Sunday, November 9, 2008

कार्यरत राहिल्याने हिम्म्त येते.

स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं.
“तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?”
ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली,
“माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं. एकाएकी आमच्या सभोवतालचं सर्व विश्वच संभवतःच धोक्याचं झालं होतं.एका रात्रीत आमचं विश्व खेळाच्या मैदानाकडेही खतरनाक जागा आहे अशा दृष्टीने पाहू लागलं.
मला वाढताना माझ्यात बरेचसे प्रतिबंध अणि नियमावलीत बसून वाढावं लागलं.कारण तसं करणं हे माझ्या संरक्षणासाठी होतं असं गृहित धरलं जात होतं.मला एकटिला शाळेतून घरी येता येत नव्हतं.माझ्या मैत्रिणी मात्र बिनदास्त येत असायच्या.
मला शाळेच्या सहलीवर जाता येत नव्हतं.कारण मला काहीतरी झालं तर.?
जशी मी मोठी होत गेले तशी माझी ह्या भितीची यादी मोठी व्हायला लागली.दीर्घ आयुष्यासासाठी माझं सारं जीवनच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्याच पाहिजेत अशा दोन समजूतीत वाटल्या गेल्या होत्या. मला माहित होतं की माझी आई मी सुरक्षीत रहावी म्हणून हे करीत होती.माझ्या भावाच्या जाण्यानंतर मी घरातली एकटीच होती म्हणून हे आई करीत होती ह्याची मला जाणीव होती.आणि मला काहीतरी झालं तर?असा तिच्या मनात प्रश्न यायचा.
त्यामुळेच आता मी स्वाभाविक चिंता करणारी झाली. मला कॅन्सर झाला तर,माझी पर्स हरवली तर,मी कुठच्या गाडी खाली आले तर,माझा जॉब गेला तर,म्हणजेच संकटं लहान मोठी, खरी, काल्पनीक आली तर?
गमंत म्हणजे ही गोष्ट माझ्या जीवनाकडे बघून तुमच्या मुळीच लक्षात येणार नाही.कारण जी गोष्ट मला चिंतेत टाकते किंवा ज्या गोष्टीमुळे मी भितीग्रस्त होते त्याच गोष्टी करण्यात माझ्यावर मी जोर करते.
खरं तर मी माझाच एक नियम बनवला आहे.जर एखादी गोष्ट मला भितीग्रस्त करीत असेल तर मी एकदा करून बघते.माझ्या आईने काळजी केल्या असत्या अशा मी बर्‍याच गोष्टी केल्या आहेत.
आणखी एका गोष्टी बद्दल मी सहसा बोलत नाही.तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे.मी चवदा वर्षाची असताना माझी आई गेली.तिला गाडी खाली अपघात झाला.माझ्या आईचं जाणं आणि माझ्या भावाचं त्या अगोदर जाणं ह्याने मला लटकच करून टाकलं असतं.पण मी माझी आई गेल्यावर एक निश्चय केला होता.एकतर मी उरलेल्या आयुष्यात “सुरक्षीत” रहाण्यात दक्ष राहावं नाहीतर साहसपूर्वक सामना करून संतुष्ट,उत्तेजीत,आणि होय, भयग्रस्त जीवन जगावं.
माझ्या आई बद्दल असं लिहून मी तिच्याशी प्रातारणा करते असं माझ्या मनाला खातं.पण तिच खरी माझ्या जीवनाचा मार्ग दाती होती.आणि सरते शेवटी माझी खात्री आहे की तिला माझा गर्वच वाटला असता.
हिम्मत ही काही माणसाची नैसर्गिक विशेषता नाही.मला वाटतं त्या हिम्मतीसाठी आपल्याला प्रयत्न करायाला हवेत.जणू स्नायु विकसीत करतो तसंच. जेव्हा जेव्हा म्हणून काही गोष्टी करताना मी भयभयीत होते,किंवा मला त्या गोष्टी बेचैन करतात त्यामधूनच माझ्या लक्षात येतं की मला जमणार नाही, ह्या माझ्या समजूती पेक्षा मी काही जास्त करू शकते ही समजूत जास्त महात्वाची वाटायची.
जरी मी माझ्या आईचा सतर्क रहाण्याचा स्वभाव आई कडून घेतला असला, तरी एक माझ्या लक्षात आलं की भय असणं ही खरीच चांगली गोष्ट आहे.जर का आपण तिच्याशी सामना करू शकलो तर?.आणि ह्यावर विश्वास ठेवल्याने माझं विश्व कमी भितीग्रस्त झालं आहे.
मी स्मिताला म्हणालो,
“तुझ्याकडून मी एक शिकलो की तुझ्या मनाला जे योग्य वाटलं ते करण्यासाठी भावनाशील न होता जास्र्त व्यवहारीक काय आहे ह्याच्याकडे तू जास्त लक्ष दिलंस,म्हणून आता तू तुझं विश्व कमी भितीग्रस्त करू शकलीस.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: