Wednesday, November 30, 2011

साक्षात्कार दिलीपचा.


“मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

दिलीप गव्हाणकर दिल्लीलाच जन्मला.त्याचे वडील वसंत गव्हाणकर सुप्रिमकोर्टात वकिली करायचे.दिलीपही त्यांच्या मागोमाग वकिली करायला लागला.दिल्लीची प्रतिष्टीत मंडळी रहायची त्या वसंत विहारमधे गव्हाणकरांचा बंगला होता.

मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो की गव्हाणकरांच्या घरी भेट देऊन यायचो.मुंबईला येण्यासाठी रात्री दहाची फ्लाईट असायची तेव्हा संध्याकाळचाच गव्हाणकरांकडे येऊन गप्पा मारीत बसायचो.

दिलीप अतीशय देवभोळा,इश्वरभक्त होता.घरात सर्व सणवार आणि धार्मिक कार्यक्रम केले जायचे. एव्हडं की दिलीप आपलं जानवं दरवर्षी बदलायचा.
भटजीना आणून धार्मिक सोपास्कार करून आपलं जानवं बदलायचा.मी त्याला एकदा म्हणालो होतो,
“माझं जानवं कुठच्या खुंटीला मी गुंडाळून ठेवलंय ते आठवत पण नाही”
हसला आणि मला म्हणाला होता,
“माझ्या लहानपणी माझ्या आजोबांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.दर शनिवारी मी शनिमाहात्म्यसुद्धा वाचतो.त्यांना दिलेलं वचन आहे.मला त्यामुळे मनःशांती मिळते.”

मला आठवतं त्यानंतर एकदा माझी आणि दिलीपची ह्याच विषयावर थोडी चर्चा झाली होती. आपला अनुभव तो मला समजावून सांगत होता.

मला म्हणाला होता,
“मी नेहमी मानतो की निसर्गच आपला दुवा विधात्याशी सांधत असावा.प्रत्येकाला त्या अचाट शक्तीशी दुवा सांधायला मोका मिळत असतो असंही मला वाटत असतं.

आम्ही पहिल्यापासून दिल्लीलाच रहायचो.मला माझी एक जूनी गोष्ट आठवते.मी सोळाएक वर्षांचा असेन.प्रथमच माझ्या वडीलानी मला आजीआजोबांकडे गोव्याला जाण्यासाठी विमानात बसवून दिलं होतं.त्यापूर्वी मी बरेच वेळा माझ्या आईबाबांबरोबर आजीआजोबांकडे गोव्याला गेलो
होतो.ह्यावेळी दोन आठवडे मी आजीआजोबांबरोबर राहिलो.प्रत्येक दिवस मजेत गेला.रोज आम्ही समुद्र चौपाटीवर जायचो.

ह्यावेळेला समुद्र पाहून मी अचंबीत झालो.समुद्र मी कधीच पाहिला नव्हता असं नाही. क्षीतिजापलीकडे पाणी पसरलं होतं.मोठमोठ्या लाटावरून सूर्याचं प्रतिबिंब परावर्तीत होत होतं. अवतिभवती सर्वच प्रसन्न वातावरण होतं.समुद्राला ओहटी आली असल्याने,दूरवर उंचच उंच खडकं दिसत होती.

एकेठिकाणी ती खडकांची रांग जणू आकाशाला भिडते की काय असं वाटत होतं.पायाखालची वाळू बरीच गरम झाली होती.फुटलेल्या लाटेच्या थंड फेसाळ पाण्यात अशावेळी पाय बुडवून पहायला मजा यायची.थंड वार्‍याच्या झुळकीबरोबर सर्व अंगात शिरशीरी यायची.

त्याच मुक्कामात एक दिवस मी माझ्या आजोबांबरोबर चौपाटीवर आलो होतो.मला आठवतं,त्या संध्याकाळी मी एव्हडा उत्तेजीत झालो नव्हतो.किंवा त्या संध्याकाळी मला एव्हडं रोमांचक वाटत नव्हतं.पण काही कारणास्तव मला विशेष शक्ती आल्यासारखं,अगदी मोकळं मोकळं वाटत होतं.

विधात्याशी दुवा सांधल्यासारखं वाटत होतं.अंगात नम्रपणा आला होता आणि त्याचबरोबर तिथे असल्याचं महत्वही वाटत होतं.काहीतरी विस्मयकारक वाटण्यासाठी आणि निसर्गाच्या शक्तीनेच हे विश्व निर्माण झाल्याची प्रचिती मिळत होती.

मी कुठच्या धर्माचा आहे किंवा मी कुठच्या देवाला मानतो हे विचारण्यासाठी ती वेळ नव्हती. मलाच स्वतःला त्याबद्दलची खात्री नव्हती.ती खात्री नसण्यात मला आनंद होत होता.त्या निसर्ग रम्य वातावरणात माझ्या अंगात एव्हडी शक्ती कशी आली,एव्हडा निश्चिंत मी कसा झालो होतो, खर्‍या जगापासून मी एव्हडा अलिप्त कसा झालो होतो हे अनुभवूनच तो विस्मय प्रेरणापद वाटत होता.

मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

ही दिलीपची माझ्याशी झालेली चर्चा आणि त्या चर्चेची आठवण मला आज आली कारण मला कुणीतरी सांगीतलं की दिलीप गेला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 27, 2011

श्रद्धा आणि चंगळ



"मनात दुसर्‍याबद्दल चिंता करणं म्हणजेच स्वतःला शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग शोधणं"

काल प्रो.देसाई माझ्या घरी आले होते.बाहेर थंडी खूपच होती.ह्या वयात प्रकृती सांभाळणं आवश्यक असतं.कडक उन्हात थंडी तेव्हडी भासत नाही. म्हणून ते लवकरच आले होते.एकदा संध्याकाळ झाली की मग बाहेर जाववंत नाही.
भाऊसाहेब थोडावेळ बसल्यावर,चहाचा कप त्यांना देत मीच त्यानां म्हणालो,
"श्रद्धा असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हे नेहमीच काही लोकांच्या मनात गोंधळ आणित रहातं. निश्चितता आणि तितकाच तीव्र संशयवाद ह्यामधे

त्या लोकांचं जीवन जास्तीत जास्त विदीर्ण होत जात असतं."


माझं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"काहीवेळा त्यांच्या त्यांनाच सिद्ध न होणार्‍या संकल्पना पटवून घेण्याच्या त्यांच्यात असलेल्या क्षमतेमुळे त्यांना काहीशी शांती मिळाल्यासारखं

वाटतं हे मात्र खरं असतं.
परंतु,ही सहायता तूटपुंजी असते.


नैराश्य आणि वाटतं ते सर्वकाही खोटं आहे, ह्या दोघामधला दूवा अगदीच तकलादू असतो.त्यांच्या बाहेरच्या जगात ह्या मतभिन्नतेचं प्रतीबिंब त्यांना दिसून येतं.विशेष करून ते जेव्हा एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जात असतात तेव्हा.एक टोक म्हणजे गूढवादी जगाचा विचार करण्याचा आणि कधीकधी फक्त चंगळ करण्याचा हव्यास हे दुसरं टोक."


मी त्यांना म्हणालो,
"भाउसाहेब,काही लोक,त्यांच्या मनात जी श्रद्धा असते ती विकसीत करण्याच्या प्रयत्नात असतात.कुणीतरी म्हटलंय ना,
"श्रद्धेवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करणं"
तसं काहीसं त्यांचं होतं.खरी श्रद्धा त्यांना भ्रांतिजनक असते.
त्यांच्या मनात श्रद्धेमधून निघणार्‍या सुंदर,प्रेरणात्मक अर्थाची अल्प झलक,हळुहळु कंटाळा करण्यात किंवा खेद करण्यात क्षीण होत जाते.ते अगदी

निराश झालेले दिसतात."


थोडासा विचार करून रिकामा चहाचा कप समोरच्या स्टुलावर ठेवून गंभिर चेहरा करीत भाऊसाहेब म्हणाले,
"काहींच्या खर्‍या आत्मविषयक समस्या भोवतालच्या जगामुळे नसतात तर त्या त्यांच्याच आत्मकेन्द्रिततेमुळे असतात आणि हे पाहून खरोखरच

धक्का बसतो.स्वतःला तृप्ती वाटली म्हणजे झालं अशा तर्‍हेची वृत्ती उराशी बाळगून जवळच्या लोकांना दुखावलं जातं हे त्यांना कळत नाही.

अनुभवासारखा गुरू नाही ह्या रुढोक्तिने काही लोक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शिकून जातात.काही लोकाना तर अनुभव हाच गुरू असतो.आणि काही

लोक ते मार खाऊन शिकतात."


"भाऊसाहेब,माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो."
असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई हसले आणि मला म्हणाले,
"विचारा.संध्याकाळ होण्यापूर्वी चर्चा संपवूया.एकदा थंडी वाजायला लागली की विचार-शक्ति खुंटते."


मी म्हणालो,
"चंगळ करण्याच्या वृत्तीतून काही लोक जीवनातली काही वर्ष हरवून बसतात.व्यसनाधीन होतात.प्रथम त्यात ते मजा म्हणून मश्गुल होतात. हे

करणं म्हणजे पश्चातापाची पूर्वखूण हे वेळीच न ओळखल्याने, नैराश्य आणि एकटेपण येतं.पहिलं कारण असतं आणि दुसरा त्याचा परिणाम असतो. जणू ते दुष्ट चक्रच असतं.काही लोकांची एव्हडी मजल जाते की एकतर त्यांनी त्यातून बाहेर पडावं नाहीतर मरण पत्करावं असं त्यांच्या मनात सारखं येत रहातं."


"श्रद्धा आणि अनुभव ह्याच्या कात्रीत ही मंडळी सापडलेली असतात."
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
"परंतु,लोकांत शिकण्याची क्षमता असते.त्यांचा स्वतःचा विवेक त्यांच्यात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर शेवटी ज्यांना असा विवेक आहे

त्यांच्याकडून शिकण्यासाठी ते आपले दरवाजे उघडे ठेवतात.काही लोक दुसर्‍या मोक्याची वाट पहातात.हे फाल्तु उघड सत्य आहे असं मानणारे नंतर

लक्षात आणतात की खरंतर त्यात तथ्य आहे.
कुणीतरी म्हटलंय खरं,
"घेण्यापेक्षा कुणालातरी देणं बरं"
श्रद्धेपेक्षा काही लोक हे अनुभवाने शिकतात.


हे सुंदर,विरोधाभासयुक्त सत्य म्हणजेच दुसर्‍याचं कुशल मनात आणल्याने त्यांचाच खर्‍या समाधानीचा मार्ग खुला होतो हे शेवटी त्यांच्या ध्यानात

येतं.
अशा तर्‍हेने आदर्श रहाणं जरी सातत्याने त्यांना जमलं नसलं तरी माझी खात्री आहे की,

"सगळ्या जगात आनंद समाविष्ट झालेला असतो तो केवळ
इतरांचं भलं इच्छिल्याने झालेला असतो
तसंच,
सगळ्या जगातले क्लेश हे फक्त स्वतःलाच आनंद मिळण्याच्या प्रयत्नाने झालेले असतात."
ह्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास नक्कीच असेल."

प्रो.देसायाना आणखी एखादा प्रश्न विचारण्याचं मनात आलं होतं.तेव्हड्यात त्यांचा नातु आलेला पाहिला.
"आजोबा,आई म्हणाली तुम्ही संध्याकाळी चालत घरी यायला निघाला तर तुम्हाला थंडी नक्कीच वाजणार.म्हणून मला तिने गाडी घेऊन जाऊन

तुम्हाला घेऊन यायला सांगीतलं.माझ्या मागेच लागली.सॉरी,तुमच्या चर्चेत मी खंड आणला."


"नाही रे,आमची चर्चा संपली होती तू अगदी वेळेवर आलास"
असं मी त्याला सांगीतल्यावर आजोबा आणि नातू दोघेही घरी जायला निघाले.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 24, 2011

माझ्याच स्वप्नांचा सन्मान.


“विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

ए.एम.चौगुले माझ्याबरोबरच माझ्या ऑफिसात कामाला होता.तो सिव्हिल इंजिनीयर होता.पण त्याला कागदावर नकाशे काढायला खूपच आवडायचं.
तो आमच्या ड्राफ्टिंग खात्यात वरच्या पातळीवर काम करायचा.मला नेहमीच म्हणायचा “तू आमच्या घरी ये”. डोंगरीला तो रहायाचा. डोंगरीला मी पूर्वी एकदा काही कामाला गेलो होतो.
खूपच झोपड्यानी भरलेला हा भाग आहे.पण अधून मधून पांढरपेशांची स्वच्छ घरं पण आहेत. चौगुलेला आमच्या ऑफिसने कुलाब्याला जागा देऊ केली होती.पण त्याला आपल्याच गोतावळ्यात रहायला आवडायचं.म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.त्याचं कारण त्याने मला सांगीतलं होतं.
तो मला म्हणाला होता,
“मी कुलाब्याच्या जागेत सुखी होईन पण माझ्या कुटूंबातल्या मंडळीना डोंगरीची जागा सोडून जाववत नाही.”

चौगुल्याचा मुलगा चांगला शिकला होता.आणि तो संधी मिळताच युरोपमधे रहायला गेला. चौगुल्याने एक दोन वेळा मुलाकडे जाण्यासाठी ट्रीप्स काढल्या होत्या.त्याची एकूलती एक नात युरोपात शिकून थोड्या दिवसासाठी ह्यावेळेला तिच्या आजोबाकडे रहायला आली होती.तिला त्याने एक पार्टी द्यायचं ठरवलं होतं.त्यासाठी मला त्याने घरी बोलावलं होतं.माझं इंप्रेशन होतं ते चूकीचं ठरलं.चौगुल्याचं घर फारच सुंदर होतं.आजूबाजूला स्वच्छ परिसर होता.आणि ह्याच्या घरात चांगली टापटीप होती.

अबदूल महंमद चौगुले माझ्या कोकणातला.धर्माने मुस्लिम असला तरी त्याच्या घरचे नेहमीचे संस्कार सगळेच कोकण्यातल्या स्थानिक संस्काराप्रमाणेच होते.मुख्य म्हणजे तो अस्खलित मराठी बोलायचा.घरातली सगळीच मंडळी मराठीतच बोलायची.जरूरी वाटल्यास उर्दूत बोलायची पण ती कोकणी मिश्रीत उर्दू असायची.ऐकायला मजा यायची.

आपल्या नातीला माझी ओळख करून देताना कोकणी मिश्रीत उर्दूतच बोलला.ती जन्मापासून युरोपमधे राहिली असली तरी संस्कार इकडचेच होते.
माझ्याशी ती मराठीतच बोलत होती.

इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगल्या होत्या.मुस्लिम असून सुद्धा आपण आपले संस्कार तिकडे कसे जोपासून असते हे सांगण्यासाठी मला म्हणाली,
“स्वप्नं पहाणं मला आवडतं.जास्त करून, पडलेलं स्वप्नं खरं करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायला मला आवडतं.मनाने धीट असल्यावर चुका केल्या गेल्या तरी काही हरकत नाही अशी समजूत करून घ्यायला मला विशेष वाटतं.स्वप्नांशिवाय आणि खुळ्या चुका केल्याशिवाय काही साध्य होत नसतं आणि काही शिकलंही जात नसतं असं मला नेहमीच वाटत असतं.

अगदी माझ्या लहानपणापासून माझ्याबद्दल आणि सभोवतालच्या विश्वाबद्दल माझी मोठी मोठी स्वप्नं असायची. मला ज्यात आनंद होईल त्या गोष्टी मी करणार आणि त्या केल्याने मी काहीतरी साधलं ह्याबद्दल मला आनंदही होणार हे मला माहित असायचं.ही स्वप्नं कधीकधी अगदी मामुली असायची आणि कधीकधी खिचकट असायची.

सनातनी मुस्लीम घराण्यात माझा जन्म झाल्याने मी नेहमीच विचारात असायची की ह्यातली काही स्वप्नं खरोखरच मी साध्य कशी करून शकेन?
आणि अलीकडेच मला जाणीव व्ह्यायला लागली की ह्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत.

मला आठवतं त्यावेळी आमच्या कॉलेजची ट्रीप आल्प्स पर्वतावर गेली होती.माझ्या अंगावर बुरखा होता.पण त्यामुळे मला त्या वातावरणातला मस्त अनुभव मिळायला त्याची काही आडकाठी आली नाही.आणि आजुबाजूचे कुणीही मी माझ्या अंगावर काय घेतलं आहे ह्याची पर्वाही करीत नव्हते.त्या बुरख्यावर जोपर्यंत मी माझ्या रक्षणासाठी लागणारा पोषाक वापरत असायची तोपर्यंत त्यात कसलीच बाधा येत नव्हती.

एकदा मी बन्जी-जंपिंगसाठी टर्की ह्या देशात गेली होती.जमीनीपासून पंचावन्न मिटर उंचावर असलेल्या एका धातूच्या कमानीवर उभी राहून,ती कमान वार्‍याच्या प्रत्येक झोतीबरोबर डुलत असताना आणि माझ्या पायाला बांधलेला साखळीदंड मला ओढून धरत असताना,खाली पाहिल्यावर माझी ही उडी म्हणजे माझ्याकडून होणारा महामूर्खपणा होत तर नाही ना असा विचार सारखा माझ्या मनात येत होता.

त्या थंड धातूच्या कमानीवर माझे अनवाणी पाय जोराने दाबून ठेवून भरपूर क्षमता माझ्या स्नायुत आणण्याचा माझा प्रयत्न म्हणजे माझ्या उडी घेण्याच्या सहासापासून मी दूर रहावं असं वाटून घ्यावं,असा हा माझा समज हा माझा आणखी महामूर्खपणा होता.परंतु,शेवटी मी उडी घेतली.ते सहास फारच आनंदीत करणारं,मग्न करणारं होतं.

असलं हे साहस मी पुन्हा करण्यासाठी माझ्यात तेव्हडं धैर्य मी आणू शकेन का कुणास ठाऊक. पण माझ्यातलं एक लहानसं खुळं स्वप्न मी परिपूर्ण करू शकले हे मात्र खरं.असली स्वप्न माझ्या अंगामासात असल्याने त्यासाठी मी नक्कीच खुश आहे.

माझ्या वयक्तिक जीवनात मी असल्या खूप चुका केल्या आहेत.पण प्रत्येक चुकीतून मी माझ्याचबद्दल शिकले.आणि माणूस म्हणून मी असं शिकत शिकत वाढत आहे.सर्वात महत्वाचं असं मी शिकले ते म्हणजे कुणाबद्दल मत बनवु नये.कुणीही परिपूर्ण नसतो.किंवा मी असं म्हणेन विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

आपल्या नातीचं चिंतन ऐकून चौगुले आनंदून गेला होता.
मला म्हणाला,
“मला माझ्या नातीचा अभिमान वाटतो.”

मलाही रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“मी ह्याबद्दल तुझ्याशी जास्त सहमत होऊच शकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 20, 2011

हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.


“आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही.कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.”

मागच्या आठवड्यात विकएन्डला मेरी आणि तिचा नवरा पास्कल माझ्या घरी आला होता.खरं पाहिलंत तर ती दोघं वेसाव्याला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेली होती.पास्कलचं वेसाव्याला त्याच्या वाडवडीलांचं एक टुमदार घर होतं.वेसाव्या गावात बरीच सुधारणा होत असताना ह्यांचंघर आड येत असल्याने प्लानमधे ते पाडून टाकण्याची गरज भासली होती.त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती.पास्कलच्या इतर भावंडात ती रक्कम वाटून घेऊन त्याच्या वाट्याला आलेल्या पैशातून त्याने वसईला एक टुमदार घर घेतलं होतं.आणि त्याला बरेच दिवस होऊन गेले होते.मला पास्कल आणि मेरी वसईला एकदिवस तरी येऊन जा म्हणून आमंत्रण द्यायला आले होते.

मेरी वेसाव्याला असताना नोकरी करायची.मुळात ती हुशार असल्याने बरीच शिकली आहे.कधी कधी कविता करते.काही मासिकात लहान मुलांवर लेख लिहिते.माझी तिची त्यामुळेच एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी भेट झाली होती.
वसईहून नोकरी करण्यासाठी मुंबई शहरात येणं कठीण होणार आहे हे तिला वेसाव्याहून सोडून जातानाच माहित होतं.म्हणून तिने नोकरी सोडून देण्याचा विचार अगोदरच करून ठेवला होता.

एकट्या नवर्‍याच्या जीवावर घर संसार चालवावा लागणार त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काटकसरीत रहाणं आवश्यक होणार आहे हे ती जाणून होती.काही मंडळी आपलं ज्ञान,आपलं शिक्षण आणि आपले संस्कार हीच आपली संपत्ती आहे. जीवन जगण्यासाठी कमीतकमी आवश्यक गोष्टी मिळाल्यावर त्यात समाधान मानून रहाणं आपल्याच हिताचं आहे असं मानतात.मेरी त्यातलीच होती.

मला ही तिची वृत्ति अगोदर पासूनच माहित होती.तशात पास्कल सारखा गुणी नवरा मिळाल्याने मेरी जास्तच सुखी होती.
“वेळातवेळ काढून मी वसईला नक्कीच येईन.पण सध्या तुमचं कसं काय चाललं आहे?तुझं होमवर्कर म्हणून कसं काय चाललं आहे?”
असं मी मेरीला विचारलं.

मला ती म्हणाली,
“आपलं जीवन सामान्य असावं असं मला नेहमी वाटत असतं.नशिबाने,माझं कुटूंब आणि माझी मित्रमंडळी मला जेव्हडा आनंद व्हावा तेव्हडा देत आहेत.मी खरंच नशिबवान आहे की,माझ्या नवर्‍याची मिळकत एव्हडीच आहे की आमच्या कुटूंबाला पुरते.वसईजवळ आमचं एक घर आहे. माझ्या दोन मुलांच्या स्वतंत्र खोल्या आहेत.आमच्या घराच्या मागून दिसणारा देखावा मन लोभण्यासारखा आहे.
मागच्या परसात उंच झाडं आहेत.आमच्या घराच्या छप्परावर त्यांची सावली पडून घर नेहमीच थंड रहातं. आवाढव्य निसर्गात मला रहायला आवडतं.

घरी जेवणखाण भरपूर असतं.आमचं सर्व जेवण आम्ही घरीच करतो.कारण तसं करणं आम्हाला परवडतं.शिवाय बाहेरून आणलेला शेकडो रुपयांचा पिझा किंबा तत्सम खायच्या गोष्टी माझ्या मुलांना खायला जरूरीचं आहे असं मला वाटत नाही.त्यातून खूपच अन्न खाल्लं जातं आणि खूपच पैसे लागतात.

जेव्हडं जमेल तेव्हडं कपड्याची खरेदी करताना मी, सेल लागला असेल तरच करते.प्रसिद्ध ब्रॅन्डचे कपडे खरदी करून नाहक पैसे घालवून बसायला मला आवडत नाही आणि परवडतही नाही.आमच्यासारखीच मिळकत असलेले आमचे शेजारीसुद्धा नाहक खरेदी करण्यात पैसे उडवीत नाहीत.मोठ्या मुलाचे कपडे नीट असतील आणि विरलेले नसतील तर ते धाकट्या मुलाला वापरतात.असं करणं व्यवहारिक आहे असं मला वाटतं.

माझ्या जवळ आहे ते वापरायला मला आवडतं.टीव्हीवरच्या आणि अन्य ठिकाणाहून, जाहिरातीतून येणार्‍या उपदेशावर मी भुलून जात नाही.एका स्थानिक फर्निचर बनवणार्‍याकडून आम्ही आम्हाला जरूरीचे सोफे बनवून घेतले.आमच्या मुलांना त्यावर उड्या मारून खेळण्या इतके ते मजबूत आहेत.
आमच्याकडे एक लहानसा टीव्ही आहे.त्याच्यासाठी एक पेटी बनवून त्यात तो पेटी बंद करून ठेवला आहे.त्यातून येणारा कलकलाट जो आम्हाला जरूरीचा वाटतो तेव्हडाच ऐकून घेण्यासाठी ही योजना आहे.

आमच्या जवळ एक जुनी गाडी आहे.मुलांच्या शाळेतल्या सुट्टीत ती गाडी आम्ही गावोगावी जाण्यास वापरली आहे.आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही. कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.
शिवाय आणखी खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत.आम्ही घरात प्रत्येकाचा जन्म-दिवस साजरा करतो.केक घरातच बनवतो.स्वतःच्या हाताने बनवलेली ग्रिटींग्स लोकाना देतो.मुलाना बरोबर घेऊन प्राणी दाखवण्यासाठी झूमधे घेऊन जातो.म्युझीयम्सपण त्यांना दाखवतो.नातेवाईकांकडे भेटीला जातो.अशावेळी बाहेर गावच्या दिखाव्याच्या होटेलमधे आम्ही रहात नाही.ह्यातच आम्हाला मजा येते.

आमच्या बाहेरच्या जगात डोकावून पाहिल्यावर,माझ्या नजरेतून अनेक गोष्टी सुटलेल्या नाहीत. आकाराच्या बाहेर प्रत्येक गोष्ट फुग्यासारखी फुगलेली दिसते.गाड्या जरूरी पेक्षा मोठ्या मिळतात.जरूरीपेक्षा जास्त खोल्यांची घरं बांधली जात आहेत.शॉपिंग-मॉल्स प्रचंड राजवाड्यासारखे बांधले जात आहेत.
जरूरीपेक्षा जास्त पाण्याचा विजेचा,गॅसचा,पेट्रोलचा,अन्नाचा वापर करणं म्हणजे एक प्रकारचा हावरटपणा दिसून येतो.
मला वाटतं,जरूरीपेक्षा मोठं करणं म्हणजेच अतिरेक करणं.आणि सर्वच काही मोठं व्हायला लागल्यास,खरं सृष्टीसौंदर्यच बिघडवून टाकलं जात आहे.

प्रत्येकानी जर का हात रोखून जीवन जगलं तर मला वाटतं,कदाचीत ज्यांच्या जवळ खरंच काही कमी आहे त्यांना जास्त मिळू शकेल.
आमची दोन जूनी कपाटं आहेत.मधूनच ती कधी उघडून पाहिली तर खूपच कोंबून ठेवलेल्या गोष्टी त्यात दिसतात. ते पाहून मला नेहमीच वाटतं की,निरूपयोगी गोष्टींचा दुरूपयोग होत आहे. जीवन तृप्त आहे असं मानल्यावर अशा गोष्टी पाहून त्या अनावश्यक आहेत असं असताना माझ्या मला मी अशिष्ट आहे असं वाटतं.एखाद्या शर्यतीत भाग घेऊन ती अनुचित मार्गाने जिंकल्यासारखं वाटतं.भरपूर पैसे असल्यानंतर थोडं विक्षित्प वागणं चालून जातं.पण मुळात जे जवळ आहे त्याने प्रत्येकजण तृप्त असेलच असं नाही.

सुखकर जीवन जगण्यासाठी माझ्या जवळ अगदी हवं तेव्हडंच आहे.आणि मला वाटतं,हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.
हे सर्व मी तुम्हाला सांगीतलं तरी तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन तळलेलं पापलेट आणि पापलेटाची तिखट आमटी गरम गरम भाताबरोबर जेवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. त्यासाठी आम्ही दोघं मधेच उतरून खास तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहो.”

“तुझ्याबद्दल मला खूप आदर आहे.तुझ्या शिक्षणाचं आणि तुझ्या संस्काराचं तू उत्तम चीज केल्याशिवाय रहाणार नाही हा तुझ्यावर माझा विश्वास आहे.तुझं घर आणि तुझा संसार बघून मला निश्चितच आनंद होईल.मी नक्कीच तुझ्याकडे येतो.”
असं मी मेरीला सांगीतल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद लक्षणीय होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 17, 2011

आणखी आणखी मिळवण्याची आशा.


“हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे. अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.”

रमाकांतचं पूरं आयुष्य कोकणात गेलं आणि तेसुद्धा आपल्या आजोळच्या घरात गेलं.रमाकांत प्रथमच मुंबईला आला होता.यायची पाळी आली नसती तर तो मुळीच आला नसता.
“ज्यांना आणखी आणखी मिळवण्याची हौस असेल त्यानी जावं वाटलं तर मुंबईला.”
मी ज्या ज्या वेळी कोकणात रमाकांतला भेटायला जायचो त्या त्या वेळी हे त्याचे उद्गार माझ्या कानावर आले आहेत.

“काय रे बाबा?आणखी आणखी मिळवण्याचे तुझे दिवस आता राहिले नाहीत मग तू का बरं मुंबईला आलास?”
असं मी रमाकांतला विचारण्यापूर्वीच उमेशने,त्याच्या मुलाने,सर्व हकीकत सांगायला सुरवात केली.

“बाबांचं आता वय झालं आहे.त्यांना मुंबईचा प्रवास जमत नाही.पण काय करणार उपाय करण्यासाठी इकडे यावंच लागलं.”
मी उमेशच्या घरी रमाकांतला भेटायला गेलो होतो तेव्हा मला उमेश असं म्हणाला.

उतार वयात प्रकृती केव्हा ढांसळेल ते सांगता येत नाही.जीवन प्रवासात आयुष्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे साधरण वय वर्ष अठरा ते अठ्ठावीस.
अठरा वर्षाच्या अगोदरच्या काळात अन-अनुभवी म्हणून ऐकून घ्यावा लागतो तो काळ आणि अठ्ठावीस नंतर तेव्हडा दांडगटपणा करता येत नाही तो काळ.तीशी,चाळीशी,पन्नाशी आणि पुढे आयुष्याचा आलेख हळू हळू उतरणीला लागलेला असतो.
रमाकांत आता सत्तरीला आलेला होता.

“एकाएकी सकाळी उठल्यावर बाबांना लघवीच होईना.ओटीपोटात कळा यायला लागल्या.लगेचच गावातल्या पंडीत डॉक्टरना बोलवलं.”
उमेश मला सांगत होता.
पुढे म्हणाला,
“पंडीतानी काही गोळ्या दिल्या आणि बेळगावला ताबडतोब घेऊन जा म्हणून सल्ला दिला.टॅक्सी करून बाबांना बेळगावला घेऊन गेलो.तिकडच्या डॉक्टरानी बाबांच्या ब्लॅडर मधे कॅथीटर घालून ब्लॅडर रिकामा केला.त्यांना खूप बरं वाटलं पण म्हणाले आता त्यांना मुबईला घेऊन जा.प्रोस्ट्रेट ग्लॅन्डला सुज आली आहे.तिकडे उपाय होतील. म्हणून तसेच आम्ही त्यांना घेऊन मुंबईला आलो.”

“मग इकडे काय निदान निघालं?”
मी उमेशला कुतूहलाने विचारलं.

“ग्लॅन्डला सूज आल्याने तसं झालं.ह्या वयात तसं होतं.ग्लॅन्डचे फोटो काढून कदाचीत बायप्सी करून निर्णयाला आलं पाहिजे.कॅन्सरपण असू शकतो.”
असं इकडचे डॉक्टर म्हणाले.”

चेहर्‍यावर समाधानीची छटा आणून उमेश सांगत होता.
“कोकणात आयुष्य गेल्याने रमाकांतची विल-पॉवर जबरी असणार.”
मी उमेशला म्हणालो.

“अगदी बरोबर. सर्व टेस्ट्स झाल्यावर,तसं काही नाही असं डॉक्टरनी सांगीतलं.फक्त रेस्ट घ्यायाला सांगून औषधं घेण्याची लिस्ट दिली आहे.औषधानी सूज कमी झाल्यावर बरं वाटणार असं डॉक्टर पुढे म्हणाले.बाबा परत कोकणात जातो म्हणून माझ्या मागे लागले आहेत.त्यांना इथे करमत नाही.”
आपल्या बाबांच्या चेहर्‍याकडे बघत उमेशने सांगून टाकलं.

उमेश आणि माझ्यामधे चाललेला हा संवाद ऐकून रमाकांत काहीतरी सांगायला उत्सुक्त झालेला दिसला.
मला म्हणाला,
“मी हा पहिल्यांदाच मुंबईला येतोय.कोकणातलं आयुष्य तुला माहित आहे.इथे मला अवघडल्यासारखं होतं.आमचे आजी आजोबा अशा वयात कुठे मुंबईला येऊन उपचार करायचे?
हरी हरी म्हणत दिवस काढण्याचं हे वय.आहे ते सहन करून दिवस काढण्याचं हे वय.एव्हडा उपाय करण्यासाठी पैसा कुणाकडे होता.आणि उपायही त्यावेळी नव्हते.निवांत अंथरूण धरून रहायचे.आणि त्यातच अंत व्हायचा.
माझे लहानपणातले दिवस मला आठवतात.”

असं म्हणून रमाकांत खुशीत येऊन मला सांगायला लागला,
“पैसे सतत जवळ असण्यात किती फायदेमन्द असतं हे मला माहित होतं.हवेत त्यावेळी मला पैसे मिळायचे. एव्हडंच की मला मागावे लागायचे.पण बरेच वेळा या न त्या कारणाने मी पैसे कमवित असायचो.मी माझ्या आजोळी वाढलो.गावात मला हवं हवं ते मिळायचं.

माझ्या आजोबांच्या घराजवळून गावातला मुख्य रस्ता जायचा.रस्त्याच्या एका दिशेने वाटलं तर मला डोंगरावर चढून घनदाट झाडांच्या रानातून वर पर्यंत जाता यायचं, तसंच वाटलं तर रस्त्याच्या दुसर्‍या मार्गाने समुद्र-चौपाटीवरपण जायला यायचं.संध्याकाळच्या वेळी डोंगरावर चढून गेल्यावर एका विशिष्ट जागेवरून खाली वसलेलं गाव दिसायचं.काळोख होण्यापूर्वी घराघरातून छपरामधून नीळसर धुराचे लोट दिसायचे आणि काळोख झाल्यावर मिणमिणत्या दिव्यातून घरं आढळून यायची.मंगळोरी कौलाच्या घराच्या छपरातून विशिष्ट तर्‍हेच्या कौलामधून धुराचा लोट एखाद्या बोटीच्या नळकांड्यातून येणार्‍या धुरासारखा भास व्हायचा.

घराच्या मागच्या बाजूला आजोबांचं जवळ जवळ चारपाच एकराचं शेत होतं.घराच्या मागच्याच बाजूला मोठा मांगर होता.चारपाच गाई,चारपाच म्हशी, रेडे,शेताचे बैल मांगरात बांधून ठेवलेले असायचे.आम्ही त्याला गाई-गुरांचा गोठा म्हणायचो.गुरांचं शेण आणि मुत जमाकरून दोनतीन मोठ्या खड्यात साचवलं जायचं.त्याला आम्ही गायर्‍या म्हणायचो.शेताला ह्याचा खत म्हणून वापर व्हायचा.

मी पाचएक वर्षांच्या असेन.सर्वांबरोबर अगदी पहाटे उठून आजीबरोबर गोठ्यात जायचो. गड्यांच्या मदतीने आजी दोन चार चरव्या दूध काढून झाल्यावर सर्व गुरांना शेतात सोडून देण्यासाठी गुराख्यांच्या ताब्यात द्यायची. आजोबा बैलांची गाडी जुंपवून त्यात गवताच्या जुड्या भरून शेतात घेऊन जायचे.मी बैलगाडीत माझ्या आजोबांच्या जवळ त्यांच्या मांडीवर बसून बैलांना हाकायचो.गवताचा आणि सरकीच्या पेन्डीचा वास गाडीत बसल्याबरोबर माझ्या नाकात भरायचा.सकाळच्यापारी थंडगार पण झोंबणारा वारा माझ्या अंगावरून गेल्यावर अंगात शिरशीरी यायची.

शेताच्या जवळ शेणाने सारवलेल्या एका ओसरीजवळ आजोबा बैलगाडी थांबवून ठेवायचे.बैलांना इतर गुरांबरोबर जायला सोडून द्यायचे.ओसरीत गवताच्या जुड्या आणि पेन्ड रचून ठेवायचे.हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे.अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.
गाई-गुरांबरोबर आणि शेतीच्या वातावरणाबरोबर मिळत राहिलेला अनुभव मी नेहमीच माझ्या उराशी बाळगून होतो.इतक्या वर्षाच्या माझ्या आजोळच्या वास्तव्यात माझ्या सर्व नातेवाईकांच्या सहवासात मी असायचो.

माझे आईबाबा,बहिणी,आजीआजोबा,पंजी पंजोबा,मामा, मावश्या,चुलत भावंडं शिवाय माझ्यासारखेच माझे खुळे मित्र ते पण तोपर्यंत नातेवाईक म्हणून जमा झाले होते. गावात एकमेकाला सहाय्य होण्याची व्यवस्था स्थापन झाली होती.उन्हाळ्याच्या दिवसात एक आठवड्यासाठी सर्व गोतावळा आमच्या आजीआजोबांच्या घरात एकत्र जमून, धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी, मजा करायचो.साध्या जीवनशैलीची शिकवणूक मी ह्यातूनच शिकलो.

सर्व परिसर शांत असायचा.टीव्ही नाही,रेडिओ नाही.रात्रीचे दिवे म्हणजे घासलेटवर चालणारे कंदील.संध्याकाळ झाली की पडवीत सर्व दिवे आणून साफ पुसून ठेवून,नसल्यास घासलेट भरून मंद पेटवून ठेवले जायचे.नंतर पुर्ण काळोख झाल्यावर एक एक कंदील वेगवेगळ्या खोलीत नेऊन वात मोठी करून ठेवले जायचे.

सर्व वयस्कर मंडळी घरात झोपायची.आम्ही सर्व बाहेर उघड्या पडवीत अंथरूणं घालून झोपायचो. पौर्णिमेदिवशी लख्ख चांदण्यात झोपायला मजा यायची.चंद्रप्रकाश पाहून दिवस उजाडला असं समजून मधूनच एखादा कावळा काव काव करायचा.एखाद दुसर्‍या घुबडाचा ओरडण्याचा आवाज ऐकायला यायचा.बाहेरच्या वातावरणात एव्हडी शांत झोप लागायची की सकाळ कधी झाली हे कळायचंच नाही.

बाहेर मोठ्या फणसाच्या झाडाखाली एका मोठ्या हंड्यात गरम पाणी तापवलं जायचं.शेजारीच असलेल्या, नारळाच्या झापानी बांधलेल्या,आडोशाच्या खोलीत बायका आंघोळ करायच्या.आम्ही सर्व विहीरीत कळशी टाकून रहाटाच्या सहाय्याने पाणी काढून माडाच्या झाडाखाली ठेवलेल्या पाथरीवर आंघोळ करायचो.सर्वांचे धुवायचे कपडे एका मोठ्या ढोणीमधे साचवून धुतले जायचे. विहीरी जवळच ही ढोणी असायची.दोन मोठ्या पिंपळाच्या झाडामधे सूंभाची दोरी बांधून त्यावर धुऊन आलेले कपडे सुकण्यासाठी टांगले जायचे.

मला वाटतं,अगदी साधेपण हे उत्तम असतं.कॉन्क्रीटच्या जंगलात राहून जिथे शेकडो दुकानं असतात,हात पुढे करून बोटाला लागेल ती वस्तु निवडून खरेदी करता येते,तिथे जीवनातल्या लहान लहान गोष्टींचा विसर पडून सुखी जीवनाला गमावून बसलं जातं.मोठमोठाले शॉपिंग मॉल आणि तत्सम सुविधा न मिळाल्याने जीवन कसं जगायचं ह्याचा विसर पडला जातो.

एकंदरीत काय?आताचं आमचं हे वय म्हणजेच व्याधीना तोंड देत जगणं.कोकणात संध्याकाळच्या वेळी समुद्र-चौपाटीवर गेलं असताना सूर्यास्ताचा समय आनंद देऊन जातो.सूर्य अस्ताला जातानाचा देखावा अवर्णनीय असतो.सूर्यास्तावरून मला एक आठवलं,कुणीतरी म्हटलंय,
“सूर्याकडून एक शिकावं.संध्याकाळ झाली की निमुट अस्ताला जावं.”
अगदी तसंच मला वाटायला लागलं आहे.आता आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे.पण अस्ताला जाणं आपल्या हातात थोडंच आहे?”

रमाकांत जे काही सांगत होता ते मी निमुट ऐकून घेत होतो.गत जीवनाच्या जुन्या आठवणी काढून तो रममाण होत असताना डॉक्टरांच्या औषधाला पुष्टी म्हणून,आपल्या बालपणाच्या आठवणी काढून,त्या मला सांगून,तो सुखी होत असेल आणि हा उपाय रमाकांतला बरं होण्यात मदत होत असेल तर ऐकायला काय हरकत असावी असं मी माझ्या मनात म्हणत होतो.?

शेवटी मी त्याल एव्हडंच म्हणालो,
“थोडक्यात मी म्हणेन जे काही आहे त्यात समाधानी मानून न रहाता आणखी आणखी मिळवण्याच्या आशेने कुठेतरी निराशा पदरी आणून रहाणं कितपत योग्य होईल.?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 14, 2011

रोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.

“ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”

अनीलची आणि माझी अलीकडेच ओळख झाली होती.त्यासाठी त्याची माझी ओळख दुसर्‍याकुणी करून दिली नव्हती.अनीलेने स्वतःच मला रस्त्यात गाठून माझ्याशी ओळख करून घेतली होती.त्यानंतर कधीही तो मला भेटला की माझ्या नावा-गावानीशी आठवण लक्षात ठेवून बोलायचा.त्याच्याबरोबर रस्त्यावरून चालायचं म्हणजे दर पल्ल्यामागे त्याला कोणतरी ओळखीचा भेटायचा.

“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा? कुतूहल म्हणून मी तुला विचारतो”
असं मी अनीलला एकदा म्हणालो.
मला अनीलने मजेदार माहिती दिली.
तो म्हणाला,
“रोज नेहमी एखाद्या नव्या व्यक्तिशी माझी भेट व्हावी असं मला वाटत असतं.जर का लोक वेळ काढून रोज कुणातरी एका नव्या व्यक्तिला हलो म्हणतील तर मला वाटतं, मनात असलेल्या प्रतिकूल भावना नष्ट होतील. खरं म्हणजे हा धडा माझा मीच शिकलो आहे.

पूर्वी एकदा मी असाच माझ्या इतर मित्रांबरोबर शहरात येऊन गेलो होतो.शहरात आतंकवाद्यांचा हल्ला होण्यापूर्वी,शहरातले लोक, वस्ताद,दादागिरी करणारे,शिष्ट आणि उद्धट वृत्तिचे असतात असा समज दिला जात असायचा.तेव्हा थांबून कुणाशी गपशप करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीपण ह्यावेळेला मी आणि माझा मित्र मनात थोडा धीर आणून फुटपाथवर चालणार्‍या एका दोघाना एखादी गोष्ट कुठे मिळेल म्हणून सहज विचारण्याचा प्रयत्न करून पाहिला.

दोन चार लोक आपसूप येऊन सांगू पहात होते.आम्ही शहरात नवखे दिसल्याने,स्नेहपूर्ण वागणूक आम्हाला मिळत होती.माझ्या लगेचच लक्षात आलं की,आपला वेळ काढून गर्दीत दिसणार्‍या कुणाशीही बोलणं म्हणजेच विश्व पाहिल्यासारखं वाटणं.

मला आठवतं, माझ्या लहानपणी शाळेत हा प्रयोग मी करून पाहिला होता.माझ्या मनातली योजना अशी होती की,रोज एका अनोळख्याशी संवाद साधायचाच,हे शक्य होईल ह्याबद्दल मी थोडा साशंकच होतो.मी अनुमान काढलं होतं की लोक संवाद साधण्यासाठी अंमळ व्यस्तच असतात.माझं अनुमान खरं ठरलं.माझा प्रयोग असफल झाला.

पण ज्यावेळी मी कॉलेजमधे शिकायला शहरात आलो होतो त्यावेळी ही माझी भन्नाड कल्पना आचरणात आणण्याचं ठरवलं.ज्या परिसरात मी रहात होतो तिथे हा प्रयोग करून पहाण्याचं मी ठरवलं.फार फार तर काय होणार होतं की मी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना एखाद्याकडून मी उपेक्षित झालो असतो. परंतु,तसं झालं नाही.कारण ते लोक पूर्वीसारखे गर्दीतला एक चेहरा असं वागत नव्हते.

माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात रोज मी एका नव्या व्यक्तिशी संवाद साधत होतो.त्याचं नाव विचारत होतो, तो शहरात कुठल्या गावाहून आला म्हणून विचारत होतो शिवाय त्याच्याबद्दल कमीतकमी दोन निरुद्देश वास्तव विचारत होतो.ही सर्व माहिती मी माझ्या मनाच्या कप्प्यात आठवण म्हणून ठेवीत होतो.पुन्हा कधी जर का त्याची भेट झाली तर मैत्रीपूर्ण ओळख राखून ठेवण्याचा तो प्रयत्न होता.

कॉलेजमधले माझ्या बरोबरीचे मित्र हा माझा प्रयत्न,ही माझी धारणा, म्हणजे एक विनोद आहे असं समजत होते.पण मला तसं वाटत नव्हतं.ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”
हे त्यांच्या मनात आणण्यासाठीचा तो मार्ग होता.

कुणी म्हणू शकलं असतं की माझा हा प्रयत्न अगदीच असंगत होता,त्यातून काहीही मिळत नव्हतं, परंतु, मला मात्र त्यापलीकडे जाऊन वाटत होतं.माझ्याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून,नुसता संवाद साधण्यात, मी पुढाकार घेत आहे असं दिसलं जात होतं.हे आणखी वाढवून घेऊन आणि त्याच व्यक्तिची पुन्हा ओळख ठेवून मी आदर दाखवीत आहे असं दिसत होतं.दुसर्‍याला आदर दाखवून मी त्या व्यक्तिबरोबर सहिष्णुता दाखवतो असं दिसत होतं.”

अनीलचं हे सर्व ऐकून मला त्याचं खूपच कौतूक करावसं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा?”
हा एक साधा प्रश्न मी तुला विचारला खरा.पण त्या ओळखी होण्यामागे तुझी भन्नाड कल्पना आणि त्यानंतर तू घेत गेलेली भन्नाड मेहनत ह्याचंच हे फळ आहे हे तू मला सवित्सर समाजावून सांगीतलंस म्हणूनच कळलं.

मला ह्यातून एक लक्षात आलं की,तुझ्या ह्या प्रयत्नामुळे,
पुढाकार दाखवून,आदर प्रदर्शित करून,सहिष्णुता बाळगून हे विश्व शांतीने रहाण्याजोगं आहे असं दाखवता येतं.आपण जरका रोज एका नव्या माणसाला भेटलो आणि त्याची ओळख ठेवून राहिलो तर आपण आपल्यातच वेगळेपणा करीत नसून ह्या जगातही तसा एक चेहरा एकावेळी पहाण्याचा वेगळेपणा होत नाही हेही सिद्ध होतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 11, 2011

शिसपेन्सिल.


  • “मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?”

    विनय नावाप्रमाणेच विनयशील आहे. त्याला जे वाटतं ते तो अगदी विनयशीलता ठेऊन सांगत असतो. सध्याच्या धामधूमीच्या जगात जितकं साधं रहावं तितकं रहाण्याच्या तो प्रयत्नात असतो.आणि तसं असण्यात त्याला अभिमान वाटत असतो.सध्या्च्या संपर्क साधण्याच्या आणि मनोरंजन करण्याच्या मोबाईल उपकरणापासून तो दोन हात दूरच असतो.ही उपकरणं वापरून मिळणार्‍या सुविधा त्याच्या मनावर प्रभाव पाडू शकत नाहीत.
    त्यासाठी तो त्याला वाटणारं त्याचं प्रांजाळ मत द्यायला कचरत नाही.

    “सगळं जग पुढे चाललं आहे.नवीन नवीन उपकरणं वापरून लोक आपलं जीवन सुखकर करीत आहेत.तू आयफोन वापरत नाहीस.घरातल्याच लॅन्ड फोनवर भागवतोस.रेडिओवरची गाणी लावून ऐकतोस. आयपॉडवर हजारो गाणी रेकॉर्ड करून लोक मनाला वाटेल ते गाणं,वाटेल तेव्हड्यावेळा ऐकत असतात.तू मात्र त्यातला नाहीस ह्याचं मला कुतूहल वाटतं.हे गौडबंगाल काय आहे.?”
    मी विनयला एकदा गप्पा मारताना विचारलं.

    “मी त्यातला नाही.”
    हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.आणि गौडबंगाल काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणून,थोडासा घसा खाकरून विनय मला म्हणाला,
    “एखाद्या साध्या शिसपेन्सीलबद्दल मला विशेष वाटतं. अशा साध्या पेन्सीलचं रुपांतर एखाद्या यांत्रिक गोष्टीत करण्याची जरूरी किंवा एखाद्या विकसित तंत्रविज्ञानविषयक गोष्टीत विकसित करण्याची जरूरी असायला हवी असं मला वाटत नाही.

    मला नेहमीच वाटत असतं की,जीवनात साधं राहून अर्थपूर्ण नाती ठेवायला मला सोपं जायला हवं.कारण माणसा-माणसातला संबंध,आत्मिक संबंध आणि प्राकृतिक संबंध बाळगण्यात मी आसावलेला असतो.

    ह्या जगात जीवनातल्या सहजतेच्या हरएक पैलुमधे तंत्रविज्ञानविषयाने एव्हडी व्याप्ति करून ठेवली आहे की, कुणालाही दुर्लभ अभयस्थान गाठायला जास्त प्रयत्नशील रहावं लागत नाही.
    मी पाहिलंय साध्यासुध्या रहाणीमुळे इतरांशी अर्थपूर्ण संबंध ठेवायला मला सोपं होत असतं.
    माणसा-माणसातला अर्थपूर्ण संबंध साधण्यात, तंत्रविज्ञानविषयाने अस्तव्यस्त झालेलं जीवन, अडथळा आणत असतं.आयफोन,आयपॉड सारख्या इलेक्ट्रॉनीक उपकरणापासून मोकळं राहिल्याने,रस्त्यावरून चालताना समोरून येणार्‍यांना मैत्रिपूर्ण हास्य देऊन किंवा मान हलवून सहमति देऊन जायला सोपं होतं.इतरांकडून मिळणारी ही स्वीकृति प्रसन्न रहाण्यास,आनंदात रहाण्यास महत्वाची ठरते.

    तंत्रविज्ञानाचं महत्व मी काही संपूर्णपणे नाकारत नाही.परंतु,आयपॉड,आयफोन स्वीकारून मी माझ्या इतर मित्र-मंडळीची जागा ह्या उपकरणाना द्यायला कबूल नाही.

    साधेसुधेपणामुळे,माझी शारीरीक क्षमता विकसीत करायला मला मदत होते.शारीरीक कष्टांवर आणि आपत्यांवर काबु आणण्याच्या प्रयत्नात, माझ्यातली कमजोरी आणि नश्वरता याबाबत मी जागरूक रहातो. एव्हडंच नाहीतर असं केल्यामुळे मला दिसून येतं की माझ्या मनात असलेल्या मर्यादा मी दाबून ठेवू शकतो.

    आपण व्यायामशाळेचं उदाहरण घेऊन पाहूया.
    तसं पाहिलं तर,सुनियोजीत व्यायाम शाळा उत्कृष्ट समजल्या पाहिजेत.पण मी पाहिलंय,व्यायाम शाळेतल्या उपकरणा ऐवजी,आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवणार्‍या मद्तनीसा ऐवजी,मी माझ्या मनाला आणि शरीराला उच्च पातळीच्या परिश्रमासाठी तयार करू शकतो.आणि हे करण्यासाठी अगदी कुठेही आणि कमीतकमी उपकरणाच्या मदतीने मला ते करता येतं.

    मुद्दा असा आहे की,कसरत करण्यासाठी कुठे आणि कसलं उपकरण घेऊन ती केली गेली पाहिजे हा नाही, तर श्रम घेतल्यामुळे आणि त्यात सफलता मिळत असल्यामुळे, कसरत व्हावी म्हणून यापूर्वी कधीही न घेतलेले काहीसे तीव्र आणि कठीण परिश्रम घेऊन मी एक नवीन मर्यादा प्रस्थापित करू शकतो आणि माझ्यात असलेल्या कमजोरीबद्दल आणि क्षमतेबद्दल मला उच्चतम जागरूकता मी आणू शकतो.

    माझ्यात ही जाणीव असल्याने मला माझ्या विधात्याबरोबर मजबूत दूवा निर्माण करता येतो.जीवनातला साधेसुधेपणा मला हा दूवा साधण्यात जास्त वेळ देऊ शकतो.
    माणसा-माणसातलं नातं साधल्यामुळे आणि माझी प्राकृतिक नश्वरता आणि त्याचवेळी निसर्गाने माझ्यात तयार केलेली क्षमता उघड झाल्याने माझ्यात आत्मिकदृष्ट्या मजबूती आणायला मी समर्थ ठरतो.

    मला राहून राहून वाटतं की आपण रहात असलेल्या ह्या गतिमान,तंत्रविज्ञानविषयक जगात साधेसुधेपणाची रहाणी उत्तम आहे.मला जरूरी भासते तेव्हा हा तंत्रविज्ञानविषय मी ते एक उपकरण म्हणून वापरतो.पण कोणतेही नवीन तंत्रज्ञान,जेव्हा मी अर्थपूर्ण दूवा साधून माझं जीवन परिपूर्ण आणि सुखी करीत असेन तेव्हा,आड येत असेल तर निश्चीतच तसं येऊ देत नाही.

    मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?

    विनयचं हे तत्वज्ञान ऐकून मी मनात म्हणालो,
    “पसंत अपनी अपनी,खयाल अपना अपना.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com


  • जीवनभराची शिकवणूक.

    Posted: Wed, 09 Nov 2011 02:38:23 +0000

    “प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”

    आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्‍या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
    मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.

    आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
    “आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”

    ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
    “मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
    एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”

    माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
    “आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
    मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.

    तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.

    खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
    योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.

    योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.

    मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
    त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.

    प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”

    भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
    “कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
    “हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”

    माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
    “धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 8, 2011

जीवनभराची शिकवणूक.


“प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”

आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्‍या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.

आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
“आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”

ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
“मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”

माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.

तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.

खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.

योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.

मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”

भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”

माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
“धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 5, 2011

साध्या प्रश्नातली ताकद.


“लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का,त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?”

मी मधुकरच्या घरी गेलो होतो.माझं त्याच्याकडे थोडं काम होतं.त्या कामाविषयीच गप्पा चालल्या होत्या. इतक्यात बाहेर रस्त्यावर आरडाओरड चाललेली ऐकू आली.मधुकरचा मुलगा धावत वरती आला आणि आपल्या बाबांना कसली गडबड झाली ते सांगत होता.दोघां माणसात बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली होती आणि प्रकरण हातघाईवर आलं होतं.

मुलाचं सर्व ऐकून घेतल्यावर मधुकर मिष्कील हसला.
मी त्याला विचारलं,
“तुझं हसण्याचं कारण काय?काहीतरी तुला सांगायचं आहे असं दिसतं.”
मला मधुकर म्हणाला,
“माझं हसण्याचं कारण म्हणजे,
“बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली”हे जे माझा मुलगा म्हणाला त्यावरून माझ्याच लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो.तो तुम्हाला सांगावा असं मनात येऊन मी तो माझा प्रसंग कसा सांभाळला ते आठवून हसू आलं.”

“असं काय ते ऐकूया तर खरं”
मी मधुकरला बोललो.

“मला आठवतं त्यावेळी मी सोळाएक वर्षाचा असेन.”
मधुकर मला सांगायला लागला.

“माझे आईबाबा आणि मी गाव सोडून शहरात रहायला गेलो.माझ्या वडीलाना एका चांगल्या नोकरीची संधी आली होती.पण मला हा बदल तितकासा आवडला नाही.गेली कित्येक वर्षं मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेचा आणि मित्र-मैत्रीणींचा मला सराव झाला होता.त्यांना सोडून आता मला नव्या वातावरणात आणि नव्या शाळेत एक अपरिचित म्हणून थोडाकाळ का होईना रहावं लागणार होतं.
त्याबद्दल मी नाराज होतो.

मला त्या नव्या शाळेतला पहिला दिवस आठवतो.मी अगदी एकांडा पडलो होतो.लंच घेण्याची घंटा वाजली आणि मी शाळेच्या कॅन्टीनमधे जायला निघालो.बहुदा मी एकदम पहिलाच मुलगा कॅन्टीनमधे प्रवेश करीत होतो.त्या कॅन्टीनच्या मोठ्या हॉलमधे मी एका कोपर्‍यात असलेल्या टेबलावर जाऊन बसलो आणि मी माझ्या आईने दिलेला डबा उघडून जेवायला सुरवात केली होती.

जसजशी आणखी मुलं हॉलमधे यायला लागली ते पाहून माझ्या लक्षात आलं की एक कंपू माझ्या जवळ आणि जवळच्या टेबलावर येऊन बसला.आणि हॉलच्या दुसर्‍या कोपर्‍यात दुसरा असाच कंपू जमा होऊन बसला होता.हे पाहून मला जरा विचित्र वाटायला लागलं.जणू ह्या दोन कंपू मधे एक सीमा आखलेली होती आणि तो हॉल दोघांत विभागला गेला होता.हे आपणहून केलं गेलेलं विभाजन मला जरा नवीनच होतं.पण मी जिथे होतो तिथेच बसलो.

माझ्या जवळच्या कंपूने,मी तिथे बसलो असताना, माझ्याकडे काहीसं विचित्रपणे पाहिल्यासारखं केलं.पण मी माझ्या डब्यातलं निवांतपणे खात बसलो होतो.लंचची वेळ होत असताना मधेच एक उंच,धिप्पाड मुलगा, उठून उभं राहून माझ्याजवळ येऊन टेबलावर हात पसरून माझ्याकडे बघत बसला.आणि मला म्हणाला,
“तू कदाचीत चुकीच्या कंपूत तर नाही ना बसलास?”
असा प्रश्न करून माझ्याकडे पहात राहिला.

लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का, त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?ह्या कंपूतले इतर अगदी शांत झाले.माझ्या प्रतिसादाची वाट पहात असावेत.
तो धिप्पाड टारगट आखाड्यात उतरूं पहात होता पण मी त्याचं आव्हान न घेण्याचं ठरवलं.

मी त्याच्याकडे नजर देऊन,मी अगदी भोळा आहे असं दाखवून त्याला विचारलं,
“चुकीच्या कंपूत म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?”
माझं हे ऐकून तो आश्चर्याने आवाक झालेला दिसला.माझ्याकडे दोन सेकंद नजर लावून पाहू लागला. आपल्याच मानेला झटका देऊन तो बाजूला झाला.

माझ्या साध्या प्रश्नाने तो निशःस्त्र झाला.माझ्या विश्वासाची मी तडजोड केली नाही.किंवा त्याच्या कंपूगीरीला मी मान्यता दिली नाही.मी हळू हळू शांत झालो.आणि काही प्रकरण न करता मी माझ्या डब्यातलं उरलं होतं ते खाल्लं.

ह्या घटनेने मे एक शिकलो की,एखादा साधासा प्रश्न म्हणजे,
“तुला काय म्हणायचं आहे?”
असा प्रश्न जबरदस्त ताकदवान असतो.त्या प्रश्नातून संदेश दिला जातो की,समजून घ्यायची माझी इच्छा आहे आणि ऐकून घेण्याची माझी तयारीपण आहे.

माझ्या त्या साध्या प्रश्नाने, सहिष्णुतेने असहिष्णुतेशी, टक्कर दिली. असं मला वाटलं.एरव्ही,
“मी जिथे बसलो आहे तिथे बसण्याचा माझा हक्क आहे आणि तुझ्या वाटेने तू जा”
असं मी त्या दांडगटाला सांगून वाद घालू शकलो असतो.परंतु,तसं केलं असतं तर,रक्षात्मक पवित्रा घेऊन, मी जास्त आरडाओरडीला जन्म दिला असता आणि ते प्रकरण जरका तिथेच संपलं असतं तर मी नक्कीच भाग्यवान झालो असतो असं म्हणायला हवं.त्याऐवजी एकाअर्थी मी त्याला माझ्याशी बातचीत करायला आमंत्रण दिलं होतं.

त्यावेळी माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्या त्या प्रश्नामुळे त्या धट्टींगणाला, कंपूगीरीशीच त्याने दोनहात करावे, असं आव्हानच दिलं होतं.पण हे कितपत खरं होतं मला माहित नाही.एक मात्र मला कळलं जेव्हा मी,पुढचं अख्खं वर्ष, त्याला कॅन्टीनमधे पहायचो,तेव्हा तो माझ्याजवळ नजर करून पहायचा आणि चालू पडायचा.जरी तो माझ्याशी केव्हाही हसला नाही तरी त्याच्या स्वीकृतीवरून मी एक समजून गेलो की त्याचं ते तसं करणं हा एक माझ्याशी दुवा सांधण्याचा संदेश असावा.”
मला हे मधुकरने सांगीतल्यावर,माझ्या मनात विचार आला की मधुकर त्या लहान वयात विचाराने किती पोक्त होता.

मी त्याला म्हणालो,
तुझं खरंच कौतूक केलं पाहिजे.हातघाईवर जाण्याऐवजी तू त्यावेळी बातचीत करण्याचा मार्ग पत्करलास.
साध्या प्रश्नात काय ताकद असते हा तुझा विश्वास तुला त्या प्रसंगातून सहजच वाचवू शकला.मला वाटतं, साध्या प्रश्नाने, नम्रतेचा आणि आलोचनात्मक ऐकून घेण्याच्या तयारीचा,त्या साध्या प्रश्नातून संदेश दिला जातो. असहिष्णुतेशी दोन हात करण्यासाठी हे अस्त्र किती ताकदवान आहे हे दिसून येतं.”

“मी तुमच्याकडून ह्याच विचाराची अपेक्षा करीत होतो.म्हणूनच मी तुम्हाला तो माझा किस्सा सांगीतला.”
असं म्हणून मधुकरने माझ्या कामाविषयी चर्चा करायला पुन्हा सुरवात केली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 2, 2011

कोकणातला उन्हाळा.




“त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.”

कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर पसरवतो किंवा पारिजातकाच्या फुलांचा सडा झाडाच्याच खाली घालतो, तेव्हा अनुभवलेला एखादा बहारदार दिवस आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं.

निरभ्र आकाशातला एखादा पांढरा ढग सूर्याला अडवीत असताना काही सोनेरी किरणं जेव्हा आकाशातून खाली येतात तेव्हाचं वातावरण आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं.

पावसाळा फारसा दूर नसल्याने,कधी कधी वळवाच्या पावसाचं वातावरण निर्माण करून काळोख्या रात्री, अतिशय कोरड्या हवेमुळे दोन ढगात वीजेची चकमक होत असते. अशावेळी एखाद दूसर्‍या काळ्या ढगातून, बाहेर परसात खुर्च्या टाकून बसलेलं असताना, दोन चार पावसाचे थेंब अंगावर झिडपले जातात त्या वातावरणाची मला फार मजा यायची.

उन्हाळ्याच्या दिवसात शाळेला सुट्टी असायची.झोप काढायला भरपूर वेळ मिळायचा.शिवाय सुट्टीत मजा करण्यासाठी बरेचसे बेत आखलेले असायचे.

आदल्या दिवशी बाजारातून आणलेले रंगीबेरंगी पण काजूच्या बीसकट आणलेले बोंडू कापून त्याची तिखट करमट खाऊन झाल्यावर रात्रीच्या काळोखात, परसातल्या तीन दगडावर पाण्याचा हंडा ठेवून सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी बनवलेल्या चुलीतल्या उरलेल्या लाकडाच्या कोळशात, ह्या काजूच्या बिया भाजून,नंतर त्या फोडून आतला काजूगर काढून भावंडाबरोबर खायला मजा यायची.

उन्हाळातल्या दिवसात एखाद दिवशी खूपच उष्मा व्हायचा.
अशावेळी आम्ही सर्व भावंडं,गावातल्या सखल भागात वहाणार्‍या ओहळात पोहायला जायचो.मोत्याला न्यायला विसरायचो नाही.कारण ओहळा जवळच्या वडाच्या झाडाखाली काढून ठेवलेल्या आमच्या कपड्यांचं राखण तो करायचा.ओहळात बरोबर वडाच्या झाडाच्या खालच्या भागात ओहळ जरा खोल होता.दोन पुरूष खोल खड्डा असावा.विहीरी सारख्या खोल असलेल्या त्या ओहळाच्या जागे पासून आम्ही दूर पोहायचो.
त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.घोडग्यांचा दत्तू त्या खड्ड्यात पोहायला गेला आणि त्याला सुनेच्या भुताने आत खेचल्याने तो त्यात बडून मेला.त्याचं प्रेत दुसर्‍या दिवशी मिळालं.
कोकणात भुता-खेताच्या गोष्टींना मिणमिणत्या दिव्यात,असल्या गोष्टी आजींकडून ऐकताना, उत येतो असं आम्हाला आमची आई सांगायची.

सकाळीच आम्ही सर्व भावंडं बाजारात जायचो.लाल,हिरवे आणि सफेद रंगाचे रसाने पुष्ट असलेले नुकतेच शेतातून पानासकट काढून आणलेले उस विकत मिळायचे.ते घरी आणून गाठी,गाठी जवळ कोयत्याने कापून उभे चिरून त्याची चिवट साल काढून टाकून लहान लहान करवे करून चावून चावून खायचो.माझी मोठी भावंडं स्वतःच्या दातानेच उसाची साल काढून दातानेच करवे तोडून खायचे.आम्हाला असं तुम्ही करू नका म्हणून सांगायचे.कारण म्हणे आमचे दात अजून दुधाचे दात आहेत.

एकदा मी त्यांचं म्हणणं न जुमानता माझ्या दाताने उसाची साल काढण्याचा प्रयत्न केला.मला आठवतं मी माझा खालचा दात केव्हा गमावून बसलो ते कळलंच नाही.कारण दात पडल्यावर म्हणावं तसं रक्त काही आलं नाही.कदाचीत उसाच्या करव्याला चावताना आणि रस गिळताना रसाबरोबरच तो दात पोटात गेला असावा. सकाळी उठल्यावर दंतमंजन मशेरी दाताला चोळताना गायब झालेला दात मझ्या लक्षात आला असावा.

कधी कधी आम्ही संध्याकाळी कॅम्पात फिरायला जायचो.बाबल्याच्या हाटेलातलं दूध-कोल्ड्रींग प्यायला आमची चूरस लागायची.थंड दुधात आईसक्रीम टाकून त्यावर साखरेचं सुवासीक रंगीबेरंगी पाणी शिंपडून केलेलं हे दुध-कोल्ड्रींग प्यायला मस्त लागायचं.मुंबईत अशाच ड्रींकमधे सब्जाच्या बिया टाकून विकत असलेल्या ड्रींकला फलुदा म्हणतात हे आम्हाला नंतर कळलं.कोकणातल्या उन्हाळ्याच्या दिवसात असलं ड्रींक प्यायला मिळत असल्याने उन्हाळा हवा हवासा वाटायचा.इतक्या लांब कॅम्पात जायला न मिळाल्यास, बाजारातून आईसफ्रूट, बर्फाचा गोळा म्हणजेच पॉपसीकल आणून आम्ही सर्व भावंडं ते चोखून-चाटून खाण्यात आनंद मानायचो.

मला आठवतं,अशावेळी मी किती चोखंदळ असायचो.मला समजत नसायचं की,काही गोष्टी दिसतात त्यापेक्षा जास्त महत्वाच्या असतात.आमच्या आजोबांनी मला शिकवलं होतं की,लहानसहान गोष्टीतच मन रमवून जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा.उन्हाळ्यात गावात आनंद-मेळा भरायचा. आमचे आजोबा आम्हाला पाळी पाळीने जवळ घेऊन फिरत्या उंच चक्रात चक्कर मारून आणायचे.

अशावेळी उन्हाळा आम्हाला सर्वात जास्त आवडायचा.तसं पाहिलंत तर प्रत्येक ऋतू आपआपल्यापरीने आवडण्यासारखाच असतो.पण उन्हाळ्यातली मजा निराळीच.पावसाळ्यात खेळायला मिळायचं नाही. उन्हाळ्यात पोहायला मिळायचं.जीवनातला प्रत्येक उन्हाळा आठवणीने इतका समृद्ध होत असतो की पाठीमागे कसलाच खेद उरलेला नसतो.

एखाद्या दिवशी मागे वळून सर्व आठवणी ताज्या करून पहाताना,आपल्याच जवळच्या माणसासमोर लज्जा येण्यासारखा एखादा वेडपटपणा केल्याची घटना किंवा एखाद्या भावंडाबरोबर मस्करी करीत असताना त्याची परिणीती कुस्करी होण्यात व्हावी अशी घटना किंवा आजोबांबरोबर सर्वानी बंदरावर जाऊन त्या गरम गरम वाळूत उभं राहून स्वच्छ निळ्या निरभ्र आकाशाकडे पाहून गडद निळ्या समुद्रात सूर्याचं लालबूंद बिंब बुडताना पहातानाची ती घटना,लक्षात आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं.

वाईट असो किंवा चांगली असो प्रत्येक स्मृती गोड तशीच अनमोल असावी.प्रत्येक स्मृती खास आणि विशीष्ट असावी.
कोकणातला प्रत्येक उन्हाळा,आठवणी देऊन गेला.त्या आठवणी उगाळून उगाळून तसंच काहीसं वाटतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com