Monday, May 26, 2008

सुखाची निवड

“जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.”

शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा व्याधि असूं शकतो हे तिथे कसं कुणाला माहित असावं. मग अशी व्यक्ति जरा विक्षिप्त वागू लागली की त्याला फक्त वेड्यात काढणं ह्याच्या सारखं दुसरं अनुमान असूच शकत नाही ही भावना सर्वांच्या मनात राहिल्यास त्यासाठी कुणाला दोष देणार.मग मृणालीसारख्या चतुर,प्रेमळ मुलीला डॉक्टर रमेश शिरवईकरने समजावून सांगितल्यावर तिच्या उभ्या आयुष्यात परिवर्तन झाल्यास काय नवल.आणि हा योगायोग यायला मृणालिनीचं नशिबच कारण असावं.
डॉक्टर शिरवईकर आणि मृणालिनीचा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत शिरोड्याला गेले होते.त्यावेळी मृणालीच्या मुलाला पाहून डॉक्टर तिच्या भावला म्हणाला ह्या मुलाला Autism चा व्याधि आहे. आणि ही सर्व गोष्ट तिने मला अलिकडेच सांगितली.
मला म्हणाली,
“पुर्वी मी विश्वास करत असायची की अनिश्चीत-भविष्यचक्र माझं भविष्य ठरवित असावं.कधी चांगलं म्हणून तर कधी वाईट म्हणून.मी मला भवितव्याचाच बळी झालेली समजत असे.माझं आयुष्य जणू एक कच्चा दोरा आहे असं संभोधून त्याला माझ्या अनिश्चित जगात मनमानेल तसं गरगर फिरवावा,मोजावा आणि निष्टूर होवून तोडूनही टाकावा.आता मी जरा नव्याने विश्वास करू लागले आहे.मला वाटतं,सुखी असणं ही आपली स्वतःची निवड आहे.
नऊ वर्षापुर्वी माझ्या लक्षात आलं की सुखाची निवड करणं न करणं हे माझ्या ताकदीवर अवलंबून आहे.माझा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर खूपच बडबड करायचा.पण आपल्याच विश्वात असायचा.आजुबाजुचं त्याला कसलंच ध्यान नसायचं.एका जाग्यावर बसायचा नाही.एकडून तिकडे पळत सुटायचा.विनाकारण ओरडायचा.थोडक्यात आजुबाजुच्याला नाही म्हटलं तरी त्रास होईल असं करायचा.शाळेतून त्याच्या बद्दल शिक्षकाच्या खूप तक्रारी यायच्या.
मी हे सर्व बघून पुर्ण गर्भगळीत झाले.सारख्या नकारात्मक भावना माझ्या मनात येऊ लागल्या.दुःख,हतबलता,राग आणि दुसवास ह्या गोष्टी मनात सतत घर करून राहिल्या.त्याचा माझ्या प्रकृतीवर पण दुष्परिणाम होवू लागला.आल्यागेल्याशी माझे संबंध दुरावले.
हळुहळु मला वाटू लागलं,की सुख हे माझ्या नशिबातच नाही.
अशा ह्या माझ्या अत्यंत कठिण प्रसंगी डॉक्टर शिरवईकरानी माझे डोळे उघडले.त्यानी मला एक गिफ्ट दिली.ते एक पुस्तक होतं.मला माझ्या मानसिक धक्क्यातून उत्तेजीत करण्यासाठी त्या पुस्तकात बरंच काही लिहिलं होतं.मला त्यांच खूपच कौतुक वाटल.
मला आठवतं मी खूप सद्गदीत झाले.एखादा पुस्तकातला विषय वाचून झाल्यावर माझ्या विचारात मला मदत करू शकेल असं त्यांना वाटावं ह्याने मी थोडी खजील झाले.मी रात्र जागून ते पुस्तक वाचून काढलं.कसं का होईना त्यांच्या त्या छोट्याश्या कृतीचा आणि अपेक्षा आणि अपेक्षाभंग होण्याबाबतच्या त्या पुस्तकात असलेल्या विषयाबद्दल विचार करून मला नक्कीच वाटलं,की मी माझी परिस्थिती जरी बदलू शकली नाही तरी मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात बदल करू शकते.
कालांतराने मी माझी पुर्वीच्या मनस्थितीला विसरून जाण्याची धडपड करू लागले.कुणाशीही दुसवास करायचं मी सोडून दिलं.आणि मुलाला घरीच शिकवायला लागले. माझ्या मधेच मनःशांति आणण्याचे उपाय मी करू लागले.
आता मला वाटू लागलं की सुख मिळणं दुरापास्थ नाही.आपलं भवितव्य हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे अघटीत घटनेवर नाही.मला आता कळून चुकलं की आपण कसलाच अपराध केला नाही अशी समजूत करून किंवा यातना आपल्याला होणार नाहीत अशी समजूत करून घेवून सुद्धा सुख हे पटकन मिळणारं भाग्य नाही.माझ्या जीवनातल्या अत्यंत कठीण समयामुळे नवा मुद्दा मला दिसू लागला. जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: