Monday, March 31, 2008

सांग कसा मी मलाच सावरूं

नको नजर लावू अशी
होईल मला तुझी नशा
नकळत करीन मी माझी
अवचित दुर्दशा
सांग कसा मी मलाच सावरूं

नको रोखूस तू मला
सांग कसा मी मलाच रोखू
म्हणशी नीष्ठूर तू मला
सांग कसा मी मलाच सावरूं

काजळ तुझ्या नयनातले
असुंदे जसेच्या तसे
होवूनी तू अशीच धुंद
राहुदे केस तुझे सैलसे

असेच येवून धुंदी मधे
बहकलो मी तुला पाहूनी
पाप घेतले होवूनी बेचैन
नको ऐकवू बोल तुझे
नाजुक तुझ्या ओठातून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 30, 2008

समजू नां ही प्रेमाचीच सरशी

पाहूनी मला तू अशीच हंसशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी

म्हण हवे तर मला परदेशी बावळा
अथवा म्हणशी मला अपरशी खूळा
मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी

मग्न होवूनी हरवून बसशी
चालती फिरती जणू प्रतिमा जशी
भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी

श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, March 28, 2008

पालीचं शेपूट

“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.”

“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत शामली मला आपला अनुभव सांगू लागली.

“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.आजी, आजोबा, मामा, मामी ही नाती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे संस्कार घेवून वाढणं हे अगदीच अंगवळणी झालं होतं. आजीच्या बटव्यातली औषधं,आणि त्याचा घरगुती वापर हा सहजगत्या चालणारा प्रकार होता.खोबऱ्याचं तेल घालून रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते,कारण मेंदु थंड करण्याची त्या तेलात क्षमता असते,आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्यास पचन शक्ति शाबूत रहाते,कारण त्या तेलामुळे सर्व रक्तातलं पाणी आंतड्यात आल्यानं आतडं धुवून साफ होतं असं सांगणारी, हीच मंडळी आमची रात्रीची स्वप्न दुसऱ्या दिवशी ऐकून त्याचे संभाव्य परिणाम किंवा दुष्परिणाम काय ह्याचा पडताळा घ्यायची. घरातलं जवळचं माणूस गेलं त्याचं आश्चर्य, रात्री पडलेल्या स्वप्नात कबुतरं आल्याने कमी वाटायचं.

अलिकडे मी परत अंतरज्ञानावर विश्वास करायला सुरवात केली आहे.दहा वर्षापुर्वी मी एमबीये मधे शिकून माझ्या व्यवहारी ज्ञानात अभ्यासू भर घातली होती.व्यवहारी विचारसरणी ठेवून कसं वागायचं ते आचारणात आणलं होतं.जशी माझी कारकीर्द वाढत जात होती, तशी मी व्यवहारपटू जास्त बनत चालली होती. बजेटस,मापमान,संशोधन,आकडेमोड वगैरेमुळे माझं बोलणं, चालणं आकडेवारीत रुपांतरीत झालं होतं.
मी त्या कंपनीची सीईओ होईपर्यंत ही विचारसरणी सर्व मला सहाय्य देत होती.पण जेंव्हा मी “कोकण वस्तुसंग्रह नवनिर्माण संस्थेची कार्यकारी अध्यक्षा झाले,तेव्हा माझ्या नजरेतून एक गोष्ट सुटेना ती ही की ज्या प्रॉडक्टवर पालीचा सिंबॉल होता त्या प्रॉडक्टची जास्त उचल होत होती.स्थानीक बुजुर्गांचं मत असं होतं की त्यांच अतरज्ञान सांगतं की पाल ही एक शुभलाभी गोष्ट आहे.
कारण पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते,तसंच पालीचा शुभ सिंबॉल असलेल्या वस्तूची जास्त उचल होते.हे ऐकून मला कोकणातल्या माझ्या आजी, आजोबा,मामा,मामीची आठवण झाली. त्यांच अंतरज्ञान,त्यांची स्वप्न काय सांगत त्यावर जसा माझा त्यावेळी विश्वास असायचा त्यातलाच हा प्रकार होता.
आता ह्या लोकाना पण असंच वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून ते आपला असा निर्णय घेत, त्यावर ते समाधान असत. त्यामुळे मला पण त्यांच्याबरोबर, आपल्या अंतरज्ञानावर पुर्वी सारखा विश्वास ठेवायला सोप झालं.
पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.तसंच मला आता माझं एमबीयेचं कलचर पालीच्या शेपटी सारखं सोडून देवून माझं आयुष्य जगावं असं वाटूं लागलं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, March 26, 2008

गं! राहू मी कसा भानावरी

पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी

नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी

हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 24, 2008

“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया”

“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”

“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”

मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.

चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर नचुकता विचारायचे,

“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती.आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं.परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता.आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे

ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं “सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.

ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि

एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.

“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 22, 2008

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं
"तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?"
त्यावर तो म्हणाला,
"त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे."
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
"अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?"
हंसत,हंसत मला म्हणाला,
"आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत.
माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मी जणू हातात हात घालून शिकत होतो.
एकदा मी आणि माझा डॉक्टर मित्र शास्त्रावर बोलण्याऐवजी श्रद्धेवर चर्चा करीत होतो.आम्ही दोघे भिन्न भिन्न रितीरिवाजात वाढल्याने त्याने मला विचारलं,
"तुला थोडक्यात एका वाक्यात सर्वांत महत्वाची तुझ्या धर्माची अगदी आंतरीक कल्पना सांगायची झाली तर तू ती कशी सांगशील? "
त्यावर क्षणभर मुग्ध झालो आणि जणू नकळत येणाऱ्या श्वासाप्रमाणे मी म्हणालो,
"प्रत्येक व्यक्ति अमुल्य असते ही आमची धारणा आहे."
माझं वैदकीय शिक्षण पुरं होता होता माझी रेसिडेन्सी चालू झाली.आणि माझे आध्यात्मीक आयुष्याचे विचार हळू हळू दूर जायला लागले.लहान मुलांचे दुखण्यांचे हाल पाहून त्या दयाशील दयाघनाच्या अस्थित्वाशी माझं मन एक रुपता करू शकत नव्हतं.
एकदा,मी माझ्या राऊंडवर असताना एक जोडपं अत्यंत सद्गदीत होवून आपल्या छोट्याश्या बालकाच्या बेडजवळ त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करताना पाहून,मी तितकाच सद्गदीत झालो आणि आठवतं मला त्यांच्याकडे पाहून मनात म्हणालो,
"काही उपयोग आहे का याचा?"
त्यावेळी मी माझ्या आध्यात्माच्या श्रद्धेशी आणि त्यापासून दूर जाण्याऱ्या विचाराशी दुवा लावायला धडपड करीत होतो. ज्याक्षणी मी माझ्या विशेष वैद्यकीय ज्ञानाची कसोटी लावत होतो,त्याचक्षणी माझ्या मनातल्या त्या श्रद्धेच्या फाटक्या झालेल्या लक्ताराच्या कडाकडांना शिवण्याचा प्रयत्न करीत होतो.
एकदिवशी माझ्याच प्रांतातल्या एका तज्ञाने मला एका कोवळ्या बालकाला बाहेरून आर्टीफिशीयल श्वास देवून ते स्वतः श्वास घेवू शकत नसल्याने कसं श्वास घ्यायला लावायचं ते शिकवलं.
त्यादिवशीच माझ्या आयुष्याला एक कलाटणी आली.दुसऱ्यांचे आयुष्य थोपवणारे ते श्वास न थोपवण्याची मी जबाबदारी घेतली होती.माझ्या मनातलं ते आध्यात्म जागृत झालं.आता जेव्हां,जेव्हां आजाऱ्याच्या श्वासाची उमळ, कान लावून ऐकत असताना, त्यांच्या फुफुसात प्राणवायू दाबूनदपटून घालताना,किंवा त्यांचं ब्लडप्रेशर कमी होत चाललेलं पाहून त्यावर चटकन उपाय करताना, अलगद त्यांचा हात हातात घेवून त्यांची आंसवं पुसताना,अक्षरशः त्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा भास मी माझ्या मनात निर्माण करीत होतो.

मी त्याला विचारलं,
"असं करून तुला काय होत असेल नाही?"
तो म्हणाला,
"कदाचीत काही लोकांना,ही क्षमता एक प्रकारची अंगात आलेली ताकद वाटत असावी.पण मला ती जबरदस्त अबलता वाटत होती.माझ्या लक्षात यायचं की मी अशा पवित्र जागेवर उभा राहून त्या आजाऱ्यांना सन्मान देण्यात कमी पडून त्यांच्या आयुष्याला धोका तर देत नाही ना?
प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे ही माझी धारणा माझ्या अंतःकरणापासून आहे.प्रत्येक वेळी मी माझ्या आजाऱ्यावर कडी नजर ठेवून असतो आणि ते ज्यावेळी जास्तीत जास्त हतबल असतात त्यावेळी त्यांच संरक्षण करतो.त्यामुळे माझी श्रद्धा जीवंत होते,अगदी त्यांच्या प्रत्येक श्वासाकणीक."
हे त्याचं सगळं ऐकून मी त्याला नकळत म्हणालो,
"खरंच, तू पण ग्रेट आहेस आणि तुझा व्यवसाय पण ग्रेट आहे."

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 20, 2008

प्रो.देसाई म्हणतात……..

“लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?”
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.

मला म्हणाले,
” जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.

मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते. आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.

दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच “होयगावडा” होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शात असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

Tuesday, March 18, 2008

इट मेक्स सम सेन्स…….आठवण.

शिला मला म्हणाली,
“मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.”
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
“शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे.”
शिला म्हणाली,
“चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवऱ्याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती.
”बाळं ” म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो. तिला आता माजघर आणि स्वयंपाकघर कुठे आहे ते आठवत नव्हतं.सकाळी जेवली कि नाही, ते संध्याकाळी आठवत नव्हतं.घरातली कोण कोण वारले, माझे वडील धरून, तिला आठवत नव्हतं .
मी पण मनात घाबरायला लागले की कदाचीत एकदिवस माझ्या नवऱ्याला मी आठवूच शकणार नाही, अल्झायमरमुळे नव्हे तर माझी आठवण पुस्स्ट होईल म्हणून.”
मी शिलाचं एव्हडं ऐकून तिला विचारलं,
“मग तू काय करायचं ठरवलंस?”
मला म्हणाली,
“शरदच्या त्या दिवसाच्या डायग्नोसीस नंतर एक वर्ष मी, तो गेल्यानंतर त्याची आठवण काढीत राहिले.त्याचं ते मिष्कील हंसणं, माझा हात हातात घेवून माझ्याशी मान खाली घालून बोलणं,त्याचं ते खाकरणं आणि त्याच्या इतर चांगल्या गुणांची, हळूवार बोलण्याची, गम्मती करण्याची मी माझ्या मनात उजळणी करायची. जमेल तेव्हडं मी त्याचा चेहरा जणू दैवीक शक्ति आणून माझ्या मनात ठेवीत होते.आणि ते शेवटी तो सोडून जाई पर्यंत.”
मी मग शिलाला विचारलं,
“ह्यात तू यशस्वी झालीस का?”
त्यावर ती म्हणाली,
“त्यावेळी मला वाटायचं की जबरदस्तीने,लक्षात ठेवण्याची,परत परत उजळणी करण्याची,माहितीत राहण्याची, जणू एक प्रोसेस आहे.जसं आपण पाढे म्हणा,गाणे म्हणा,चावी ठेवण्याची जागा म्हणा, लक्षात ठेवतो तसं.शरदला कॅन्सर पासून वाचवू न शकल्याने, मनात घट्ट ठरवलं होतं की त्याच्या मरण्याच्या घटने पेक्षा त्याला विसरून जाण्याची घटनाच वाचवून ठेवू पाहिन.”
“हे तू कसं आचरणात आणू शकलीस?”
असं मी तिला विचारलं
त्यावर ती म्हणते कशी,
” अरे,नंतर माझ्या एक ध्यानात आलं,की आठवणीला सुद्धा एक प्रकारची स्वतःची ओढ असते.ती तू काबूत आणू शकत नाहीस. क्षणभर का होईना ती ओढ, गमवलेली प्रेमळ व्यक्ति मिळण्यासाठी एक प्रकारची उचल खाते. एकदा मी माजघरात देव्हाऱ्या जवळ शांत बसली असताना,माझ्या जवळ शरद बसल्याचा मला भास झाला.
आम्ही दोघं नेहमी जवळ बसलेलो असताना माझं शरिर जे एक प्रकारे मऊ पडायचं अगदी तसं,वाटलं.मला त्याचा चेहरा आठवत नव्हता,त्याची चालण्याची ढब आठवत नव्हती,त्याच्या ज्या सर्व खाणाखूणा मी लक्षात ठेवल्या होत्या त्याचा त्या क्षणाशी काहीही काडीचा संबंध आला नाही.देवाजवळच्या आरशात ज्यावेळी माझं लक्ष गेलं, त्यावेळी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यात माझ्या आईच्या चेहऱ्यातली नजर,मी तिला शेवटी हॉस्पीटलात पाहीली होती तशी दिसली.
मला आठवतं,मी तिला त्यावेळी माझ्या वडीलांविषयी प्रश्न केला होता,आणि तिची त्यांची आठवण पुस्सट झालेली दिसली होती,परंतु त्यावेळी सुद्धा ती मला तरतरीत आणि तेजी दिसली होती.तिचा मेंदू तिला सहाय्य करीत नव्हता , पण ते इतकं महत्वाचं नव्हतं,जितकं की मला त्यावेळी वाटलं होतं. माझे वडील अंधूक का होईना तिच्या मनात दिसले असतील. तो अल्झायमरचा मेंदू पण तिची आठवण पुस्स्ट करू शकला नव्हता.”
मी म्हणालो,
“शिला,म्हणजे मेंदू आणि आठवण ह्यात नक्कीच फरक आहे असं तुला नाही का वाटत.?”
ती लगेचच म्हणाली,
“अगदी बरोबर, बाहेर जाण्यापुर्वी घरातले सर्व दिवे काढले की नाही हे लक्षात ठेवण मेदुचं काम,पण आठवण ही भावनेत डुंबलेली असावी. आणि खोल विहीरीतून उचल घ्यावी तशी काळवेळाची पर्वा न करतां उचंबळून वर यावी.अशी माझी खात्री झाली आहे.”
हे शिलाचं सर्व ऐकून मला वाटलं तिच्या म्हणण्यात कांही तरी अर्थ असावा.
जसं आपण म्हणतो It makes some sense.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 17, 2008

तत्व माझे सोडणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दुःखाची नाही कसली खंत
परिणामाची नाही मुळीच भ्रांत
पुरूषगीरी सोडणार नाही
स्त्रीचा अवमान टाळणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
वय झाले तरी आढ्य रहाणार
आपले तेच खरे म्हणणार
लाकडे स्मशानात गेली तरी
वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 15, 2008

प्रति(मा)भा उरी धरूनी,तू काव्य करीत रहावे!

“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”

काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो,
“अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती.”
हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करूनमला म्हणाला,
“अलिकडेच मी लिहीलेली कविता तू वाचलीस का?”
मी म्हणालो,
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
मला शरद म्हणाला,
“तुला वेळ आहे का मी तुला माझी हकीकत सांगतो.चल आपण त्या सुक्या झालेल्या वाळूच्या ढिगावर बसुया.”
मी म्हणालो,
“खूप वेळ नाही ना लागणार? घरी माझी पत्नी वाट बघत असणार आम्ही दोघं तिच्या एका मैत्रीणीच्या घरी जेवायला जाणार आहो. इकडे तिकडे जरा उशीर झाला म्हणून हरकत नाही म्हणा.तुला हा प्रश्न मी कधी ना कधी विचारणारच होतो,मनात माझ्या कुतुहल होतं.होवून जावूदे. कळेल काय ते तुझ्या कडून एकदाचं”
शरद सांगू लागला,
” मला वाटतं,कवितेच्या माध्यमामधून मनातल्या भावनांचा झालेला विचका,दैविक विचाराचा गोंधळ,आणि जीवनात आलेल्या गंभीर दुर्घटना सहन करीत असताना येत असणारे अनुभव प्रदर्शीत करण्याचं कविता हे एक साधन आहे.नव्हेतर तेच माझ्या जीवनातलं एक साध्य झालं आहे.

मी ज्यावेळी बारा वर्षाचा होतो,त्यावेळी मी माझ्या सख्या लहान भावाच्या अपघाती म्रृत्युला कारण झालो होतो.
त्याचं असं झालं,आम्ही सर्व मित्रमंडळी एकदारेडीला जाताना वाटेत एक छोटेशी घाटी लागते.ती चढून जात असताना घाटीच्या माथ्यावर आल्यावर खाली रेडी नदी दिसते डोंगरच्याकडेवर जावून नदीचं पात्र अगदी विलोभीनीय दिसतं.ते पहाण्यासाठी आम्ही सर्व एकदम गर्दी केली आणि असं करताना माझा धक्का लागून तोल गेल्यामुळे माझा धाकटा भाऊ सरळ खाली घरंगळत गेला.खूप खरचटून मार लागला त्याला.आणि हॉस्पीटलमधे जाईपर्यंत त्याचा अंत झाला.
एका क्षणात माझं जग कायमचं बदलं. दुःख,जीवघेणी भिती,शरम आणि हताश होण्याची माझी जी मनःस्थिती झाली त्याची कल्पनासुद्धा मी कघी केली नव्हती.त्यानंतरच्या काळात छिन्नविछीन्न मनःस्थिती झालेल्या माझ्या कुटुंबातलं कुणीही माझ्या भावाच्या मरणाचा विषय माझ्याशी काढू शकलं नाही.ह्या स्मशानशांततेने मी माझ्या दुःखदायी भावना बरोबर घेवून एकाकी पडलो.आणखी भयानक गोष्ट म्हणजे,आयुष्य सहजगतीने जगण्याच्या माझ्या समजुतीला एकाएकी एक तडा आली,एकाएकी सर्व काही शब्दशः रसातळाला गेलं “

हे सर्व ऐकून त्या सकाळच्या प्रहरी मी पण खूप मायूस झालो.
मी त्याला म्हणालो,
“खरंच, मी तुला तुझ्या दुःख्खी कविता लिहीण्या विषयी विचारायला नको होतं.मी उगाचच तुला तुझ्या जुन्या आठवणी काढायला लावून दुःखी केलं”
हे ऐकून शरद मला म्हणाला,
“तसं तू तुझ्या मनाला मुळीच लावून घेवूं नकोस. तुझ्या सारखा अश्या आस्थेने विचारणारा मला कित्येक दिवसात कोण भेटला नाही.मला थोडा “स्टीम आउट”होवू दे.बरं वाटेल मला.
एकदांच तुझ्या प्रश्नाचं पुरं उत्तर मला देवू दे.वाटलं तर तू वहिनीनां मोबाईल वरून सांग की तुला थोडासा उशिर होईल म्हणून.”
मला त्याची खरंच किंव आली.माझ्या पत्नीला मी फोन केला त्यावेळी तिच मला म्हणाली की,
“तुम्ही लवकर नाही आलात तरी चालेल.माझ्या मैत्रीणीच्या नवऱ्याला काही अर्जंट काम आल्याने तिनेच मला फोन करून सांगितलं की परत कधी तरी आपण भेटूं”हे ऐकून मलापण जरा बरं वाटलं निदान शरदला आता सगळं काही सांगता येईल आणि माझा ही प्रश्न सुटेल.

मी त्याला म्हणालो,
” तू आता निवांत सांगू शकतोस.आम्ही बाहेर जाण्याचं रहीत केलं.”हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर हुरूप दिसला.
मला म्हणाला,
“अशा गंभीर दुर्घटनापासून एक स्थित्यंतर येतं की,ह्या दुर्घटनेला बळी पडणारे इतरापासून विलग होतात. इतर लोकांपासून दुरावल्यामुळे,त्यांच्या जीवनातल्या भावनांशी सुद्धा विलग व्हायला होतं,ते इतकी की अगदी आयुष्य सुन्न होतं,आणि जगण्याच्या क्रियेत जणू अर्ध जीवन जगल्यासारखं भासतं.त्यावेळी मी तरूण असल्याने ही जीवनातली विलगता,आणि सुन्नपणा ओलांडून कविता लिहायला प्रारंभ केला.”
मी म्हणालो,
“शरद,पण तुला कविता लिहीण्याची प्रतिभा कशी उत्पन्न झाली?”
शरद म्हणाला,
“मी जेंव्हा कविता लिहीतो तेंव्हा, मी माझ्या अनुभवाचा आढावा घेतो,मी माझ्या अंतर मनात डोकावून पहातो,कच्च्या संभ्रमाच्या मेंदुत राहीलेल्या आठवणी जागृत करतो.त्याचं मग शब्दांत रुपांतर करतो आणि शेवटी ते शब्द यमकात येतील असे मांडतो.ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते.
पुर्वी मला मी माझ्या मनातल्या गोंधळाने शक्तिहीन आणि अचपल वाटून घ्यायचो.पण आता मी चपळता आणली.आणि माझ्या अनुभवाला एक प्रकारचा स्फुर्ती आलेला आकार देवून त्याचं रुपांतर सहजगत्या कुणाला कळेल अशा अर्थामधे आणतो.”
मी त्याला म्हणालो,
“म्हणजे तुझ्या मनातलं दुःख तू कवितेच्या रुपात प्रदर्शीत करतोस.”
मला म्हणाला,
“अगदी बरोबर.कविता म्हणजे भावनेचा अन्वार्थ. अगदी दुःखी कविता लिहून मी जणू मला पण जगायचं आहे हे सिद्ध करतो. आणि म्हणून कविता जीवनातील गुंतागुंती आणि विरोधाभास याच्या सत्यतेचं प्रतिनीधीत्व करते. शिवाय माझ्या काव्याचा आणखी चमत्कार म्हणजे माझ्या कविता आणि माझे वाचक या दोघांमधे मी सहभागी होतो.त्यामुळे माणसा माणसातल्या विलगतेवर विजय होतो.”
हे शरदचं कवितेवरंच चिंतन ऐकून मला खूप गम्म्त वाटली.
मी म्हणालो,
” आणखी तुझे कवितेवरचे विचार काय आहेत ते सांगून टाक बाबा” मलाही आता घरी जायला उशीर होत होता.

शरद म्हणाला,
“एव्हडं सागून झाल्यावर आपण निघूया.उन पण खूप लागायला सुरवात झाली आहे. मी कुणाचीही कविता वाचली की मला उचंबळून येतं.मला माहित आहे की जगात मी एकटाच कविता लिहीत नाही.ज्या व्यक्तिची कविता मी वाचतो,ती व्यक्ति जणू माझ्याशी संबंध जोडते असं मला वाटतं.
मला असा भास होतो की ही व्यक्ति आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत आहोत.त्यांच्या कविता मला धीर देतात.त्यांची कविता एकप्रकारची मला दिलेली गिफ्ट वाटते,आणि मला हे जीवन जगावंसं वाटतं.”

हे शरद्चे उद्गार ऐकून मी बराच सदद्बीत झालो.उठता उठता त्याला म्हणालो,
“शरद हे तुझं सगळं ऐकून मला एका कवितेच्या दोन ओळी आठवतात.त्यात थोडा फरक करून म्हणावसं वाटतं,

“प्रति(मा)भा उरी धरूनी
तू काव्य करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार तू करावे”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, March 14, 2008

असावी अशी माझी प्रिया

कधी काळी विचार आला
माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी


नसे काही लिखीत
नसे कसली शपथ
नसे कसली नाराजी
नसती कसली वचने
चेहरा असे भोळा भाळा
निष्पाप अर्थ दिसे डोळा
असेच तुला कल्पुनी
विचार आला माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी


खुषीची ती सहकारी
दुःखाची ती वाटेकरी
मोठ्ठाली स्वप्ने नकरी
माझ्या हृदयी वास करी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 13, 2008

प्रो.देसायांना वाटतं……..

आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!।भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं.
मी म्हणालो,"भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार।"भाऊसाहेब म्हणाले,"खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर
येतात.म्ह्टलं काय आहे प्रकरण म्हणून जरा इंटरनेटवर गेलो आणि ह्या विषयावर काही पुस्तकं चाळली.त्यातून रेकमेंड केलेलं हे पुस्तक लायब्ररीतून आणून वाचत होतो.काय म्हणता बसा चहा घ्या."मी म्हणालो,"भाऊसाहेब मी जरा घाईत आहे.तुमची फक्त खबर घ्यायला आलो होतो.तुम्ही हे सगळं वाचून झाल्यावर मला तुमची बॉटम लाईन सांगा.उद्दया आपण तळ्यावर भेटू तेव्हा"असं म्हणून मी काढता पाय घेतला.दुसऱ्या दिवशी आम्ही तळ्यावर भेटल्यावर प्रो.देसायानी स्वतःहूनच विषय काढला.मला म्हणाले," सर्व प्राणीमात्रानवर आपणां माणसाचा आदर असला पाहिजे.मला वाटतं, माणासावर, ह्या पृथ्वीबद्दल आणि
पृथ्वीवरच्या जीवनाबद्दल एक नकळत जबाबदारी आली आहे.खरं सांगू तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर मला माझं लहानपण आठवलं.जमीन खणतां खणतां मला लहान जीवजंतू खालून येताना पाहून काय हा चमत्कार आहे असं वाटायचं.प्रत्येक जीव, सरपटणारा,वळवळणारा पाहून मला खूप अचंबा वाटायचा. अगणीत तास मी आमच्या पोरसात,काय काय चमत्कार ह्या जमीनीत असावा,याचा शोध करीत बसायचो.काही लोकाना कदाचित माझं हे चमत्कारीक वागणं पाहून तिटकारा येत असावा. हे प्राणी गिळगीळीत कीडे वाटत असतील.पण मला तर हे सगळे प्राणी, ह्या विश्वात निरनिराळ्या आकाराचे आणि प्रकाराचे दिसतात. आणि हे गिळगीळीत किडे जणू लहानात लहान राहून ह्या सर्व लहान मोठ्या प्राण्यांचे प्रतीनिधीत्व करतात असं वाटायचं।जीवन चक्राशी हे अगदी निगडीत वाटायचं. सर्व ऋतूमधे मला आवडणारा वसंत ऋतू."मी म्हणालो,"भाऊसाहेब,तुमच्या लहानपणाच्या आवडीच्या विषयाचीच आता उदोउदो होत आहे असं मला वाटतं जे तुम्ही अलिकडे वरचेवर सगळीकडॆ ऐकतां आहां."प्रो.देसाई मला म्हणाले,"अगदी बरोबर बोलला. वसंत ऋतूच्या अगदी सुरवातीला झाडावरच्या घरट्यांमधून बाहेर पडणारं ते पक्षांच पिल्लू आणि गडद निळ्या अंड्याचं ते घरट्यातून खाली पडणारं कवच, मी कितींदा पाहिलंय.निसर्गाच्या निर्मीतीचक्राची त्याच वेळेला मला जाणीव व्हायची.हा निसर्गाचा निर्मीतीचा दुवा पाहून मी ह्या गोष्टीबद्दल खूपच भारावून गेलो होतो आणि अजून पर्यंत ती जाणीव माझ्या मनात आहे.त्यामुळे ह्या वयात पण ग्रीनहाऊस ईफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबल वारमींग हे शब्द कानावर पडल्याने माझ्या मनातले ते लहानपणातले खोल भारावून गेलेले विचार मला हे पुस्तक वाचायाला जणू आव्हान देत आहेत असं वाटलं.""पण भाऊसाहेब,हे आतांच जगात एव्हडं अवडंबर कसलं चाललं आहे?" असं मी त्याना विचारल्यावर ते म्हणाले,"तुम्ही फारच चांगला प्रश्न विचारलात. अहो,ह्या जीवनचक्राचा आदर करण्याचा लाभ घ्यायला सर्वच मनुष्यप्राणी तयार असलेला दिसत नाही.उलटपक्षी हा निसर्ग आणि हे विश्व सर्वांचं आहे ही भावना न बाळगता, निसर्गातल्या सोयी ह्या आपल्यापुरत्या गरजा समजून काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहेत.ह्या यंत्रयुगातल्या क्रांतीने जीवन यांत्रींक करून तो एक कारखाना केला आहे.आणि मनुष्याला आवश्यक असलेली मुबलक नैसर्गीक भिन्नभिन्नता पद्धतशीरपणे वाटेला लावली आहे.एकमेकावर अवलंबून असणाऱ्या जीवंत प्राण्यांच्या आवश्यक्यतेची,स्वतःहून केलेली हानी एव्हड्या टोकाला पोहोचवली गेली आहे,की कुठचाच पृथ्वीचा भाग रक्षीत राहिलेला नाही.वातावरणात एव्हडी विषारी टॉक्झीन्स भरमसाट प्रकाराने आपल्या यंत्रसामुग्री बनविण्याच्या हव्यासाने फेकली गेली आहेत की त्याची आता परिसीमा गाठली गेली आहे.त्यामुळे वातावरण धोकादायक शीगेला पोहचलं आहे.त्यामुळे हा वातावरणातला बदल सर्व तऱ्हेच्या जीवनाचं मुलभूत चक्रच बदलून टाकण्याचा इशारा देत आहे, ताकीद देत आहे.आणि त्यामुळे नवीन नैसर्गीक उत्पतीला वेळच मिळेनासा झाला आहे.मी म्हणालो," भाऊसाहेब हे जे तुम्ही मला सांगता, ह्याचे प्राणीमात्रावर नक्कीच दुष्परीणाम झाले असणार हे उघडंच आहे." कपाळावर आठ्या आणत भाऊसाहेब म्हणाले,"काय सांगू तुम्हाला,कॅन्सर झालेला, एखाद्दया डॉक्टरचाच जवळचा नातेवाईक, स्वतः आपल्या रोगाबद्दल अज्ञानात आहे आणि त्या डॉक्टरला मात्र त्याच्या रोगाची जाणीव असल्यानें त्या रोग्याचं कसं होईल याचा प्रश्न पडला आहे तसं ह्या विषयातल्या जाणकाराना पृथ्वीबद्दल वाटत आहे.तुम्हाला मी एकामागून एक विटंबना सांगतो.धृवावरील सर्व पोलर अस्वलांचं राहण्याचं बर्फ वितळत आहे.समुद्रातील कासवांच्या अंड्यांच्या उत्पतीवर गंडांतर आलं आहे.मोठ्या देवमास्यांच्या ठरावीक खाण्यावर संकट आलं आहे. समुद्रातल्या वनस्पतीचा मुळ रंग धुवून गेला आहे.ही थोडी फार उदाहरणं मी तुम्हाला सांगितली.त्याशिवाय वातावरणातल्या होणाऱ्या बदलाने मानवाच्या संस्कृतीवर आणि त्याच्या रहाणीमानावर दुष्परीणाम होत आहेत,इतके की तो आता जणू वातावरणाचा निर्वासीत झाला आहे.ह्या सर्व संकटावर मात करण्यासाठी फारच कमी प्रयत्न केले जात आहेत इतके की आणखी कांही थोड्याच
अवधीत पृथ्वीचं वातावरण संपुर्ण कायमचं बद्लून जाणार आहे.मला काळजी वाटते की,सर्व प्राणी मग ते आमच्या पोरसात असो की जगात आणि कुठे असो मानवाच्या हव्यासामुळे बळी जावूं नयेत."हे सर्व ऐकून मी प्रोफेसरना म्हणालो,"भाऊसाहेब,तुमची मात्र कमाल आहे.एखाद्दया विषयाच्या तुम्ही मागे लागला की पुरंपुर तो विषय तुम्ही पिंजून काढता। आणि इतराना कौशल्याने समजावून सांगता।रुईया कॉलेजचे प्रोफेसर उगीचच झाला नव्हता."भाऊसाहेबांच्या मिष्कील हंसण्यात माझ्या म्हणण्याला दुजोरा मिळाल्याचे पाहून मला बरं वाटलं


श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 11, 2008

मी शिकले माझ्या वडलांकडून

"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या।जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण."
ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते.
मला म्हणाली,
"काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती. मी तुमचे उदाहरण माझ्या वडलाना नेहमी सांगत असायची।मला आठवतं तुम्ही नेहमी म्हणायचा, शरिर हे ही एक यंत्र आहे.कंप्युटर मधे त्याच्या मेमीरीच्या एखाद्दया मेमरी लोकेशन मधे जर बिघाड झाला तर कंप्युटर स्वतःच ते लोकेशन शोधून काढून बायपास करतो.आणि अशा तऱ्हेने आपलं काम अखंड चालू ठेवतो.तसंच काहीसं आपलं शरिर आपल्या व्याधी दुरुस्थ करतो. तरीपण आपण यंत्रालाही विश्रांती देतो,तशी शरिरालापण दिली पाहिजे हे मी माझ्या वडलाना नेहमीच सांगायची.ते
त्यानी कधीच ऐकलं नाही"
मी तिला म्हणालो,
"वृंदा, तू तरी आता तुझ्या प्रकृतीकडे लक्ष देतेस का?"
त्यावर ती म्हणाली,
"सध्या जे देशात वारे आहात आहेत,ते सर्व पश्चिमेकडून येत आहेत. लोकांकडून ज्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यात ज्याला "वर्क एथीक्स" म्हणतात त्याचा पगडा तरुणाबरोबर इतर सर्वांवर पडत आहे. एकदा सकाळी घरातून ऑफिसमधे गेल्यावर घरी परत येण्याची वेळ ठरलेली नसते.कारण काम संपतच नाही.पांच वाजता घड्याळ बघून ऑफिस सोडण्याचे दिवस आता गेले.तसं करणं अगदीच चमत्कारीक वाटतं. माझ्या वडिलानी मला मरमरेसो काम कसं करावं ते शिकवलं.तासनतास काम करणं आणि कामाला वाहून घेणं हे मी त्यांच्याकडून पाहिलं.पण काही गोष्टी त्यानी
मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं ते पण.
माझ्या वडलांचा स्वतःचा बिझीनेस होता.ते स्वतः कंपनीचे मार्केटींग करायचे.बऱ्याच ठिकाणी जावून त्यांच्या येणाऱ्या नव्या प्रॉडक्टबद्दल त्यांना लेक्चर द्दयावं लागायचं।बोलून बोलून खूप थकून जात असत. फिरतीचे काम बरंच असायचं. तशांत त्याना डायबेटीस होता.शिस्तीचे भोक्ते असल्याने शब्द दिल्यावर तो पाळण्याचा पराकाष्टा करायचे.या सर्व कारणानी त्यांना त्यांच्या या वागणूकीची किंमत शेवटी द्दयावी लागली.
ते अठ्ठावन्न वर्षावर निर्वतले.
आता त्याला दहा वर्षे होवून गेली,जेव्हा शेवटी माझे वडील त्या रात्री घरी आले होते.त्यानंतर मी त्यांच्या काम करण्याबद्दल खूप विचार केला.मी माझ्या मनात नक्की ठरवलं,मी धडपडत जिना चढणार नाही.माझा न्युझरिपोर्टरचा जॉब मला खूप आवडला असला तरी,मी मरमरेसो काम करणार नाही.
पण तसं करणं मला अगदीच सोपं झालं नाही.बोलून चालून मी माझ्याच वडीलांची मुलगी होते ना! कॉलेजमधे लायब्ररीचा दरवाजा उघडण्या पुर्वी मी दरवाज्यात उभी असायची.
माझे वडील मला एकदा म्हणाले,"मला कधी कधी चौपाटीवर जावून सूर्यास्थ पहायची इच्छा येते पण कामा मुळे मला तसं अजिबात करता येत नाही।"माझे वडील तसे सर्वपल्ली होत,लिखाण,बुद्धिबळ खेळण्यात वाकबगार होते,त्यांना दिलचस्पी होती,वसंतराव देशपांडे,सुधीर फडके,अरुण दाते यांची गाणी त्याना विशेषकरून आवडायची.म्हणजे ही झाली त्यांच्या आवडीनिवडीची प्रकाश टाकणारी यादी.पण ही यादी संपवून झाल्यावर सूर्यास्थ पहायला चौपाटीवर जायला त्यांना वेळ मिळत नव्हता.मला त्यांच्या ह्या "डेडलाईन" ची संवय लावून घ्यायची नाही.
मग ह्यातून एक प्रश्न उभा राहतो,मी जर पांच वाजता काम उरकून परत येऊन सूर्यास्थ बघायला चौपाटीवर गेले तर त्याचे पडसाद काय होतील.माझ्या करीयरच्या हाईटवर न पोहचण्याचा मी धोका घेते काय? कदाचीत शक्य आहे.पण निदान लवकर गेल्याने,माझ्या मंडळी बरोबर संध्याकाळी जेवण घेता येईल.आणि चौपाटीवर जावून त्यांच्याच बरोबर लांबवणाऱ्या सावल्यातून जाताना भरपूर सूर्यास्थ पहाण्याचा आनंद लुटता येईल.आणि हे नक्कीच काहीतरी मिळाल्याच्या समाधानीला योग्य किंमत
दिल्याचा आनंद होईल तो वेगळाच।


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 9, 2008

वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू

नेत्री माझ्या सामावूनी
वाटे तुला वचन देवू
मनी माझ्या बसवूनी
वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू


नाही कधी अपेक्षली
साऱ्या जगातली खूषी
थरथरत्या ओठानी फक्त
मागितले एक स्मित
वाटे बसवूनी तुला समोर
करावी तुझी खुषामत


नये सुटू साथ तुझी
वाटे तुला शपथ देवू
देवूनी तुला सर्व सुखे
वाटे तुझेच दुःख घेवू
कशा प्रकारे माझी प्रीत
तुझ्यावरती प्रकट करू


मनी माझ्या बसवूनी
वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 8, 2008

संभाळ रे मना

संभाळ रे मना
नाराजून अन नाराजवून
काय मिळणार
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार


परतून ये
दुरावून अन दुरजावून
काय मिळणार
जे तुझ्यात सामावले
त्यावर दया करून
काय मिळणार


जीवनी अपुले मानुनी
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार
ह्या बहरलेल्या फुलांचे
ताटवे करायला
कुणाला हवे असणार


तुला पाहीले तुला इच्छीले
पुजीले तुला ह्या मनाने
क्षणॊ क्षणी प्रथम क्षणी
अपेक्षिले ह्या मनाने
समजून उमजून भोळे होवून
काय मिळणार


खुशी असे ज्यांच्या नशिबी
नशिबवान ते खरेच असती
जे मनात वसती
ते मनस्वी होती


उमेदीशी खेळ करून
भले कसे होणार
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार

रचले मनात जे होते
ते जिव्हेवर आले
जे हरवणे प्राप्त असे
ते गवसून काय होणार


संभाळ रे मना
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 6, 2008

गोव्याची ज्यूली आणि तिची श्रद्धा

" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्याचा आतला गर जास्त आणि त्याची बिज्याला कोकणात कोयरी म्हणतात ती खूप लहान असते,आणि बाहेरची साल अतिशय पातळ असते.हापूस आंब्याचा स्वाद काय विचारता!,कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो.

पण माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी ह्या पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल. ह्या मांडकूर आंब्यासाठी, बांगड्या माशासाठी आणि नागचाफ्याच्या सुगंधाची आठवण येवून मी नेहमी गोव्याला जायला उत्सुक्त असायचो.

माझ्या वहिनीचं माहेरचं घर चिरेबंदी आणि मंगळोरी कौलांच आणि टुमदार होतं.शेजारी एक प्रशस्त चर्च होतं.तसं गोवं सुंदर सुंदर चर्चच्या इमारती बाबत खूप प्रसिद्ध आहे.त्यावेऴच्या पोर्तुगीझ राज्यकर्त्यानी खूप अशी चर्चं बांधली होती.वहिनीच्या शेजारी प्रशस्त झोपडीवजा एक घर होतं.पावलू फर्नांडीस आणि त्याचं कुटूंब त्या घरात राहायचं.पावलूं त्याची बायको मेरीयम,पावलूचे वडील फास्कू,आणि पावलूची दोन मुलं पास्कल आणि ज्युली असं छोटसं हे कुटूंब होतं.कोंबड्याची खूराडं आणि डूक्करांची पिलावळ त्यांच्या आवारात असायची.

आम्ही वहिनी बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की हे सर्व कुटूंब आमच्या सहवासात असायचं.अलिकडे मी खूप दिवसानी गोव्याला गेलो होतो.फास्कू तर केव्हांच निर्वतला होता. पावलू आणि मेरियम बरीच थकली होती. पास्कल गोवा सोडून गेला तो इंग्लंडला स्थाईक झाला होता.ज्युली मात्र लग्न न करताच घरातच होती.ती आता "नन" झाली होती.
मला भेटल्यावर मी तिला सहज विचारलं,
"जुली तू एकदम नन व्हायचं का ठरवलंस?"
मला म्हणाली,
"बाजूच्या चर्चात मी आईवडिलांबरोबर नेहमीच जायची, पास्कल निघून गेल्यावर त्याचं परत येण्याचं चिन्हं काही दिसेना. आईवडिलांकडे कोण बघणार?"
मी ज्युलीला म्हणालो,
"तू लग्न वगैरे काही केलंस का नाही?"
ज्युली जरा हंसतच मला म्हणाली,
"लहानपणी तुला आठवतच असेल,तुम्ही सर्व इथे यायचा,त्यावेळी तू पण आमच्या बरोबर रविवारी चर्चातही यायचास.""मी हिंदू असलो तरी तुमच्या बरोबर चर्चात येवू शकतो का? म्हणून पावलूला विचारलं होतंस.आणि पावलू तुला म्हणाला होता की येशूला सर्व धर्म सारखेच वाटतात. आपण सगळी त्याचीच मुलं.हे ऐकून तुला किती आनंद झाला होता.चर्चात आल्यावर येशूच्या मुर्तीकडे बघून तू किती भावनावश झाला होतास. मला म्हणालास ""ज्युली तू नन का होत नाहीस? ""मला पण नंतर नन व्हावंस वाटलं."

ज्युली पुढे सांगू लागली,
" विश्वास आणि श्रद्धा हे फक्त शब्दच नाहीत.मी मला ख्रिश्चन म्हणणं एक आणि त्यासाठी वाहून घेंणं दुसरी गोष्ट.नन होण्याने मला तसं जगायला मिळालं.’लव्ह दाय नेबर’ असं प्रत्यक्ष येशूने म्हटलंय आणि मी सुरवातीची नन होवून,आईवडील, शेजारी, मुलं पाहून सर्वांवर मनापासून प्रेम करू लागले.मुलान मी शिकवूं लागले.सुरवातीला हे माझं गोतावळ जरा लहान होतं.नंतर मी पेडण्याच्या नेहमीच आरडाओरड,भांडणसांडण, आणि नेहमीच उपासमारीनें पछाडलेल्या झोपडपट्टी परिसरात जणू येशूच्या मनातल्या गहिऱ्या आव्हाहनास दोनहात करण्यासाठी जात राहीले.त्या लोकांची दारूण परिस्थितीत मी पण सामील होण्याचा प्रयत्न करू लागले.रात्रीचे भांडणाचे आवाज,मुलांना हांक मारून आक्रंद करणारे ते आयांचे रडणे,तो होणारा अन्याय पाहून काही तरी करावं असं माझ्या मनात आलं."
मी म्हणालो,
" पावलू सांगत होता की आतां तू चर्चात कमी जातेस म्हणून"
"हो मी त्या चर्चातल्या, जगातल्या पिडीतांसाठी फक्त प्रार्थना करणाऱ्या नन ऐवजी, मी ती प्रार्थना सोडून देवून माझ्या हाताच्या बाह्या वर सरसावून ह्या लोकांसाठी वेळ द्दयायला लागले.आणि आता तर मडगांवच्या फांसावर जाणाऱ्या कैद्दयांच्या सेवेत वाहून घेतलं आहे."
मी म्हणालो,
"कमाल आहे ज्युली तुझी.लहानपणी आपण इकडे असताना असं कधीच विचारात आणलं नाही की कोण पुढल्या आयुष्यात काय करील.खरोखरच तुझं काम वाखाणण्या सारखं आहे."

त्यावर हंसत हंसत ज्युली म्हणाली,
"माझी श्रद्धा आणि माझा ज्यावर विश्वास आहे त्याच गोष्टीवर मी आता माझं लक्ष केंद्रीत करते आहे.येशूचं मोठ्यात मोठ्ठं आव्हान म्हणजे ’शत्रूवरपण प्रेम कर’आणि ह्या फांशीवर जाणाऱ्या कैद्दयात मला माझा शत्रू दिसायला लागला आहे.ज्यांचं पुरनवसन होणारच नाही,असं आपल्या समाजाला वाटतं,आपल्या सुप्रीमकोर्टाने सुद्धा फांशीची शिक्षेस कायद्दयाने मंजूरी दिली आहे.गेली कित्येक वर्षे मी ह्या लोकांच्या सानिध्यात असते.आणि माझ्या समोर सहा मानवाना फांशी दिली आहे.मरण्यापुर्वी मी त्यांना माझ्याकडे पहायला सांगितलं,जणू त्यांना मरणापुर्वी एक प्रेमळ चेहरा लक्षात राहावा. माझा प्रेमळ चेहरा त्यांना समजावत होता की ते आणि आम्ही सर्व केलेल्या कृत्यापेक्षा जास्त किंमतवान आहो."

मी ज्युलीला म्हणालो,
"केव्हडी तुला तू उन्नत करून घेतलीस.कुठून कुठे तू गेलीस."
ज्युली मग म्हणाली,
"पुढे आणखी ऐक,ह्या गुन्हेगारांच्या सहवासात राहून सगळं काही झालं असं नाही.मी त्यांच्या कुटुंबियानापण भेटते.आणि ज्यांचा बळी घेतला गेला त्यांच्या कुटूंबियाना पण भेटते.गुन्हा ज्यांच्यावर झाला त्यांच्या कुटूंबियाना आणि गुन्हा ज्यानी केला त्यांच्या कुटूंबियाना भेटून प्रेम करणं महा कठीण जातं,बरेच वेळा ज्यांची हानी झाली आहे त्यांच्या कुटूंबियाना माझा हा डबल रोल चुकीचा वाटतो.मला ते समजतं पण मी त्या दोघांनाही भेटण्याचा माझा हट्ट सोडला नाही.ज्यांची हानी झाली त्यांच्या कडून मी एक शिकले की त्यांना किती एकटं,एकटं वाटतं.त्यांच्या कुटूंबातल्या एकाचा काही गुन्हा नसताना खून व्हावा हे किती भयंकर आहे, त्यांच दुःख किती खोल आहे,त्यासाठी ते सर्वांपासून दूरच राहतात.परंतु त्यांना पण कुणी तरी भेटावं,त्यांच ऐकावं,त्यांच्या बद्दल काळजी दाखवावी असं सारखं वाटत असावं.एव्हडं करायला मला कसलंच काही ग्रेट केल्यासारखं वाटत नाही."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्यावर ती एव्हडंच म्हणाली,
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे त्यावर मी लक्ष ठेवते."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 4, 2008

नको तू जावू मला विसरून

चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर
नको तू जावू मला विसरून
बहार येई फुलबागेला
भ्रमर गातील तुझ्या गुणांना
येतील कधी एकांती
उदास तुझ्या आठवणी
कधी बहार पाहिली होती
कधी प्रीतही केली होती
येतील अश्रू माझ्या नयनी


चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर


निघून तू जाताना
ने माझ्या सदभावना
कुणाशी असला जरी किंतू
दोष नसे तुझा न माझा
असला तर तो नशिबाचा


होणारी घटना होवून गेली
चूक अशी कुणी न केली
प्रीत माझी रुदन करी
मन माझे आक्रंद करी
चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर
नको तू जावू मला विसरून


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 2, 2008

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे, कुणी तरी म्हटला हा,"सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां."
तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा.
माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे!) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.जर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो! की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.तू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.

बाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)
"आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता,आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.
तू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबा?समजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले?.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां?तो हंसत हंसत म्हणालो, "जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच."४२ वर्षावर तुका नायकाय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी
उडी मारलंस आणि मग टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका? त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.
खूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे?
"देवा असां नको होवू देत रे" असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे!

अरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी,
"त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले,सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते "अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो"

मी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.तू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां.आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय? ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.जया सांगी होती,"फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला."

बाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा."अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है " असा लोक तुका सांगतत असा मी ऐकलां.पण तू तेंच्या नादाक लागू नको. काळजी घे तुझ्या प्रकृतीची.बाबारे, म्हटहा ना "जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे" तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मां?अभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रे?पैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला.
तुका नाय असा वाटणां?हे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय?आतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत. एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.तुझी जया तुझ्या नविन "जलसा" बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली.पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या "प्रतिक्षा" बंगल्याकडे गेलंस.कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रे?पण आचरणात कोण
आणताहा या दिवसात? त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां?पायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, "देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी" तां ऐकून तू किती सद्नदीत
झालंस,आठवतां ना तुका?

एका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना?
"काय आसां तुझ्याकडे?
माझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाडी,नोकर चाकर आसत?
" त्यावर तो तुका सांगता मां,
"माझी आओस आसा माझ्याकडे."
आणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,
"बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस पण माझ्याक्डे आसां."
असां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका?.
आता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.

एखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.माझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.

हेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां? त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां? थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.

तू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा?. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको.
बाबा! मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे!ह्या वयांत "हेल्थ इज वेल्थ " असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय काय?ह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय? माकां सांग.हल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.जां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे?
राजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.तुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच
आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां
" बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी?"
रुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मां?श्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो?

आता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां.आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे!.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे!
दुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय.अशी किती दाखले देवू मी तुका?
कुणी तरी म्हटलां बघ,
" सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बंरा"
होय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा!

.माझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com