जहाली असता अर्धी रात्र
निःशब्द होता सारा परिसर
दाहलेल्या मनाची ऐका
रंजलेली ही नीतिकथा
धुमसलेले उश्वास येती वणव्यातून
चांदण्या सांगती डोळे मिचकावून
लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून
सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून
चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल
नसे तसे काही जाहले त्या धरतीवर
गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर
घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर
सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला
जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला
सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला
अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment