Wednesday, March 4, 2009

आठवतो तो क्षण अजूनी मला

नसेल भेटता आले मला
नसेल बोलाविले मी तुला
दूरी अपुल्या प्रीति मधली
मिटवू न शकली तुला मला

आठवतो तो क्षण अजूनी मला
जेव्हा भेटलो मी तुला
एक इशारा होऊन गेला
हात मिळाले शब्द दिला
पहाता पहाता दिन संपला
त्या समयाची स्मृति अजूनी
जाईन कशी मी विसरूनी

का ठाऊक होते मिळालो
आपण त्या दुराव्यासाठी
नशिब अपुले बनले होते
बिघडण्यासाठी
प्रीतिची फूलबाग बनली होती
उजाडण्यासाठी
गेली उजाडून अशी ती
पुन्हा न बनण्य़ासाठी

स्मृती राहूनी जाई समय निघून जाई
फूल फूलून राही अन मग कोमेजून जाई
सर्व निघून जाती अन वेदना चिकटून राही
कलंकीत केलेस जे तू मला
कसे विस्मराया सांगू हृदयाला
आठवतो तो क्षण अजूनी मला
जेव्हा भेटलो मी तुला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: