत्न करीत होता.कोकणात त्याचं घर डोंगराच्या पायथ्याशी पूर्व दिशेला होतं.त्यामुळे सकाळचा प्रकाश मुबलक यायचा.किशोर खरं खोटं कसं उजेडात येतं ते सांगण्याच्या प्रयत्नात असताना मला त्याच्या घरात आलेल्या त्या लख्ख प्रकाशाची आठवण येऊन मी त्याला म्हणालो,
“मला प्रकाशाबद्दल विशेष वाटतं.प्रकाशातच सत्य उघडकीला येतं. पेचदार प्रसंग आल्यास प्रकाशात ते सुटण्यात मदत होते. सत्याच्या गाभ्यावर प्रकाशाची झोत संभ्रमाच्या समुद्रात पडून मूलभूत गोष्ट पृष्टभागावर आल्याने प्रत्येकाला पूढे जायला मार्गदर्शन होतं.”
का कुणास ठाऊक काही कारणाने किशोरला माझं प्रकाशाचं उदाहरण ऐकून, सुरवातीला तो इकडे राहायला आलेला असतानाचे दिवस त्याला आठवले.

मला म्हणाला,
“पूर्वी आम्ही समुद्राजवळ डोंगराच्या पश्चिम बाजूला पायथ्याशी रहात असल्याने समुद्रावरून सतत येणार्‍या ढगांकडून वातावरण ढगाळ केलं जायचं.
त्यामुळे दिवसभर उन नसायचं आणि शेवटी सूर्य मावळतानाचं दर्शन कठीणच व्हायचं.बरेच वेळा सकाळी मला शाळेत जाताना काळोखात गेल्यासारखंच वाटायचं.मात्र आमच्या घरात नेहमीच दिवे पेटत असायचे.बाहेर थंडी असो,पाऊस असो किंवा आणखी काही असो आमच्या घरात बिनदास दिवे पेटत असल्याने घर उजळलेलं असायचं.मी माझ्या किशोर वयात आलेल्या कठीण दिवसातून वाट काढण्याच्या प्रयत्नात असताना आणि त्याचवेळी इतर सर्व आपआपल्या जीवनात स्थीरस्थावर झाले असताना माझ्या आईबाबांनी त्यांच्या असीम बुद्धिमतेमुळे आणि सहनशीलतेमुळे माझे दिवस प्रकाशात आणले.माझ्यावर त्यांचा विश्वास बसला.मला पायावर उभा होण्यासाठी माझ्या बहिणींनी मला आंजारलं, गोंजारलं,शहाणं करून त्या सावलीतून बाहेर काढून प्रकाशात आणलं.”

किशोरचे आईवडील आता हयात नाहीत.त्यांची आठवण काढून मला म्हणाला,
“प्रकाश मंदावला. जेव्हा माझे बाबा आम्हाला सोडून गेले.अनेक महिने मी अंधारात वावरत होतो.मनात कुतूहल वाटायचं की खरंच पूर्वीचं माझं जीवन मला परत मिळेल का?.माझ्या आतल्या आवाजातून मला भरवंसा दिला जायचा की, माझे बाबा माझ्याच जवळपास वावरत आहेत.
मला नेहमीच वाटतं की प्रकाश सर्वत्र आहे पण त्यातली सुंदरता नेहमीच स्पष्ट नसते.”
मी किशोरला म्हणालो,
“पण आता ह्या तुझ्या नव्या घरात मुबलक प्रकाश आहे.समोर माडाची आणि मोठ-मोठ्या वडा-पिंपळाची झाडं आहेत. बाहेरचं दृश्य खूपच सुंदर दिसतं”
“माझे आईबाबा गेल्यानंतर आमचं ते पूर्वीचं घर मला खायला यायचं.काही दिवसानी ते घर सोडून आम्ही दुसर्‍या गावात रहायला गेलो.”
किशोर सांगत होता.पुढे म्हणाला,

“आता आम्ही रहातो ते घर डोंगराच्या पायथ्याशीच आहे पण डोंगराच्या पूर्वेला आहे.इथे सूर्योदयाच्या वेळी लख्ख उन असतं.पण ह्या गावात बरीच गरीबीची काळोखी आहे. जीवनावश्यक वस्तुंची कमतरता आणि आकाशाला भिडणार्‍या किंमतीमुळे स्थाईक लोकांचे हाल बघून डोळ्यासमोर येणार्‍या ह्या काळोखीला मी तसा अपरिचीत होतो.पण त्याही परिस्थितीत इकडच्या लोकांचा प्रेमळपणा पाहून मी पूरा प्रकाशात आलो.आता इकडच्या घरात जेव्हा मी दिवा पेटवण्यासाठी रात्री स्विच दाबतो तेव्हा घरात पडलेला रात्रीचा तो विजेचा प्रकाश पाहून ह्या गावातल्या लोकांशी मला किती कृतार्थ राहिलं पाहिजे याची समझ मिळते.”

मी किशोरला म्हणालो,
“मला वाटतं प्रकाशातही सुंदरता छ्पलेली आहे.मग तो प्रकाश श्रीमंत शहरातला असो किंवा एखाद्या गरीब गावातला असो.आपण सर्व सारखेच जन्माला येतो पण आपल्याला प्रत्येक गोष्ट सारखीच हाताला लागत नाही. तुझा मुलगा पण ह्या गावात राहून इकडचे प्रेमळ संस्कार घेऊन वाढत आहे.मला वाटतं हेच संस्कार तो पुढच्या पीढीतही जाऊ देईल.”

माझं म्हणणं किशोरला खूपच आवडलेलं दिसलं.प्रकाश डोळ्यासमोर आणून आपल्या मनातलं तो भडभडून सांगायला लागला,
“मला वाटतं प्रकाश ही एक प्रेरणा आहे.जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा मी रात्री पायदुमडून झोपतो आणि दुसर्‍या दिवशी येणार्‍या सूर्याची आतूरतेने वाट पहातो.आता मी पूर्वेला राहत असल्याने तो सक्काळी पूर्वेकडून उगवणारा नारींगी गोळा पहाण्याच्या मी प्रयत्नात असतो.उंच उंच माडाच्या आणि पोफळीच्या झाडाआडून उगवणारा पूर्वेचा सूर्य रमणीय दिसतो. त्या माडा-पोफळीच्या सावल्यातून वाटकाडून मी सूर्याच्या तेजाला हुंगण्याचा प्रयत्न करतो.ते तेज मला ईशारा देतं,प्रेरणा देतं,आणि उब देतं.ह्या प्रकाशावर आणि त्याच्यात असलेल्या अंतीम दयाशीलतेवर- जी दयाशीलता आपणा सर्वांत चमकून दिसते- त्यावर माझा दृढविश्वास आहे.”

त्याचत्याच चूका करूनही माणूस म्हणून रहाणारा किशोर हा एक अपवाद आहे.अपवादामुळेच नियम सिद्ध होतो असं माझ्या मनात आलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 20, 2010

जीवन आणि समय एकच आहे.

“आजूबाजूच्या जंगली झाडांकडे पाहून एक डोक्यात कल्पना आणली आणि ती कागदावर कविता समजून उतरवली.”

माझा थोरला भाऊ तसं पाहिलं तर सदाचा स्वपनाळू.त्याच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर आहे.त्याच्याशी गप्पा मारीत बसल्यावर वेळ मजेत जातो.आज मी त्याच्या घरी त्याच्या गावी जाण्याऐवजी तोच माझ्याकडे काही कोर्टाच्या कामानिमीत्त दोन दिवस राहायला आला होता.रात्री जेवणं झाल्यावर आम्ही दोघे बाल्कनीत गप्पा मारीत बसलो होतो. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.हवा ही अंमळ थंड होती.
“एक एक कप कॉफी घेऊया कां?”
असं मी त्याला विचारलं.लगेचच मला म्हणाला.
“नेकी और पुछ पूछ?”
दुधात पाणी न घालता कॉफीची पूड त्यात टाकून चांगली उकळल्यावर उतरता उतरता त्यात थोडीशी वेलचीची पूड आणि साखर टाकून भरलेले दोन कप घेऊन बाल्कनीत आलो.एक कप त्याला देत मी म्हणालो,
“आज काहीतरी तुझ्याकडून निराळंच ऐकायचं आहे.रोज रोज तेच तेच दुनियादारीचे विषय ऐकून जीव विटलाय.”

थोडासा विचारात पडल्यासारखा होऊन मला म्हणाला,
“असं म्हणतोस,तर ऐक.मी अलिकडे माझी जूनी कागदपत्रं चाळताना त्यात मला एका चिटोर्‍यावर मीच लिहिलेली कविता सापडली.ती कविता वाचून मला ते दिवस आठवले.तू त्यावेळी वयाने फारच लहान होतास.मी नेहमीच आपल्या बाबांबरोबर संध्याकाळी रानात फिरायला जायचो.”
माझा भाऊ मला माहित नसलेलं आणि ते सुद्धा बाबांबरोबरच्या एखाद्या आठवणीबद्दल सांगत आहे हे बघून मला ही आनंद झाला.

मी माझ्या भावाला म्हणालो,
“तुझी कविता नक्कीच निसर्गावर असणार.मी तुझ्या कविता वाचलेल्या आहेत.पण ही कविता जूनी असल्याने खचीतच मला ती ऐकायला आवडेल. पण तू निसर्गावर प्रेम करायला कसा वळलास?”

“निसर्गावर प्रेम करण्याची देणगी मला आपल्या बाबांकडून मिळाली.”
मला माझा भाऊ सांगू लागला.
“आपले बाबा शांत स्वभावाचे आणि उत्कृष्ट अवलोकन करणारे होते. एकदा असंच आम्ही रानातून फिरत जात असताना,मला गूपचूप राहायला सांगून एका गोल दिसणार्‍या करड्या रंगाच्या दगडाकडे निरीक्षण करायला त्यांनी सांगीतलं.ते स्वतः त्या दगडाजवळ जाऊन बोटाने दाखवीत असताना तो दगड जीवंत झाला.कारण तो एक ससा होता.
तो अचानक पळून गेला.माझा श्वासपण त्याच्याबरोबर गेला असं मला त्या क्षणी वाटलं.त्या क्षणापासून माझ्या जीवनात शास्त्रज्ञ म्हणून,प्रकृतिवादी म्हणून आणि कवी म्हणून एक जीवनक्रम स्थापित झाला.”

मी आणखीन काहीतरी त्याला प्रश्न विचारण्याच्या तयारीत आहे असं पाहून,
“मला आणखी काही सांगायचं आहे ते ऐक आणि मग तू बोल.”
असं सांगून तो पुढे म्हणाला,
“जीवनातली सुंदरता आणि विविधताबद्दल फिकीर करणार्‍या तुमच्या आमच्या सारख्याला हे जरा कठीण दिवस आलेले आहेत.पृथ्वीवर पूर्ण विलोपन करायला एक प्रकारची चूरस लागली आहे. मला वाईट वाटतय की मी जे पाहिलं आहे ते माझ्या पंतवंडाना कदापी पहायला मिळणार नाही.पण ह्यामुळे मी जरी दुःखी झालो असलो तरी मी माझी असीम उमेद राखून ठेवली आहे.सध्या आलेली आपत्ति कितीही कठीण असली तरी जीवन टिकून रहाणार आहे.आपण आपला विनाश करू पण सृष्टीचा विनाश होणार नाही.”

हे त्याचं सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“जीवनाच्या असीमित क्षमतेला मी मानतो.अशी क्षमता की जी ब्रम्हांडातल्या निर्वात अन्तरिक्षात ह्या प्रचंड शिलेला ज्याला पृथ्वी म्हटलं जातं तीला आच्छादीत करते. ह्या ब्रम्हांडातलं हे एकच जीवंत जग आहे अशी समजूत आहे. मला असही वाटतं की जो प्रत्येक जन्माला येतो त्याला हे जीवंत जग जणू एक उपहार कसा मिळतो आणि तो जीविताच्या अग्रणी राहून त्याची परतफेड करतो.”

“तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं म्हणत तो पुढे म्हणाला,
“मी कवी असल्याने मला माझ्या भावना,माझा दृढवि़श्वास, फक्त गद्यात प्रकट करता येणार नाही.मला आठवतं ही कविता त्यावेळी मी आपल्या घराजवळच्या डोंगरावर चढून अगदी वर एका टोकावर बसून आजूबाजूच्या जंगली झाडांकडे पाहून एक डोक्यात कल्पना आणली आणि ती कागदावर कविता समजून उतरवली.तू म्हणतोस तसं जीवनात असलेल्या क्षमतेची आणि सृष्टीच्या सुंदरतेची कल्पना येऊन ही कविता मी त्यावेळी लिहीली असावी,समोर एक कडूलिंबाचं प्रचंड झाड वाढलेलं होतं.कविता अशी आहे.

डोंगराच्या माथ्यावरी असे
एक कडूलिंबाचे झाड
आडवे तिडवे वाढूनी
वार्‍यास देई आव्हान

एक एक दिवस करूनी
राहिले जीवंत ते अजूनी
थंडी वारा पाऊस झेलूनी
करीत राहिले गुजराण

कीड,मुंगी,तू अन मी
येतो अन जातो ह्या जगातुनी
मिळतो समय त्यामधूनी
करण्या अपुल्या्ला निपूण

“मी अनेकदा त्या कडूलिंबाच्या झाडाजवळून गेलो असेन.पण पुढच्या खेपेला जाईन तेव्हा तुझी कविता मला नक्कीच आठवेल.तुझी आणि आपल्या बाबांची मला नक्कीच आठवण येईल.”
कविता ऐकून झाल्यावर असं मी माझ्या भावाला म्हणालो.हे ऐकून आनंद त्याच्या चेहर्‍यावरून लपला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 18, 2010

होऊ घातलेला लक्षाधीश.

“ज्या ठिकाणी माझ्या म्हणण्याला अर्थ होता,असं ते ठिकाण आहे अशी माझ्या मनात आशा निर्माण केली गेली आणि शेवटी मी सयशस्वी झालो.”

रघूनाथचा छापखाना आहे हे मला नव्यानेच कळलं.
त्याचं असं झालं,की पब्लिशर ओळखीचा असल्यानंतर छपाई करून घेण्याच्या कामात लागणारे जरूरीचे सोपास्कार करून घ्यायला जरा सोपं जातं हे मला माहित होतं.लहानपणी माझ्या वर्गात बरेचसे मित्र होते त्यातला रघुनाथ हा एक मित्र.त्याचा छापखाना आहे हे मला योगायोगाने कळलं.

फार पूर्वी “रघूवंशी” ह्या टोपण नावाने तो अनेक वर्तमानपत्रात रिपोर्टींग करायचा.मी त्याच्याकडून रिपोर्ट झालेल्या बातम्या वाचल्या आहेत.एकदा माझ्या एका दुसर्‍या मित्राबरोबर पूर्वीचं प्रेस रिपोर्टींग आणि आताचं रिपोर्टींग यावर चर्चा करीत असताना “रघूवंशी”च्या रिपोर्टींग बद्दल संदर्भ आला. आणि त्यावेळी मला कळलं तो “रघूवंशी” म्हणजेच आपला रघूनाथ वाटवे.

सहज म्हणून ह्या छापखान्यात मी माझ्या काही कवितांचा संग्रह छापून घेण्याच्या विचार करून आलो होतो.
“रघूनाथ वाटवे प्रमुख संपादक”
अशी मी एका रूमच्या बाहेर पाटी वाचली.बाहेर बसलेल्या शिपायाला आत जाता येईल का विचारत होतो.माझं व्हिझीटींग कार्ड घेऊन तो शिपायी आत गेला.लागलीच मला आत बोलावलं गेलं.मी रघूला ओळखलं नसतं.फक्त बाहेरच्या पाटीवरून मला अंधूक संशय होता एव्हडंच.मला मात्र रघूने ओळखलं.
“तू हंसलास त्यावेळी तुझ्या गालावरची खळी कुठे लपणार?”
तू सामंत हे मी तत्क्षणी ओळखलं.”
मला रघू म्हणाला.
माझं काम फत्ते होणार हे मी जाणलं.

इकडतीकडच्या गप्पा झाल्यावर मी रघूला म्हणालो,
“तू ह्या व्ययसायात कसा आलास?”
रघूच्या तोंडात पान होतं,ते थुंकून आल्यावर मला म्हणाला,
“तू खूप दिवसानी भेटतोयस.तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला बराच वेळ लागणार म्हणून तोंड साफ करून आलो.तुला मी माझ्या जून्या आठवणी काढून सांगतो.ऐकायला तुला वेळ आहे ना?”
रघू मोठा बोलघेवडा आहे हे मला जूनं माहित होतं.
“नसला तरी तुझ्यासाठी काढीन”
असं मी त्याला म्हणालो.

मला रघू म्हणाला,
“कुणाला तरी सांगणं की
“तुमचं जरा कठीण आहे”
म्हणजेच
“तुमचं आयुष्य फुकट आहे.”
असं सांगण्यासारखं होईल.शिक्षक नेहमीच मुलांना सांगतात की
“अभ्यासात तुमचं तुम्ही पाहिलं नाहीत तर तुम्ही नापास होणार.”
बर्‍याच शिक्षकांना वाटत असतं की विद्यार्थी बुद्धिमान असतो जो शैक्षणीक बाबतीत पुढे असतो.दुसर्‍या अर्थाने बघायचं झाल्यास परिक्षेत त्याला जास्त मार्कस मिळालेले असतात.
परंतु,शोध असं सांगतो की,भविष्यात पाहिलं तर जो विद्यार्थी आपल्या अभ्यासात सतत हुशार रहातो तो एखादा चांगला जॉब मिळवून तीकडेच अडकून पडतो.आणि जो विद्यार्थी अभ्यासात सर्वसाधारण असतो तो उद्योगपती होऊन खूप पैसा मिळवतो.
ह्या म्हणण्यावर विश्वास बाळगून मला माझ्याबद्दल थोडी आशा वाटायला लागली होती.मी तसा काही हुशार मुलगा नव्हतो की जो रोज वर्ग सुरू होण्यापूर्वी पाच मिनटं येणारा किंवा वर्गात सगळ्या पहिल्या रांगेत जाऊन बसणारा.आणि खरं पाहिलंत तर प्रत्येकाला तसं करताही येणार नाही.”
रघूला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं.

मी म्हणालो,
“तुझ्या अभ्यास करण्याच्या शैलीकडे आणि तुझ्या प्रतिभेकडे गुरूजीनी क्वचितच नीट लक्ष देऊन पाहिलं असेल.कारण त्यांचं लक्ष भाषा-विज्ञानाच्या प्रतिभेकडे मुल्यांकन करण्यात जास्त केंद्रीत झालेलं असावं.”
मला म्हणाला,
“मी जाणलं होतं की शाळेत यशस्वी वाचन किंवा लेखन केल्यानेच यशस्वी लक्षाधीश व्हायला ते कारण कारणीभूत असण्याची जरूरी नसावी. माझा त्यावेळी असा भरवंसा होता की तेव्हा आणि भविष्यात संपूर्ण कॉलेजातसुद्धा आणि नंतर जीवनात मला हवं ते मी करू शकतो. कारण मी माझ्या खास आणि अनेकपद्री प्रतिभेवर भरवंसा ठेवीत होतो.”

मी रघूला म्हणालो,
“मला आठवतं,तू मला अनेकदा ही शाळा सोडून जाण्याचा विचार करीत होतास.असं सांगायचास.”
“अगदी खरं”
असं म्हणत रघू पुढे सांगू लागला,
“माझ्या चवथ्या ते सहाव्या वर्गापर्यंत जेव्हा वाचन आणि लेखनावर शाळेत भर दिली जात होती त्यावेळी कंटाळून मला नको ती शाळा असं वाटायचं.परिक्षा हे माझं एक संकट असायचं.त्यामुळे मला भाषेत तसंच गणीतात अगदी कमी मार्क्स मिळायचे.माझे गुरूजी मला वरचेवर म्हणायचे
“तुला खूप अभ्यास करावा लागेल.”
हे ऐकून मी थोडा खचून जायचो, कारण मी खरोखरच खूप अभ्यास करायचो.माझ्या गुरूजीना त्या गोष्टीचं तेव्हा आकलन होत नसावं. माझ्या दुर्दैवाने मेहनतीचं मला फळ मिळत नव्हतं.परिक्षेत कमी मार्क्स पाहून मला वैताग यायचा.मला असे गुरूजी मिळाले होते की माझ्यावर त्यांचा भरवंसाच नव्हता.त्यांना वाटायचं मी कधीच यशस्वी होणार नाही.म्हणजेच त्यांना म्हणायचं असेल की मी आयुष्यात कधीही वर येणार नाही.”

“पण नंतर तू शाळा बदललीस.आणि त्यानंतर आपला संपर्क राहिला नाही.पुढे तू काय केलंस ह्याचंच कुतूहल मला होतं.म्हणूनच ते ऐकायला तुझा मी वेळ घेत आहे”
मी रघूला म्हणालो.

“मला त्या वातावरणातून दुसरीकडे जावसं वाटायला लागलं.मी शाळा बदलली.एव्हडी आशा ठेवून की कदाचीत त्यामुळे मला यशस्वी होण्याचा एक मोका मिळू शकेल.शाळेत बदल केल्याने माझ्या प्रतिभेकडे निराळ्या दृष्टीकोनातून बघीतलं गेल्यास मी भविष्यात लक्षाधीश होऊ शकेन.”
रघू आपल्या मनातलं अगदी सद्नदीत होऊन सांगत होता.

“शेवटी मी शाळा बदलली आणि ते वातावरण बदललं. गंमत म्हणजे, सरतेशेवटी मी जी व्यक्ती बनलो ती मी मला व्हायचं आहे म्हणून आशा करीत होतो त्यापासून फारच निराळी होती.त्यानंतर मी भविष्याकडे पाहू लागलो आणि काय घडेल त्याकडे लक्ष केंद्रीत केलं.
शिक्षणाच्या नवीन वातावरणात आता मी आल्याने त्यावेळी मला दिसून आलं की मी जर माझ्या लक्षाकडे आणि प्रयत्नाकडे नीट केंद्रीत राहिलो तर मी काहीही करू शकतो.ह्या नव्या वातावरणाने उत्तमोत्तम व्ह्यायला मला मोका मिळाला. मला अभिव्यक्त व्हायला मोका मिळाला.ज्या ठिकाणी माझ्या म्हणण्याला अर्थ होता,असं ते ठिकाण आहे अशी माझ्या मनात आशा निर्माण केली गेली आणि शेवटी मी यशस्वी झालो.”

“पण ह्या व्यवसायाकडे कसा वळलास ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाहीस.”
मी त्याचा बराच वेळ घेतोय हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही म्हणूनच परत तोच प्रश्न मी त्याला केला.

मला रघू म्हणाला,
“मी पुढे पत्रकार व्हायचं ठरवलं.जर्न्यालिझममधे डिग्री घेतली.प्रथम एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात रिपोर्टर म्हणून काम केलं.लेख लिहीत गेलो. ह्या छापखान्याचे मुळचे मालक माझे सासरे प्रभाकर मतकरी.
मी प्रथम इकडे सहसंपादक म्हणून काम केलं.मतकरी माझ्या कामावर आणि माझ्यावरही खूश होते.त्यांनी मला जावंई करून घेतलं.आता माझा एक स्वतंत्र छापखाना आहे.लवकरच मी जूनी छापखान्यातली यंत्र रद्द करून नवीन डीजीटल छपाईची यंत्र आणून हा पब्लिशरचा व्यवसाय वाढवणार आहे. आणि मी खूश आहे.”
निघता निघता मी रघूला म्हणालो,
“तू खूश का नसणार.लक्षाधीश झालास की.!”
रघू सातमजली हंसाला.दुसरं पान तोंडात कोंबीत मला म्हणाला,
“तुझ्या कविता छापल्याच म्हणून समज”

माझ्या कविता छापायचं त्याने मला आश्वासन दिलं.हे निराळं सांगायला नकोच.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 15, 2010

“विश-फूल थिंकीन्ग”

“एका जंगलात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला मी एक पुतळा पाहिला.मी जेव्हा त्या पूतळ्याच्या जवळ जवळ जात गेलो तसं माझं आश्चर्य वाढत गेलं.”

आज प्रो.देसाई जरा उदास दिसत होते.बर्‍याच दिवसानी आम्ही दोघे तळ्यावर भेटत होतो.मी माझ्या कामात दंग होतो.आणि भाऊसाहेब आपल्या मुलाकडे थोडे दिवस राहायला गेले होते.प्रो.देसाई मुलाकडे राहायला गेले की तिकडे भरपूर वाचन करतात असं मला एकदा म्हणाले होते.कारण त्यांच्या मुलाच्या घराजवळ एक सुंदर वाचनालय आहे. तिकडे जाऊने ते आपला वेळ वाचनात घालवतात.
जगात चाललेल्या मनुष्य संहाराच्या घडामोडीवर पेपरात आलेल्या बातम्या वाचून ते बरेच दुःखी होतात.मागच्या खेपेला सुद्धा जनसंहारावर मला त्यानी एक सुंदर लेक्चर दिलं होतं ते आठवलं.

ह्यावेळी पण तसाच काहीसा त्यांचा प्रयत्न असावा असं मला त्यांच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं.आणि ते खरं ठरलं. भेटल्यावर सुरवात करतानाच मला ते म्हणाले,
“मला वाटतं माणसाच्या अंतरंगाचं सामर्थ्य आपण जेव्हडं अनुमान करतो त्यापेक्षा जास्त असावं.ह्या अनुमानामधे माणसाने स्वतःच्या अगदी उत्कृष्ट शाबीत करण्याच्या क्षमतेपासून ते जीवीतहानी करण्याच्या क्षमते पर्यंत अंतरभाव केला आहे.”
मी त्याना म्हणालो,
“मला वाटतं माणसाच्या अंतरात सूर्याच्या उर्जेसारखी शक्तिची झांक दिसते. जीवन निर्मितीचे स्थान आणि जीवनाच्या विनाशाचंही एक स्थान त्या दोघांमधे आहे.आणि ह्या दोन्ही स्थानामधला फरक काहीसा कमीच पण निर्णायक आहे. त्याचं कारण दोघातलं सूक्ष्म अंतर आहे.”

माझा हा विचार ऐकून प्रोफेसर म्हणाले,
“रोजच्या बातम्या आपण पेपरमधे वाचतो.कुठे ना कुठे माणसाचा संहार चालू आहे.आपल्या शेजारच्या देशात आपल्या देशात,आणि सातासमुद्रापलिकडल्याही देशात त्याच गोष्टी उद्भवताना दिसतात.मग त्याला कारण काहीही असो. धर्मासंबंधी असो,देशादेशातल्या सीमेबद्दल असो किंवा आर्थिक शीरजोरीबद्दल असो.
पण मला समजत नाही माणसाने, उदारतापूर्वक क्रियाशील असणं,सहानुभूतिपूर्वक नातं संभाळणं, निकृष्टतम भोगणं, सर्वोत्तम गोष्टीला अनुकूल होणं, असं करणं आणि त्यानंतर माणसाने माणूसकी पलिकडे जाऊन सुद्धा सहृदयी होणं हे पण त्याला शक्य आहे.”

मी हे भाऊसाहेबांचं ऐकून त्यानाच प्रश्न केला की,
“निर्दयी म्हणून क्रियाशील रहाणं,अविरतपणे द्वेष करीत रहाणं,कैकदा आपत्तित रहाणं,जशास तसं प्रत्युत्तर करणं, असं करून माणूस आपल्याच उर्जितावस्थेपासून स्वतःला वंचित करून घेत,स्वतःच्याच र्‍हासाला कारणीभूत होत आहे असं तुम्हाला नाही का वाटत?.”

“मी तुम्हाला माझी जूनी आठवण सांगतो”
असं म्हणत प्रोफेसर मला म्हणाले,
“मी गोव्यात असताना एका खेडेगावात गेलो होतो.तसं गोव्यात गेल्यावर मला खेडेगावात पायी जायला जास्त आवडतं. विशेष करून ज्या खेड्यात घनदाट जंगल आहे तीथे मी जास्त रममाण होतो.एका जंगलात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला मी एक पुतळा पाहिला.मी जेव्हा त्या पूतळ्याच्या जवळ जवळ जात गेलो तसं माझं आश्चर्य वाढत गेलं.तो काळाकुट्ट सांगाडा,आकार आणि समानतेत अगदी यथार्थ होता.आणि त्या पुतळ्याच्या हाडकूळ्या उंचावलेल्या हातात त्याचंच पुष्ट हृदय धरलेलं होतं.त्या पुतळ्याकडून सुचवला जाणारा इशारा सर्व चिंतनातून संपूर्ण सुटकारा करून देत
होता. घातक भय आणि आशाजनक अभिलाषा संमिलित झालेली दिसत होती.आणि त्यामुळे भावोत्तेजक विरोधाभास निर्माण झाला होता.जीवन-मृत्युचं हृदयातर्फे उलटापलट होत असते असं काहीसं मनात येत होतं.”

मी त्यांना विचारलं,
“हा असा पुतळा कुणी तीथे उभारला असेल?.त्या शील्पकाराला त्यातून काय संदेश द्यायचा असेल?.तो पुतळा पाहून तुमच्या मनात त्यावेळी काय विचार आले असतील?”
मला म्हणाले,
“त्या दाट जंगलात आणि त्या शांत वेळी मला माझ्या पायाखालच्या जमीनीत मनुष्यजातीवर ओढवलेल्या असंख्य आपत्याचं दृष्य माझ्या मनःचक्षू समोर काही कारणामुळे आणता येत नव्हतं.पण माणसाने अपरिमीत दुःख सोसलंय. कुठची ही फूटपट्टी किंवा कुठचाही तराजू त्याचं मापन करू शकणार नाही हे मात्र त्यावेळी लक्षात येत होतं.
ज्यांच्या जीवीताची हानी झाली त्या अभाग्याना नफरतीचं आणि भयभीतीचं लक्ष म्हणून निवडलं गेलं होतं.त्यांना आश्चर्यजनक अमानुषकतेने वागवलं जात होतं.माणसानेच माणसाला काय केलं ते पाहून मन सुन्न होऊन निःशब्द व्हायला झालं होतं.ह्या भयंकर प्रकाराला अनेक नावं असतील पण त्यातलं एक नाव म्हणजे जातिसंहार असं आहे.”

मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“ह्यातली विचारणीय गोष्ट म्हणजे दोन्ही कडून म्हणजे जीवन आणि मृत्युकडून मनुष्याच्या हृदयाच्या बहुरंगी सामर्थ्याच्या दिसणार्‍या परिमाणाच्या आठवणीची द्खल. आणि दोघातला फरक अगदी साधा आहे.पण प्रश्न पडतो की, आपल्या जीवनात भयभीतीला आणि नफरतीला निवडण्यात जी भूमिका आपण घेतो त्यावरून आपलं अंतरंग आकांक्षा करतं की करण्याचं सोडून देतं हेच कळत नाही.”

“कारण नफरत शक्तिशाली असते आणि भयभीती विकट झालेली असते.स्वतंत्रपणे दोन्ही गोष्टी मनात ताप आणत असतात असं असूनही त्यांचं अस्तित्व माणसाच्या मनाला जाणवत नाही.”
कारण देत प्रो.देसाई असं मला म्हणाले.
पुढे म्हणाले,
“सामाजीक अतीरेकीपणाच्या रचनात्मक कार्यात शांती आणण्याचं काम एखादा मधेच आलेला समयाचा विराम कारणीभूत होतो.आणि हा विराम केव्हा येईल हे हुडकून काढणं अशक्यप्राय आहे.
चाळीसएक वर्षापूर्वी हे माझ्या लक्षात आलं,किंबहूना मीच त्या गोष्टीच्या लक्षात गेलो असं म्हणायला हरकत नाही.आता मला माहित झालं आहे की माणसाकडून होणारं पाप गहन आणि हानिकारक असतं. ते पाप ही एक आंधळी रक्तपिपासू प्रक्रिया आहे.”

माणसाबद्दल सकारात्मक विचार आणून मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“माणसाचं औदार्य आणि दयाळुपणा काही कमी प्रभावशाली नाही. असं असल्याने, मला वाटतं माणसाचं ह्रुदय मृत्युच्या विचारापासून वेगळं राहून जीवनाला योगदान देऊं शकतं.रक्तपिपासू उन्मत्ततेपासून दूर राहून माणूस स्वतःलाच अशा हृदयाची अर्पण झालेली वस्तू असं समजून ते हृदय कायम स्विकारूं शकतो.”
माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसायाना हंसू आवरलं नाही.ते मला म्हणाले,
“सामंत,ह्यालाच इंग्रजीत “विश-फूल थिंकीन्ग” म्हणतात.पीढ्यानपीढ्या हा असाच विचार करून माणूस जगत आहे.आपण पण असाच विचार करून आशेवर जगत आहो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co

Friday, February 12, 2010

डोंबार्‍याची कसरत.

“जसं योगासनं करताना योगाला शरीराच्या केंद्र-भागातून क्षमता घ्यावी लागते,तसं जीवनातलं संतूलन संभाळताना जीवनमुल्यांतून श्रद्धेमधून आणि मुलतत्वातून क्षमता घ्यावी लागते.”

“रस्त्यावरचा डोंबारी रस्त्यावर दोन बाजूला तीरकांड ठेऊन मधे घट्ट दोरी बांधून हातात एक काठी घेऊन तोल संभाळून त्या दोरीवरून चालाण्याचा त्याचा प्रयत्न पाहून मी ते लक्षात घेऊन आयुष्यात तोल संभाळायचं शिकले.”
रेखा खानोलकर असं म्हणून,मी देत असलेल्या सर्कसबद्दलच्या माहितीशी आणि तीच्या डोक्यात असलेल्या डोंबा‍र्‍याच्या दोरीवरच्या कसरतीशी तुलना करून ती आपलं आयुष्य कसं जगली ते सांगत होती.

त्याचं असं झालं,रेखा शिक्षीकेच्या पेशातून निवृत्त होऊन आता जवळपासच्या मुलाना घरी ट्युशन देते.हे केवळ ती तीचा वेळ जाण्यासाठी करीत असते.माझी आणि रेखाची जूनी ओळख होती.
माझी बहिण मला म्हणाली,
“तुझी रेखाशी ओळख आहे.मृणालीनीला-{म्हणजे तीच्या मुलीला-)त्यांच्या घरी आणखी शिकण्यासाठी पाठवायचं माझ्या मनात आहे.पण त्या ठरावीकच संख्येत मुलाना शिकवतात.त्यांच्याकडे बॅकलॉग पण खूप आहे.तू जरा त्यांना सांगून पहाशील कां?”
मी प्रयत्न करतो असं माझ्या बहिणीला म्हणालो.

त्यासाठी एकदा वेळ काढून रेखाच्या घरी गेलो होतो.
घरी कोणच नव्हतं फक्त रेखा सोडून.
“कुठे गेली सगळी मंडळी?”
मी तीला विचारलं.रेखाचे पती आणि त्यांची नातवंड सर्व मिळून गावात आलेल्या सर्कसला गेली होती.रेखालापण त्यांच्याबरोबर जायचं होतं.पण मी तीला भेटायला येत आहे म्हणून फोन केल्याने ती माझ्यासाठी सर्कसला न जाता घरी वाट बघत थांबली होती.
“अगं,मी नंतर कधीतरी आलो असतो.तू माझ्यासाठी त्यांच्याबरोबर जायचं का रद्द केलंस?”
असं मी तीला म्हटल्यावर हंसली आणि म्हणाली,
“तुमच्याबरोबर चर्चा करण्यात आणि लहानपणाच्या गोष्टी आठवून मन रिझवण्यात मला जास्त दीलचस्पी वाटली.बरेच दिवस आपण भेटलो नव्हतो. आणि अलीकडे मला गर्दीत जायला जरा कंटाळा येतो.हे दुसरं कारण.म्हणून मी गेले नाही.”

सर्कसचा विषय निघाल्याने मी रेखाला म्हणालो,
“तुम्ही सर्व बिल्डींग मधली मुलं आमच्या मुलांसकट ग्रेट रेमन सर्कसला जायचा.तुला आठवत असेल.रेमन सर्कसचा मालक माझ्या ओळखीचा असल्याने एकदा मी तुम्हा सर्वांना प्रयोग चालू होण्यापूर्वी पडद्याच्या मागे घेऊन गेलो होतो.”
मला रेखा म्हणाली,
“नक्कीच मला आठवतं.
सर्कसमधे एखादा विदूषक सिंहाचा तोंडावळा मानेत धरून केसाची आयाळ पाठीवर पसरून सिंहाची डरकाळी देतो तो सिंह माझ्या लक्षात आहे.खर्‍या सिंहावर काबू ठेवण्यासाठी हातात चाबूक घेऊन तो चाबूक हवेत हलवून आवाज काढणारा तो रिंगमास्टर माझ्या लक्षात आहे.दोरीवर चालून दाखवण्याच्या रियाजामधे त्याला प्रथम म्हणे जमीनीवर पट्टी चिकटवून ती पट्टी दोरी समजून प्रत्येक पुढचं मागचं पाऊल त्या पट्टीवरच राहिल अशा तर्‍हेने चालण्याची कसरत करावी लागते हे त्याने सांगीतलेलं ही माझ्या लक्षात आहे.”

“नजर समोर असूदे,एका पाऊलासमोर दुसरं पाऊल पडूदे,खाली नजर न टाकता तोल संभाळ”
असं तसली कसरत करणार्‍याला सांगीतलं जायचं.”
हे त्यावेळी त्यांचा ट्रेनर सांगायचा हे ही तुला आठवत असेल.”
मी रेखाला म्हणालो.

“ही सर्कस मधली शिकवणूक माझ्या लहानपणात मी पाहिली होती.
पण हा तोल सभांळण्याचा धडा मी माझ्या आयुष्यात उपयोगात आणला.जीवनातला बराचसा काळ असाच तोल संभाळायच्या कृतीत घालवला.”
रेखा मला जरा गंभीर होऊन म्हणाली.
“शाळेतली शिक्षीका म्हणून विद्यार्थ्याबरोबर,माझ्या पतीबरोबर आणि मुलांबरोबर वेळेच्या संतुलनाची कृती करण्यात मी माझा वेळ घालवला.शाळेत विद्यार्थ्यांबरोबर वापरल्या गेलेल्या शक्तिचा तोल संभाळून घरी आल्यावर माझ्या मुलांबरोबर उरलेली शक्ति वापरली. रोज शाळेत विद्यार्थ्यांना वाचायचे धडे देण्याच्या जबाबदारीचं संतूलन राखून रोज सकाळी आलेली वर्तमान पत्रं वाचायला अवसर राखून ठेवला.रोजचा व्यायाम करण्यात,शांत झोप घेण्यात हे संतूलन उपयोगी होत होतं.

अलीकडे मला ह्या संतूलनाची जरूरी भासली की योगासने करते.”
योगासनात संतूलनाची भारी जरूरी भासते.योगामुळे मन,शरीर आणि श्वासाला मेळ आणला जातो.ह्या गोष्टी आंतरिक ध्यान ठेवण्यास नक्कीच मदत करतात.जसं योगासनं करताना योगाला शरीराच्या केंद्र-भागातून क्षमता घ्यावी लागते,तसं जीवनातलं संतूलन संभाळताना जीवनमुल्यांतून,श्रद्धेमधून आणि मुलतत्वातून क्षमता घ्यावी लागते.

तेव्हा परत सर्कशीच्या वातावरणाचा विचार केल्यास,मी जर का सिंह झाले असते तर डरकाळी कशी द्यायची शिकले असते.रिंगमास्टर असते तर चाबूक हाणायला शिकले असते.परंतु हे सर्व सर्कशीतलं वातवरण झालं असतं.पण त्या दोरीवर चालणार्‍या डोंबार्‍यासारखं नजर अगदी समोर ठेवून चालायला शिकल्याने अगदी जवळच्या क्षणांकडे जास्त केंद्रीत रहाण्यापासून टाळाटाळ करणं मला शक्य झालं.एका पाऊला पुढे दुसरं पाऊल टाकून लहान लहान पाऊलं टाकताना मोठे उद्देश साध्य करायला मला जमलं.आणि खाली नजर न टाकल्याने मी तोल संभाळू शकले.

शेवटी मी तीला गंमतीत म्हणालो,
“तुझ्या ह्या बोलण्यावरून एक मात्र मला नक्कीच माहित झालं आहे की,कधी कधी तुला, तू पन्नास फुट उंच हवेत असल्यासारखं आणि कधी कधी केवळ जमीनीवरच्या चिकटपट्टीवरून चालल्या सारखं वाटत असणार.”
माझ्या विनोदावर रेखा हंसली आणि म्हणाली,
“तुमचं माझ्याकडे काय काम आहे ते तुम्ही सांगीतलं नाही”

नंतर मृणालीनीचा विषय काढून मी माझ्या बहिणीचं तीच्याकडून काम करून घेतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 9, 2010

लाकडी जमीन.

“पुष्कळ वर्ष वापरून वापरून जुनाट झालेल्या लाकडी जमीनी विषयी मला विशेष वाटतं.”

बरेच वेळा एखाद्याच्या कुटूंबात दुर्दैवाने आनुवंशिकतेचं बरंच बंड माजलेलं असतं.शास्त्रिय कारण काहीही असूंदे त्याचे दुष्परीणाम कुटूंबातल्या काही लोकाना भोगावे लागतात.
सुनंदाच्या कुटूंबात अपंगत्व येण्याची परंपरा होती.तीच्या मावशीला पोलियो झाल्याने ती अपंग होती आणि सुनंदाला स्वतःला डाव्या हातापेक्षा उजवा हात काहीसा तोकडा असल्याने अपंगत्व आलं होतं.तशी सुनंदा दिसायला सुस्वरूप होती.चांगली शिकलेली पण होती.
पण तीने लग्न केलं नव्हतं.तीची मावशीसुद्धा अविवाहित होती.
सुनंदाला लग्नाच्या बर्‍याच ऑफर्स आल्या होत्या.पण तीने चक्क आपण मावशीसारखंच रहाणार म्हणून घरात सांगीतलं होतं.मी तीला एक चांगला मुलगा सुचवला होता.त्याचा एक डोळा दुसर्‍या डोळ्यापेक्षा जरा लहान होता. सुनंदाच्या अपंगात्वाबद्दल ज्यावेळी मी त्याला सांगीतलं त्यावेळी तो तीच्याशी लग्न करायला एका पायावर तयार झाला होता.पण सुनंदाच स्वतः तयार नव्हती.माझा नाइलाज झाला.
त्यानंतर बराच काळ निघून गेला.सुनंदाला मी अचानक एका औषधाच्या दुकानात भेटलो होतो.ती तीच्या गावात न मिळणारी काही औषधं न्यायला शहरात आली होती.मी तीला विचारलं,
“सुनंदा कशी आहेस तू?”
मला म्हणाली,
“आता मी बरीच सुखी आहे.मधे पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं.”
मी तीला माझ्या घरी घेऊन गेलो.ती एक दिवस माझ्या घरी राहिली.
खूप दिवसानंतर मी तीच्या कडून ऐकत होतो.

मला म्हणाली,
“तुम्ही माझ्या लग्नासाठी प्रयत्न केला होता.पण लग्न न करण्याचा माझ्या निर्णयाला मी चिकटून राहिले ते आता मला बरं वाटत आहे.
माझी मावशी मला नेहमी म्हणायची,
“स्त्री जन्माची कहाणी पुरूषाच्या जन्मापेक्षा बरीच निराळी असते”.
तीन वर्षापूर्वी माझ्या मावशीचं निधन झालं.माझ्या आईबाबांच्या पीढीत हा पहिलाच मृत्यु होता.माझी मावशी एकटीच होती.ती माझ्या बालपणातली माझी अनुकरणीय व्यक्ति होती.तीच्या सारखं मलाही लग्न करायचं नव्हतं.कुटूंब वाढवायचं नव्हतं.माझ्या मावशीला पोलियो झाला होता. ती एका पायाने अधू होती.त्या आजाराला पूर्वी पायातून वात गेला म्हणायचे.त्या अपंगपणाच्या व्याधीमुळे तीचा लग्न न करण्याचा उद्देश उघड होता.”

मी सुनंदाला म्हणालो,
“आपल्या समाजात स्त्रीयांना लग्न केल्यानंतर म्हणा किंवा लग्न केलं नसलं तरी आयुष्यात खूप समझोता करून घ्यावा लागतो.पुरूषांवर तेव्हडी परिस्थिती नसते.”
मला ती म्हणाली,
“माझ्या सारख्याना किंवा माझ्या मावशी सारख्यांना तर समझोत्याची फारच जरूरी भासते.माझी मावशी असेपर्यंत मला बराच धीर होता.तीच्याकडून मला नेहमीच सल्ला मिळायचा.
माझ्या मावशीच्या जाण्यानंतर माझ्या इतर नातेवाईकांबद्दल मी थोडी चिंतीत होते.तीच्या नंतर आता कोण हा माझा प्रश्न होता.कित्येक महिने मी उत्कंठा आणि करुणा तसंच थकावट आणि सुन्नता असल्या गोष्टींच्या कात्रीत सापडले होते.नंतर हळू हळू माझ्या लक्षात आलं की मी एका शब्दात काय अनुभवत होते ते.तो एकच शब्द होता: दुःखं.

मी ह्या दुःखाशी दोन हात करायचं ठरवलं.लांब रानात फिरायला जायचे,एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसायचे.देवाळात जाऊन बसायचे.
देवळातल्या किर्तनात भाग घ्यायचे.ह्या सर्वांचा काहीच उपयोग होत नव्हता.एकदा माझ्या एका मैत्रीणीने मला एका मेळाव्यात बोलवलं.अनेक तर्‍हेची दुःख सहन करून एकट्याच रहाणार्‍या समविचारांचा तो बायकांचा मेळावा होता. भातशेतीच्या परिसरात एक मोडका मांगर होता.आंब्याच्या झाडाच्या फळ्या कापून,लाकडाची जमीन बनविण्यात आली होती.शिवाय त्याची आणखी डागडूजी करून तो मांगर वापरण्याजोगा केला होता. त्या जागी आम्ही सर्व जमायचो.सगळी जमल्यावर आम्ही कधी कधी भजनं करायचो,कधी एकमेकाचे विचार एकमेकाना समजावून सांगायचो.ती एक चिंतनशील सक्रियता असायची.मनःशांती मिळायची.
एकदा अशीच मी चिंतनात मग्न असताना माझ्या मावशीची मला आठवण झाली.तीच्या जाण्यानंतर मला प्रथमच जाणीव झाली की पुन्हा मला दुःखाने घेरलं आहे.मी ही गोष्ट होण्यापासून खूप टाळलं होतं.”
“पण हे असं का झालं?”
असं मी तीला कुतूहलाने विचारलं.

“त्याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की एकदा त्या मांगरात असताना मी एकाएकी माझ्या पायाखालच्या लाकडी जमीनीवर एकटक बघू लागले होते.माझ्या मनात आलं की नक्कीच अगदी सुरवातीला ही लाकडाची जमीन रंगवून ती चांगली पॉलीश केली गेली असणार.त्यानंतर बरेच दिवस त्यावर अनेक पाऊलं चालली असावीत.खुर्च्या एकडे तीकडे करून तीचा वरचा थर खरचटला गेला होता.सूर्याच्या उन्हाने ती फिकी झाली होती.थंडीने ती आकसली गेली होती.शेवटी रंग आणि पॉलीश तर खरडून गेलं होतंच शिवाय लाकुड अगदी जूनं झालं होतं. आणि आता आता तर मुळ लाकडाचं रूप दिसू लागलं होतं.त्या लाकडावर असलेल्या नैसर्गिक आकृत्या उठून दिसत होत्या. आणि त्या आकृत्या पेंट आणि पॉलीशपेक्षा सुंदर दिसत होत्या.त्या जीवंत आंब्याच्या झाडाच्या सुरवातीच्या लाकडाचा भास होत होता.
मी माझ्या मैत्रीणीना हेच सांगत होते.माझ्या मावशीच्या मृत्युनंतर मी पण अशीच खरडलेली,पावलानी घासल्यासारखी, उन्हाने फिकी झालेली आणि थंडीने आकसलेली झाली आहे.माझ्या शरिराचा पृष्ट थर सुद्धा असाच खरडला गेला आहे.”
सुनंदा मला हे डोळयात पाणी आणून सांगत होती.

आणि नंतर पूढे म्हणाली,
“बरेच लोक मी ज्या दुःखातून जात होते त्याहूनही जास्त आणि भयंकर दुःखातून जात असतील.पण त्यांच्यासाठी मला काहीच सांगता येणार नाही.
परंतु ज्यांचा दुःखाचा दर्जा माझ्या दुःखाशी मिळता जुळता असेल त्यांना मी सांगेन की,मृत्यू,नुकसानी आणि निराशा ह्या बाबत नाराज होणं,ते नाकारणं आणि त्यापासून अलिप्त होणं असं करण्याची मुळीच जरूरी नाही.जर नशिबात असलं तर जीवनात मिळणारा चांगला किंवा तापदायक अनुभव आपल्याला आपल्या जीवनाचं जे खरं सार आहे त्याच्या जवळ आणून सोडतं.सारगर्भित आपला वयक्तिक नकाशा त्या जमीनीवरच्या लाकडाच्या नकाशासारख्या उजेडात आणतं.त्या लाकडाच्या जमीनीकडे पाहून मी माझी समाधानी करून घेत असते.”

सुनंदाचं हे मनोगत ऐकून मला तीच्याबद्दल आदर वाटला.मी तीला म्हणालो,
“सुनंदा,तू अविवाहित रहाणार आहेस असं त्यावेळी मला तू सांगीतलं होतंस ते किती दूरविचाराने सांगीतलं होतंस ते आत्ता हे तूझं ऐकून मला पटलं.सुख आणि दुःख हे जो तो कसं मानुन घेतो त्यावर अवलंबून आहे.आयुष्यात समझोता करून कसं रहायचं ते तुम्हा स्त्रीयांकडून शिकलं पाहिजे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 6, 2010

विजय अणावकरचा समजूतदारपणा.

“मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

“मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं जरी कुणी सकाळी नमस्ते म्हणण्यात,एखादं सुंदर हस्त-चित्र पहाण्यात,एकांतात, एखाद्या पक्षाचं सुंदर गाणं ऐकण्यात,खूप धावून आल्यानंतर एखादं थंडगार दूधाचं ग्लास पिण्यात,आणि अशा लहानसहान किती गोष्टी सांगता येतील.
जेव्हा आमची छोटीशी मुलगी एखादं सुंदर फूल आम्हाला आणून द्यायची तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला खूप उमेद यायची.किंवा आमच्या दोन्ही मुलांबरोबर जेव्हा आम्ही सूर्यास्त पहायला जायचो तेव्हा ही खूप आनंद व्हायचा.”
मला विजय अणावकर आवर्जून हे सांगत होता.

विजय मनःशांतीसाठी हे सांगत असला तरी त्याला आतून खूपच त्रास होत होता.त्याच्या मुलाच्या अपघाती निधनानंतर मी त्याला भेटत होतो. हाता-तोंडाला आलेलं मुल असं अचानक गेल्याने मुलाच्या आईवडीलांना काय होत असेल याची कल्पना फक्त ते भोगत असलेल्याच जाणवतं.
विजयचा मुलगा सोळ वर्षाचा होणार होता.आपल्या मित्राच्या स्कुटरवर मागच्या सीटवर बसला होता.एक अगदी शार्प वळण घेत असताना त्याचा तोल गेला आणि मागच्या मागे तो पडला.डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता.आणि जागच्या जागीच तो गेला.
मी ज्यावेळी विजयला भेटायला गेलो होतो तेव्हा बोलायला सुरवात कशी करूं असा प्रश्न पडला होता.

मी विजयच्याच बालपणाची आठवण काढून त्याला बोलता केला.
मी त्याला म्हणालो,
“कोकणात तुझं बालपण गेलं.तू लहान असतानाच तुझे वडील गेले.आठवतात का तुला तुझे ते दिवस?”

मला विजय म्हणाला,
“अगदी लहानपणाचे दिवस जरी आठवले नाहीत तरी काही वेळा सांगून ऐकलेले आणि काही स्मरणात राहिलेले दिवस नक्कीच आठवतात.
मी तीनएक वर्षाचा असेन जेव्हा माझे बाबा मला सोडून गेले.आणि त्यांच्या जाण्यानंतर आमच्या आईने आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सीमाच नाही.आमचं घर साधं असायचं आणि स्वच्छ आणि आकर्षक असायचं. शाळेतून किंवा कामावरून जेव्हा आम्ही घरी यायचो तेव्हा आमची आई आमच्यासाठी सदैव असायची.खूप थकलेली किंवा खूप व्यस्त असलेली कधीही वाटायची नाही.शनिवार हा विशेष लक्षात ठेवण्यासारखा दिवस असायचा.त्यादिवशी आमच्या घरात, खाण्याची विशेष डीश असायची.मग ती झुणका-भाकरी असो,चपाती-शिखरण असो वा एखादी केळं घालून शीर्‍याची डीश असो.”

मी विजयला म्हणालो,
“मला आठवतं तुझ्या मोठ्या भावाच्या आग्रहास्तव मी कैक वेळा तुमच्याकडे जेवायला राहिलो आहे.तुझी आई आपल्या सर्वांना आग्रह करून वाढल्यानंतर आपल्याला जेवताना पाहून तुझ्या आईच्या चेहर्‍यावरची तृप्ती पाहून मला तीच्या विषयी खूप आदर वाटायचा.बरं तू काय सांगतोस ते सांग”

मला म्हणाला,
“माझा पण एखादा मित्र आमच्या बरोबर जेवायला असायाचा. त्या दिवशी आम्ही मारूतीच्या मंदीरात न चूकता जायचो.
मारूतीचं मंदीर आमच्या रहात्या घरापासून बरचसं दूर असल्याने बरीच शेतं ओलांडून जायला लागायचं.वाटेत रानटी फूलं,केवड्याची बनं दिसायची आणि वेणीचा सर करण्यासाठी ओवळीची फुलं नविसरतां वेचून घरी आणायचो.देवाला वहाण्यात किंवा बायकानी डोक्यात माळण्यात त्या वेणीच्या सरांचा चांगलाच उपयोग व्हायचा.
मी शिकत असतानाच आईला मदत होण्यासाठी काही परचूटण कामं करायचो.चांगल्या लोकांच्या सानीध्यात मला काम करायला संधी मिळायची.मला नेहमीच वाटतं की कुठचही काम करताना ते चांगल्या तर्‍हेने करण्यात खरा अर्थ आहे. मग त्या कामासाठी मिळणार्‍या मोबदल्यापेक्षा त्यासाठी घेतलेली मेहनत जास्ती का असेना.मी असंही पाहिलंय एखाद्या कामासाठी पराकाष्टा केल्यास ते जास्त सोपं जातं, आणि दुसरं म्हणजे कुठचंही कठीण काम सोडून देण्यात हाशील नाही.तसंच कुठच्याही कामाची टाळाटाळ केल्यास ते जास्तच कठीण जातं.ही सर्व शिकवण आम्हाला आमच्या आईकडून मिळाली.”

मी विजयला म्हणालो,
“आणि आता तू आणि तुझी पत्नी मिळून कामं करीत असता.किती लोकाना मदत करीत असता.मला बर्‍याच जणानी तुझ्याबद्दल असं सांगीतलं आहे.”
विजयला त्याच्या विषयी असं लोक बोलतात हे माझ्या तोंडून ऐकून खूप आनंद झालेला दिसला.
मला लागलीच म्हणाला,
“मला आणि माझ्या पत्नीला एकत्र काम करायला खूप मजा येते. आमच्या हाताने,आमच्या डोक्याने आणि आमच्या ह्रुदयापासून ही कामं होतात. सृजनशील कामाचं शांतीदायक महत्व,सत्यशोध,आणि नव्या व जून्या मित्रांकडून मिळणारी प्रेरणा हे सर्व अनमोल आहे. मला वाटतं सर्वात जास्त समाधान जीवनात मिळतं जेव्हा आपण मदतीचा हात पुढे करतो आणि तो सुद्धा त्याना जे स्वतःहून वर येण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त लोक जे काही मला माहित आहेत ते दयाशील,उदार आणि सहयोगशील असतात.”

आता मात्र विजयला आपल्या मुलाबद्दल विषय काढ्ण्यापासून राहावलं नाही.कारण त्याचा मुलगापण त्याच्या कामात त्याला मदत करायचा.त्याची आठवण येऊन विजय मला म्हणाला,
“सोळावं लागण्याच्या बारा दिवस अगोदर माझा एकच एक मुलगा अपघातात निधन पावला.ह्या अपघातातून तो वाचू शकला असता.पण आमचं कमनशीब म्हणावं लागेल.माझ्या स्वपनातलं आणि माझ्या आशेतलं सर्व काही त्याच्याकडे होतं.माझं सर्व जग त्याच्या जाण्याने संपूष्टात आलं.इतरा प्रमाणे मी ही त्या अघोर धक्क्यातून जगायला शिकलो.एका वेळी एक मिनीट,एक तास,एक दिवस.त्यापूढे सांगण्यात अर्थच नाही.
ह्या अपघातानंतर मी मनात कडवटपणा ठेवला नाही.उलट माझा देवावारचा विश्वास द्वीगुणीत झाला.मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.”

आलेल्या दुःखातून सावरून,समजूतदारपणा ठेवून विजय स्वतःला संभाळून घेत आहे हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.मी त्याला जवळ घेत म्हणालो,
“विजय,हे ही दिवस जातील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 3, 2010

अरूण आणि अरूणची आजी.

अरूणचा आपल्या आजीवर खूप जीव होता.तो आईपेक्षा आजीच्याच मांडीवर वाढला.लहानपणी झोपण्यापूर्वी आजीकडून एक तरी गोष्ट ऐकून घेतल्या शिवाय त्याला झोपच येत नसायची. तो चालायला लागल्यावर आजी त्याला आजुबाजूच्या परिसरात त्याचा हात धरून फिरायला न्यायची.जेव्हा आजी खूपच वयस्कर झाली तेव्हा त्याने आजीजवळ येऊन राहायचं ठरवलं.आजी जाईपर्यंत त्याने तीची सेवा केली.संध्याकाळ झाली की तीला तो उचलून
आणून पडवीत बसवायचा.वार्धक्यामुळे ती झोपेतच असायची.ते अरूणला समजायचं.
“माझी मला राहूं दे-लिव्ह मी अलोन-”
अशी तीची अवस्था झाली आहे ते त्याला कळायचं.पण तीचा जीव टिकण्यासाठी लागणार्‍या सर्व जरूरींची तो देखभाल करायचा.आजी गेल्यानंतर अरूण खूपच एकटा झाला.त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला हमखास आजीकडून मिळायची.आजीच्या निधनानंतर प्रश्नांची उत्तरं त्याची त्यालाच शोधून काढावी लागायची.
मी अलीकडे जेव्हा त्याला भेटलो तेव्हा सुद्धा तो आजीचाच विषय काढून मला जीवन मुल्यांचं तत्व सांगत होता.

“जेव्हा मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पहातो आणि आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून कसली जीवन-मुल्य मी साधली ह्याबद्दल विचार करतो त्यावेळी,जसं एखादं जूनं चित्र आपण पहातो तसंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.त्या चित्राचा पृष्ठ भाग श्रावण महिन्यातला एखाद्या सोनेरी दिवसा सारखा आहे,एक चार वर्षाचा मुलगा-बहुतेक मीच तो मुलगा-आजीबरोबर पायवाटेवरून चालला आहे,आणि रस्त्याच्या कडेला उगवलेल्या पिवळ्या रानफुलांकडे तो निरखून बघत आहे.
आजीने माझा एक हात धरला आहे.आणि माझा नेहमीच्या खेळण्यातला चेंडू माझ्या दुसर्‍या हातात आहे.आमच्या मागोमाग आमची सफेद रंगाची लहानशीच मनीमाऊ एका गळून पडलेल्या सुक्या पानाशी ते वार्‍याने सरकत पुढे जात असताना त्याचा पाठलाग करीत आहे,शेजार्‍यांचा दानगट कुत्रा मनीला पाहून भुंकत आहे आणि ते ऐकून पळून जाणार्‍या मनीचा पाठलाग करून तीला बाजूला पाडून आपल्या मागच्या दोन पायावर उभा राहून मला चेंडू फेकायला विनवणी करीत आहे.
ते मांजराचं पिल्लू हालचाल करीत नाही.अगदी निपचीत पडलं आहे.मी घाबराघुबरा होऊन सुद्धा माऊकडे पहात आहे.मोठी माणसं जो भयंकर शब्द वापरतात “मृत्यु” तो तीला आला होता.

काही तासानंतर पाऊस पडायला लागला. आजी आणि मी त्या पावसाचे थेंब आणि पडणार्‍या पावळ्या पहात आहो.
“आजी! मरण म्हणजे गं काय?”
मी आजीला विचारलं.
आजी मान हलवीत सांगते
“बाळा मला खरंच काय ते माहित नाही रे! मी आयुष्यभर ते काय आहे ते समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.अजून काहीही समजू शकले नाही.एव्हडंच मला माहित आहे जसं जगणं आहे तसंच मृत्यु हा एक जीवनाचाच भाग आहे.जे जीवीत आहे त्या सगळ्याला ते लागू आहे.
तुझ्या मनीमाऊने ज्याचा पाठलाग केला होता ते पान पण मृत्यु पावलं आणि तुझी मनी पण गेली.त्या पिवळ्या रानफूलाकडे बघ,गेल्यावर्षी ती मरण पावली होती.आणि आता तुला दिसताहेत त्या फुलांचीपण तीच गत होणार आहे.
मनी पुढच्या श्रावणात परत येईल काय? कदाचीत.”
आजीने श्वास घेत सगळं सांगीतलं.
” “कदाचीत!”.मला नाही वाटत.काही ही म्हण.”
मी आजीला म्हणालो.”

हे अरूणकडून ऐकून घेतल्यावर मी त्याला म्हणालो,
“तुझ्या जीवनात तुझ्या आजीचा तुझ्यावर एव्हडा परिणाम झाला आहे की नेहमीच तू त्या चित्राकडे आणि आजीबरोबरच्या त्या संवादाकडे आकृष्ट झालेला दिसतोस.”

“सध्या तरी ह्याच माझ्या आयुष्यात जे मिळू शकेल ते मिळण्यासाठी मी व्यस्त आहे. माझ्या आयुष्यातल्या दिवसातून-कधी काळे कूट्ट दिवस तर कधी प्रखर दिवस- मी जसा मार्ग काढीत राहिलोय त्या मार्गकडूनच अशा विचारसरणीची आयोजना माझ्यात केली गेली आहे.आणि माझा त्यावर भरवंसा आहे.”
मला अरूणने लागलीच उत्तर दिलं.

मी म्हणालो,
“एखाद्याच्या आयुष्यभराच्या अवधित ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण झालं तर कदाचीत पुढच्या जन्मात ती उत्तर मिळावी अशी जीवनाची योजना असावी.कसं आणि कुठे हे सारं मिळू शकेल ते मला माहित नाही.”
मला अरूण म्हणाला,
“मला वाटतं जीवन सर्व मिळून,एकच प्रकारची,सतत वाढत जाणारी लयबद्द प्रक्रिया आहे.मला वाटतं जो तो स्वतःला अनुरूप करतो किंवा कुणाकडून केला जातो.तसंच जो तो स्वतःला विकसित करतो किंवा कुणाकडून केला जातो.
मी माझ्यात असलेल्या बुद्धिमत्तापूर्वक केलं की झालं,मग त्याचे परिणाम यशात किंवा अपयशात का होईनात.?”

“तुझ्याशी मी पूर्ण सहमत आहे.”
असं सांगून मी अरूणला म्हणालो,
“एखाद्या पोहणार्‍याचा जसा पाण्यावर विश्वास असतो तसाच तुझा तुझ्या जीवनावर विश्वास पाहिजे.मला वाटतं,निर्मिती ही सततची प्रक्रिया आहे.इथे आणि आत्ता असं मी म्हणतो.जे तू तुझ्या लहानपणी आजीकडून उत्तर मागू पहात होतास ते त्या चित्रातून तुला उघडपणे दिसत आलं आहे.ती पीवळी रानफुलं,ते सुकलेलं पान,ती तुझी मनीमाऊ.”
अरूणला माझं म्हणणं पटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com