Monday, November 16, 2009

हा तर आहे तराना प्रीतिचा

(अनुवादीत. एक प्यार का नगमा है…..)



खरंतर प्रत्येकाचं जीवन हे एक कथाच असते.सागरातून येणार्‍या लाटेसारखा जीवन एक प्रवाह असतो.दोन पळ जीवनातून थोडं आयुष्य चोरी केल्यासारखं असतं.येणं आणि नंतर जाणं हा जीवनाचा आशय असतो.



हा तर आहे तराना प्रीतिचा
अन प्रवाह चंचल लहरीचा
काय म्हणू मी जीवनाला
आलेख तर हा अपुल्या कथेचा

मिळवूनी हरवते हरवूनी मिळते
जीवनाचा आशय येण जाणे असते
दोन पळ जीवनाची एक चोरी वाटते
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते

तू प्रवाह नदीचा मी तुझा किनारा
सहारा तू माझा अन मी तुझा सहारा
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

तूफान येईल आणि येऊन ही जाईल
मेघ येईल क्षणभर आच्छादून जाईल
सांवट येऊन जाते निशाणी कायम रहाते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

जो देई मनाला दिलासा तो आयुध हाती घेई
प्राण जाण्यापूर्वी तो आक्रंद करीत राही
खुशीची अभिलाषा रहाते अश्रूंची धार वाहते
सांवट येऊन जाते निशानी कायम रहाते





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com