Wednesday, April 30, 2008

आता कशाला उद्दयाची बात

आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
"आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: