Thursday, January 15, 2009

जेव्हा मन आणि हृदय आकर्षित होतं.

“जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो.पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो. असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.”

मनोहर पहिल्या पासून हुषार म्हणून समजला जायचा.त्याच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याचं वागणं जरा जगावेगळं म्हणावं लागेल.पण तसा तो हरहून्नरी होता.चांगली वकिली पास होऊन त्याला कोर्टात प्रॅक्टीस करण्या ऐवजी कंपनीना वकिली सल्ला द्दायला आवडायचं.
अलीकडेच माझ्या एका मित्राने नवीन इलेक्ट्रॉनीक कंपनी स्थापीत केली आणि त्याने मला त्याच्या ऑफिसात बोलावलं होतं.त्याच ऑफिसात माझी आणि मनोहरची गाठ पडली.
“तू इकडे काय करतोस ?”
असा मी त्याला प्रश्न केला.त्यावर तो मला म्हणाला,
“मी तुझ्या ह्या मित्राला वकिली सल्ला देण्यासाठी अधून मधून इकडे येतो.”
मला म्हणाला,
“चल आपण कॅन्टीनमधे जाऊन गप्पा मारूया”
चहा घेता घेता मला त्याने आपली कथा सांगायला सुरवात केली.
मला म्हणाला,
”कुठच्याही गोष्टीचं खरं स्वरूप हे ती गोष्टी किती परिचयाची आहे हे माहित असण्यापेक्षा आपला त्या गोष्टीवर किती भरंवसा आहे ह्या वर आहे.
जितका भरंवसा भक्कम तितकं त्यात माझं आड येणं कमी आणि मी जेव्हडा कमी आड येईन तेव्हडं जीवनात जे काही असेल त्याला मोकळीक जास्त रहाते.
जे नवीन उद्दोग करायला सुरवात करतात त्याना मदत करायच काम मी करतो. त्या पूर्वी जे नवीन कंपनी प्रस्थापित करून त्याची सुरवात करीत अशा लोकाना वकिली सल्ला देण्याची मदत मी करीत असे.त्या कामात चिकटून राहायला खूपच अहंकारी राहवं लागायचं.
पण माझ्या जीवनात एक आश्चर्यजनक घटना घडली.मला एक ठोकर बसली. माझ्या लक्षात आलं की मी जे काम करीत होतो त्या कामात मेंदूला वापरलं जात होतं,मनाला नाही.त्या कामात जोश होता,वेड नव्हतं.त्यामुळे मी खूप नाराज झालो.म्हणून मी त्या कंपनीतून सुटका करून घेऊन दुसरा मार्ग पत्करला.मी ते वेड कुठे हरवलं ते शोधू लागलो.आत्म-संशोधनाच्या ह्या लांब यात्रेवर निघालो आणि अजून त्या वेडाच्या शोधतच आहे.
रचनात्मक काम करण्याच्या क्रियेला मी पुन्हा अंगिकारलं.नवीन उद्दोग स्थापणं आणि काही तरी नावीन्य करणं मला आवडतं.आणि मी ठरवलं की ह्या नवीन उद्दोग स्थापणार्‍याना मदत करून त्यांचच भवितव्य निर्माण करण्याच्या उद्दोगाला लागावं.अर्थात हे एक आव्हान होतं.पण जेव्हा मी माझी फुशारकी कमी करतो तेव्हाच माझ्या चेल्याना वर यायला मी यशस्वी करतो अस मी पाहिलंय.
दिसताना जरी हा छोटासा फरक दिसला तरी एक मोठा दरवाजा उघडून त्यातून सर्व जगच शिरकाव केल्या सारखं आहे. ज्यांच्या बरोबर काम करतो तेच लोक शिरकाव करीत नसून त्यातून माझं कुटूंब,माझे मित्र,एखादी थंड वाराच्या झुळूक किंवा एखादी वीज चमकून पण आत शिरकाव करते. काही ज्ञानी लोक सांगतात की जग हे रिक्त आहे आणि नुसता आकार आहे आणि त्या दोघांच ते मिश्रण आहे.जगाचा आकार आपल्याला आपल्या पाच ज्ञानेंद्रियावरून कळतो- ते संघर्षाचं आणि हालअपेष्टाचं जग.पण रिक्त जग वाटतं तसं नसतं.आपल्या ज्ञानेंद्रियाला ते रिकामं किंवा एक पोकळी सारख वाटतं.पण ही ज्ञानेंद्रिये जेव्हा गडबडून जातात तेव्हा ही पोकळी सहानुभूतीने उजाळून निघते.
सत्यात,आपण ह्या दोन्ही जगात वावरतो.आणि मला वाटतं,की आपल्यात असलेल्या क्षमतेमुळे आणि इच्छाशक्तिमुळे ही दोन जगं आपण एक करून मन आणि हृदय सांधण्याचा प्रयत्नात असतो. ज्यामुळे हे जीवन बहूमूल्य होतं.
जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो. पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो.असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.
ह्यातून मी दिलासा घेतो की आपण आपल्याला बदलू पण शकतो.आत्ता जो मी आहे तो वीस वर्षापूर्वी नव्हतो,गेल्या वर्षी नव्हतो,काल नव्हतो. जोपर्यंत मी उरलेल्या जगाला माझ्या जीवनात सामावून घेतो,आणि माझ्या भरंवशाला माझ्या अनुभवानुसार विकसित करायला देतो,तोपर्यंत हा दिलासा मला उपयोगी होतो.

सध्या मी तुझ्या ह्या मित्राला मदत करतोय ते त्याच्या इलेक्ट्रॉनीक कंपनी स्थापन करण्याच्या प्रयत्नात मदत म्हणून.एकदा तो त्यात सेटल झाला की मी मग ही कंपनी सोडणार.”
हे सर्व ऐकून मी मनोहरला म्हणालो,
“तुझं काही तरी जगावेगळंच असतं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: