दिवस उजाडूनी होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
त्याही पेक्षा ती रात्र बरी
उजळणी होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची
उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी
श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment