नसे उमेद आता कसली
नशिबी माझ्या येवून
का जाशी मला तूं सोडून
प्रीति जर प्रीतिच नसेल
तर समोर माझ्या येवून
संबंध प्रीतिचे देशी तोडून
मानतो मनात तू माझी
असेल का माझ्या नशिबी
होण्या तुझाच मी सर्वस्वी
विसरून जाईन मी
क्षण जीवनातले
करीत असता प्रीति
ते क्षण आनंदलेले
विसरून जाईन मी
क्षण मनातले
असता मी उच्छृंखल
ते क्षण बहरलेले
असे हीच माझ्या
मनाची खंत
हे दुःखच माझे
करील शेवटी अंत
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment