Thursday, March 12, 2009

तात्यांची व्यथा

तात्यांच्या वेबसाईटवर अलिकडे खूपच सभासदत्व वाढलं आहे.इतकं म्हणाल तर तोबा तोबा.
तात्यानी रोपटं लावलं आणि त्याचा प्रचंड वटवृक्ष झाला.आता वटवृक्ष झाल्यावर मैना,साळूंकी कोकिळे बरोबर गिधाडं आनि घुबडं पण त्या वटवृक्षावर येऊन बसायला लागली.
तात्यांची व्यथा होती की ह्या गिधाडांना आणि घुबडांना मज्जाव कसा करायचा.
तात्या म्हणाले,
"ओळख द्दा आणि सभासद व्हा" असा नियम करावा असा विचार येतो.
नेहमी प्रमाणे लागलीच तात्यांच्या विचारावर आपला विचार वाचक देऊं लागले.
कुणी म्हणालं,
"विचार आवडला"
कुणी म्हणालं,
"आम्ही ओळख दिली आणि मग आम्हीच लफड्यात्त आलो तर?"
तर कुणी म्हणालं,
"बंदी घाला"
तर आणखी कुणी म्हणालं,
"लोकशाहीत बंदी घालणं योग्य नाही.येऊ देत त्यांना"

कुणी असं करा म्हणालं तर कुणी तसं करा म्हणालं.
मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे तात्यांना कवितेतून माझा विचार दिला.
कवितेचं शिर्षक होतं.

तात्यांची व्यथा

लाविले तात्यानी एक रोपटे
वटवृक्ष कधी झाला न कळे
किलबिल करती अनेक पक्षी
संख्या सभासदांची आहे साक्षी

गिधाडे,घुबडे अन कावळे
कोकिळा, साळूंकी अन बगळे
विश्राम करीती मिळून सगळे

बोलले तात्या त्या वडाला
पाहूनी तुला झालास मोठाला
करू का मज्जाव यापुढे गिधाडाला
दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला

स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला

कवितावाचून तात्या म्हणाले,
"सामंतकाकांची कविता लै भारी!"



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: