Wednesday, October 15, 2008

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास

मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याल जोडून ठेवीत असतं.
मी एकदा व्हि.जे.टि.आय.कॉलेज मधे माझ्या एका पूर्वीच्या सहकार्‍याला भेटायला म्हणून गेलो होतो.तो सिव्हिल इंजीनियरींग डिपार्टमेन्ट मधे प्राध्यापक म्हणून काम करीत होता.त्याने मला तिकडेच रमेश चव्हाण नावाच्या त्याच्या एका सहकार्‍याशी ओळख करून दिली.तो सध्या ओरिसा मधे पाण्याचे बांध तयार करण्याच्या प्रोजेक्ट मधे काम करीत होता.

त्याला पाहिल्यावर मला ह्या व्यक्तिला कुठेतरी पाहिल्याचा भास होऊ लागला.
मी त्याला म्हणालो,
“तुम्हाला पूर्वी मी कुठेतरी पाहिल्याचं आठवतं.”
तो चटकन म्हणाला,
“तुम्ही कदाचीत माझ्या पेटीवादनाच्या कार्यक्रमाला आलेले असाल.”
असं म्हणताच माझ्या चटकन लक्शात आलं.
मी त्यांना म्हणालो,
“तुम्ही सिव्हील इंजिनीयर असाल हे मला माहित नव्हतं”
नंतर बोलता बोलता तो सांगू लागला,
”माझ्या नेहमीच्या जीवनात मी एक सिव्हील इंजिनीयर आहे.माझ्या क्युबिकलमधे कार्यरत होऊन समाधानकारक आणि सुखकर जीवन जगत आहे.पण माझ्या इतर जीवनात,मी माझ्या बाजापेटीवर बसून गोविंदराव पटवर्धन,पु.ल.देशपांडे,पुर्षोत्तम वालावलकर यांच्या प्रतिभाशाली पेटीवादनाला अभ्यासण्याचा प्रयत्न करीत असतो.माझ्या इंजिनीयरींग डिग्रीसाठी अभ्यास करीत असताना, एका संगीताच्या वाद्दाची निर्मिती करणार्‍या कारखान्यात हिशोब लिहिण्याचं पार्टटाईम काम करीत असायचो.तिथेच एकदा एका कोपर्‍यात ठेवलेल्या बाजापेटीला पाहून मला ती सहजच वाजवावयाची एक हूक्कीच आली समजा.
“उगीच का कांता,गांजीता” हे पु.लं.च आळवून आळवून वाजवलेलं गाणं मी वाजवीत होतो.बाहेरून येणार्‍या जाणार्‍या माणसाच्या कानावर तो स्फूर्तिदायक,आकर्षून घेणारा ताल आणि सुसंगता कानी पडल्याने बरीच गर्दी जमा झाली होती.
काही लोक दुकानात येऊन मालकाकडे विचारपूस करू लागले.मला येऊन विचारणा झाली की मी हे कुठे वाजवायला शिकलो?मला आणखी काही गाणी वाजवायची फर्माईश द्दायला लागले.गेली कित्येक वर्षे मी माझ्या इंजीनियरींग व्यवसायात गुरफटून घेतल्याने माझं हे संगीतातलं जीवन वाया जावू दिलं होत.पण माझा जेव्हा जेव्हा इतरांच्या रचनात्मक जीवनाशी सामना व्हायचा तेव्हा तेव्हा मला ह्याचं स्मरण व्हायचं.

एकदा मी अशाच पेटी वादनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.आणि एक व्यक्ति पु.लं.च ते “रविवारची सकाळ” याकार्यक्र्मात,”चंद्रिका ही जणू”नंतर “मला मदन भासे” नंतर “माडीवरी चल ग सखे”ही गाणी एकामागून एक वाजवलेली ऐकूनमाझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले.ते अतिशय सुमधूर,काळजाला भिडणारं वाजवणं होतं.माझ्या नंतर लक्षात आलं की ही पेटी वाजवणारी व्यक्ति माझ्याच बरोबर कित्येक वर्षापूर्वी एका पाण्याचा मोठा बांध तयार करण्याच्या प्रोजेक्टमधे कामाला होती.
मी त्याला असा तसाच समजून गेलो होतो.आणि माझ्या बरोबरचे इतर लोकही असंच त्याच्याकडे पहात होते असं मला वाटतं.ज्यामुळे मी मला माझ्या व्यवसायात संपूर्ण खपून गेलो होतो,आणि दुसरं काही करायला असमर्थ झालो होतो,त्यामुळे मला वाटत होतं की असं मरमरेसो काम करणारे पण असंच माझ्यासारखं जीवन जगत असावेत.परंतु,त्या माझ्या सहकर्‍याने माझ्या सुप्त प्रतिभेला जागृत केलं.

मी नंतर पेटीवर रियाज करायला लागलो.एका प्रेरणा देणार्‍या गुरू कडून शिकवणी घ्यायला लागलो.ते प्रत्येक आठवड्याला,माझी चांचणी घेऊन,दर वेळेला आणखी प्रगती करून घेऊन माझं वाजवणं वरच्या पातळीला आणून घेत होते.मला एका कार्यक्रमात वाजवायची संधी पण त्यांनी दिली.लोक माझं वाजवणं मन लावून ऐकत आणि मला ऐकणार्‍यांच्या चेहर्‍यात आनंद दिसायचा आणि कधी कधी वाहवा मिळायची.

मी विचार केला,मी एव्हडे बांध तयार करण्यात इतराना माझं सहकार्य देण्यात आयुष्य घातलं तरी कुणी माझी अशी वाहवाकेली नाही.
म्हणून मी म्हणतो,
आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं, आपल्यात परिवर्तनहोत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याला जोडून ठेवीत असतं.
हे सगळं बोलून झाल्यावर त्याने मला लवकरच होणार्‍या त्याच्या एका प्रोगरामला येण्याचा आग्रह केला.माझी मलाच गम्मत वाटली की मी कोणत्या कामाला आलो होतो आणि काय घडायचं होतं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: