Friday, January 23, 2009

हजेरीची ताकद

“हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” काही “करणं” नाही”

“असण्यावर” माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळआलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे कौलं तुटून घरं उजाड झाली होती.त्यादिवसात कोकणात नाही तिकडची गरबी असायची. असा निसर्गाचा कोप झाल्यावर जास्तीत जास्त हाल होतात ते गरिबांचे.स्थाईक कार्यकरत्यानी अपंगाना,वृद्धाना,आणि लहान मुलांना एका मोठ्या माल ठेवण्याच्य वखारीत आणून संरक्षण दिलं होतं.नुकसानीच्या आठवणीने लोक भयभयीत झाले होते.त्यांना कुणाची तरी आस्थापूर्वक चौकशीची जरूरी होती.गावातल्या इतर लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती.
मानसिक धक्क्यातून त्याना सावरण्याची जरूरी होती.बेळगावहून माझे दोन मित्र मुद्दाम मदतीला आले होते.त्यातला एक मनोविज्ञानीक होता.
बर्‍याच दिवसानी त्याची आणि माझी गाठ पडली.मी त्याला त्या वादळातल्या दिवसाची आठवण करून दिली.ते लक्षात आणून तो म्हणाला,
“त्या वखारीत जमलेल्या लोकाना आम्ही “मानसिक प्रथोमोपचार ” देण्यासाठी आलो होतो.अशावेळी थोडक्यात समजावून सांगून पेशंटना मानसिक तणावाच्या प्रक्रियेबद्दल शिक्षीत करण्याचं आणि ज्याना त्या उपचाराची जरूरी आहे त्यांचं परिक्षण करून त्यांच्यावर उपचार करण्याचं जे काय असेल ते शिक्षण घेऊन सुद्धा अचानाक माझ्या मनात केवळ आपल्या “असण्या”च्या ताकदीने उपचार होऊ शकतो त्याचं महत्व लक्षात आलं.
ज्यावेळी आम्ही वखारीच्या दरवाज्यातून आत शिरत होतो,त्यावेळेला ज्या पहिल्या व्यक्तीशी आमची गाठ पडली ती व्यक्ती कृतज्ञतेच्या उत्साहाने भरभरून आमच्या स्वागताला आली.मला धन्य वाटलं पण काहिसा मी मला अपराधी समजून गेलो.कारण अजून लोकांवर आम्ही खराच काही उपचार केला नव्हता.
हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” ते काही “करणं” नाही.ज्या शिष्टतेत “असण्याला” इतकं महत्व नसतं जितकं “करण्याला” प्राथमिकता दिली जाते.तरी पण खर हजर असणं किंवा कुणालाही आपलं अस्तित्व भासणं ही एक मूक ताकद बरोबर घेऊन उचित साक्षीची स्विकृती झाल्यासारखी वाटते.कुणाचं तरी भावनीक ओझं घेऊन गेल्यासारखं,किंवा उपचाराची प्रक्रिया केल्यासारखं वाटतं. त्यात कुणाशी तरी घनिष्ट नातं असून कदाचीत जो समाज शिघ्रतापूर्वक नातं जुळविण्याच्या प्रयासात असतो त्या समाजाला हे नातं क्वचितच भासलं जातं.
प्रथमच,मी एकदा काही वर्षापूर्वी नकळत हजर राहण्याच्या प्रक्रियेत ओढला गेलो होतो.माझ्या एका मित्राची आई अचानक निर्वतली.ज्या दवाखान्यात ती गेली होती तिकडून मला फोन आला.माझं एक मन ताबडतोब तिकडे जाण्याचं सांगत होतं, पण एक मन सांगत होतं,की त्या मित्राच्या अत्याधिक आणि अगदी वयक्तीक दुःखात जाऊ नये म्हणून.माझं मन द्विधा झालं.माझ्या एका मित्राने त्यावेळी सल्ला दिला की “तू जा,तू तिथे हजर रहा.मी तसंच केलं.आणि मला त्याचा कधीच पश्चाताप होणार नाही.
त्या विधायक क्षणानंतर मी कुणाच्याही प्रसंगाला हजर राहायला जरी माझ्याकडून काही”करणं” झालं नाही तरी जाण्याची काचकूच केली नाही.
काही मित्रांबरोबर एका व्यक्तिच्या अगदी बिछान्याजवळ बसून होतो.त्याला त्याच्या दुखण्यात प्रचंड वेदना येत असल्याने त्या येऊ नयेत म्हणून मॉरफीन दिलं होतं. त्याला जाग आल्यावर आम्ही त्याच्याशी त्याच्या जीवनात होऊ घातलेल्या अनिर्वाय यात्रेची माहिती त्याला समजूत घालून सांगत होतो. त्याने नंतर तो जरा बरा झाल्यावर आपल्या आईवडीलाना सांगितलं की आमच्या निव्वळ हजेरीचा त्याला आधार वाटला.
मी माझ्याकडून उपचार करून घेणार्‍या आजार्‍याबरोबर हजर राहण्या पलिकडे कार्यान्वीत असतो.पण जवळ “असण्या” च्या उपचाराच्या क्षमतेबद्दल आणि त्या आजार्‍याला वाटणार्‍या आपल्या अस्तित्वाच्या जागृतते बद्दल प्रभावित असतो.खरं म्हणजे अशा स्थितीत कुणीही एकटं नसतं.
हजर रहाण्यातली क्षमता म्हणजे एक मार्गी रस्ता नव्हे.नुसतंच आपण दुसर्‍याला काही देत नसतो. तर ह्याने माझ्यात नेहमीच बदलाव होतो आणि तो पण आणखी चांगलं होण्यात, हा दुसरा मार्ग.”
हे सर्व माझा हा मनोविज्ञानीक मित्र लक्षात आणून आणून सांगत होता ते ऐकून मला त्या वादळाची राहून राहून आठवण आली.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: