Saturday, December 20, 2008

मनुष्याची प्रतिष्ठा.

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपलासर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

आज माझी आणि प्रो.देसायांची भेट त्यांच्या घरीच झाली.काल त्यानी मला निरोप पाठवून तळ्यावर भेटण्या ऐवजी,घरीच या असं कळवलं होतं.मी पृच्छा केल्यावर तुम्हाला उद्दां ते इकडे आल्यावरच कळेल असं म्हणाले.मी त्यांच्या घरी गेल्यावर दहा पंधरा पुरूष,स्त्रीया खाली बैठक मारून बसलेल्या दिसल्या.मला प्रथम वाटलं काही तरी गाण्याचा कार्यक्रम असावा.पण आत गेल्यावर तबला,पेटी काही दिसली नाही.दोन खुर्च्या भिंतीजवळ ठेवलेल्या होत्या.एका खुर्चीवर भाऊसाहेब बसले होते. आणि एकावर एक तरूण तरतरीत उंच नीमगोरा गृहस्थ बसलेला दिसला.मला हाताने खुणवून भाऊसाहेबानी खाली बसायला सांगितलं.
त्या तरूण माणसाची ओळख देत प्रो.देसाई म्हणाले,
“हे गंगाधर परब,पीएचडी असून आपल्याच कॉलेजात फेलो म्हणून आले आहेत. मीच त्यांना मुद्दाम इकडे बोलावून एखाद्दा विषयावर बोलायला विनंती केली.आज ते “मनुष्याची प्रतिष्ठा” ह्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.ते आपण ऐकूया.”
असं बोलून झाल्यावर डॉ.परब बोलू लागले,

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपला सर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

मी जे म्हणतो त्यावर माझा विचारपूर्ण विश्वास आहे म्हणून.आणि त्यात पण मला संदेहही वाटतो.मला संदेह असण्याचं कारण मी अजून तरूण आहे म्हणून. आणि तरूणात अचूकता असते,हे विधान अविवेकपूर्ण आणि अशोभनीय ठरेल. आणि माझ्या ह्या वयावर, मला वाटतं,आपल्या श्रद्धेवरच्या निश्चीततेचं समर्थन करणं आणि तो विचार मजबूत आहे असं म्हणणं बरोबर होणार नाही.
अशी माझी समजूत असणं,हे एका अर्थी बरं आहे.कारण मी संशयवादी आहे.मला वाटतं माणसाचा विश्वास सतर्क्ततापूरक असावा,व तो त्याने जपून जपून सांभाळावा. त्याने त्याची प्रचिती अनुभवाशी पडताळून पहावी,आणि ती श्रद्धा त्याला घृणित, महागडी किंवा जटिल वाटली तर त्या श्रद्धेचा त्याने उघड उघड त्याग करावा.
पूर्वी म्हटल्या प्रमाणे मी तरूण आहे.जास्त शांत आणि कमी बेचैन जग, माझ्या पुढची पिढी जशी मागे वळून बघेल तसंमला मागे वळून दिसणार नाही.जेव्हडी म्हणून माझी आठवण जाईल तेव्हडं आठवल्यास,माझं जग जसं आहे तसं आपण सर्व पहात आलो आहे तसंच आहे.असं जग की जीथे युद्ध खेळली जातात आणी जीथे डोक्यावर सदैव युद्धाचा भयभयीतपणा आहे. असं जग की जे असाधारण गतीने पुढे जात आहे,आणि त्यात असाधारण बदलाव होत आहेत.असं जग की जीथे सर्व घटनेतली असाधारण घटना म्हणजे आपल्यात असलेली अक्षमता, आपल्यात असलेली सामाजीक विकासाची कमतरता,आपलं अज्ञान,आणि अमानुष विध्वंस करण्याची आपल्यात असलेली ताकद आणि ह्या सर्वांची आपल्याला झालेली धक्कादायक अनुभूती.

हे जग जरी जंगलासारखं वाटत नसेल,तरी प्रत्यक्षात एखादं नेहमीच काळंकुट्ट आणि नेहमी भितीदायक जंगल असतं तसं आहे.फार काळ होऊन जाई तो-मला सांगायला खेद वाटतो- आपल्यातले जे काही जगतील त्यांच्या आठवणीत राहील तो स्थिरतेचा काळ, स्विकारलेली मुल्यं,आणि स्विकारलेली शांतता.आणि असं असून हे सर्व होत असताना,ही निर्दयतेची आणि भयाची अवस्था कायम स्वरूपाची असेल आणि हे एव्हडंच मनुष्यप्राणी जास्तीत जास्त गाठू शकेल असं मी मानायच्या तयारीत नाही. जसं आता मी सांगतो तसं त्यावेळीही आग्रहाने सांगेन, की मनुष्यात उच्च पातळी गाठण्याची क्षमता आहे पणह्या क्षमतेचा प्रयत्न तो अत्यंत मंदगतीने आणि अनंत चूका करून नंतर ह्या अंधारातून सीमापार होण्यात ती क्षमता वापरील. कारण माझा मानवजातीवर भरवंसा आहे.

माझा हा भरवंसा काहीसा इतिहासावर आधारित आहे.मनुष्य हाच माझा जास्त आधार आहे.कधीतरी इतराशी व्यवहारीक संबंध येत असताना काही गंमतीदार प्रसंग घडतात.जे काहीसं माझ्या विचाराच्या पलिकडचं होतं.अचानक एखाद्दाला निरखून पहाताना धक्कादायक गोष्ट म्हणजे मी मलाच त्याच्यात पहातो.अर्थात हे क्वचितच होतं.कारण असं हे फक्त अपघाताने किंवा अतिदुःखाच्यावेळी किंवा अत्यानंदाच्यावेळी होत असावं.बहुतांशी माणूस स्वतःहून असा दुसर्‍यासारखा होत नाही.त्या क्षणात मी जर का त्याच्याकडे बघायचं धारिष्ट केलं तर त्याच्यात माझ्याच इच्छा,माझ्याच सुप्त श्रद्धा,मला हवी असलेली प्रेमाची जरूरी, माझं आंतरीक गांभिर्य आणि माझ्या इच्छा-आकांक्षा त्याच्यात पहात असतो.हा क्षण जणू एखाद्दा कोळोख्या खोलीत मी बसलोय आणि एकाएकी डोळे दिपवणारा प्रकाश पडावा आणि सगळी खोली लख्ख प्रकाशात दिसावी तसा वाटतो.
हे सर्व झाल्यावर काही काळ एक प्रकारचं दडपण माझ्या डोळ्यावर येऊन त्या खोलीचा आकार,त्यातली चमकदार विशिष्ठता, आणि सुस्पष्ठ रंग मला दिसतात. त्या क्षणात मनुष्याची प्रतिष्ठा जास्त प्रकर्शाने दिसते.
शेवटी,मला सांगायचं आहे की मी मुलांचा समर्थक आहे.मला मुलं आवडतात. कारण माझा समझ असा आहे की मुलं अजून त्यांची मानवता, शब्दांचा आणि रिति-रिवाजाचा आधार घेवून त्याचं संरक्षण करणं,एकाकी आशंकेत आणि संदेहात राहणं अशा गोष्ठींचा आधार घेऊन लपवायला शिकली नसावीत. ही मानवता त्या मुलांकडे आहे हे पाहून बरं वाटतं कारण ते उघड दृश्य आहे. मानवजातीला ते वरदान आहे.”
डॉ.परबांची बोलण्याची लकब आणि त्यांना जे काय वाटतं ते अस्खलीतपणे सांगण्याचं कसब पाहून आम्ही जमलेले बरेच जण प्रभावीत झालो.ह्या तरूण माणसाला आपलं भवितव्य गाजवता येईल असं मला वाटलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: