Tuesday, January 18, 2011

व्रण

“जेव्हडे म्हणून माझ्यावर व्रण आहेत ते माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे मी भोवलेले आहेत.”

मला माझ्या लहानपणी नेहमीच वाटायचं की,माझी मुलं त्यांच्या बालपणाचं आकलन,त्यांच्या जवळ किती खेळणी होती,ह्यावरून नकरता त्यांच्या अंगावर किती व्रण मोजता येतील यावरून करतील.मला व्रणाबद्दल विशेष वाटतं. व्रणावरून माझ्या मनुष्यपणाचं लक्षण अजमावलं जातं,कारण प्रत्येक व्रणाला स्वतःचा म्हणून एक इतिहास आहे. मग तो व्रण किती लहान का असेना,विषयवस्तु म्हणून तो लक्षात येतो.मुख्य कारण म्हणजे प्रत्येक व्रणाने
मला काहीना काही धडा शिकवला आहे.उदाहरण सांगायचं झाल्यास,एखादी वस्तु फारच गरम असताना त्याला स्पर्श करायचा नाही,तसंच एखादी वस्तु धारदार असल्यास तीला उघड्या हाताने हाताळायचं नाही.
प्रत्येक व्रण माझ्या कडून झालेल्या चूकीची दूरवर आठवण करून देतो.खरंच माझ्यावर खूपच व्रण आहेत.

ह्यातल्या काही चूकावरून मी शिकलो आहे,आणि काहीवरून अजीबात शिकलेलो नाही.काही गोष्टी आपण करतो आणि करतच रहातो. उदा.अनवहाणी-उघड्या पायाने-अणकुचीदार वस्तुवरून चालणं.
जेव्हडे म्हणून माझ्यावर व्रण आहेत ते माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे मी भोवलेले आहेत.
कधीही मी कोकणात गेलो की माझ्या आजोळी जावून आल्याशिवाय रहात नाही.आणि मग रेडीच्या चौपाटीवर गेल्या शिवाय सोडत नाही.रेडी गावात चौपाटीला लागून असलेल्या एखाद्या होटेलात दोन दिवसासाठी खोली घेऊन रहातो.समुद्राचं मला खूपच आकर्षण आहे.ऐन भरतीच्यावेळी फेसाळलेल्या लाटा फुटतानाचं दृश्य किनार्‍यावर उभा राहून मी तासनतास न्याहळत असतो.अशावेळी कानावर आपटणार्‍या ,फोफावलेल्या वार्‍याचा आवाज मला वेडं
करून सोडतो.दूरवरून दिसणार्‍या एकामागून एक येणार्‍या लाटा प्रथम पाण्यावर हेलकावे खात येत असतात. त्यातली सर्वांत पुढची लाट वार्‍याकडून कवटाळली गेली की ती फुटलीच म्हणून समजा.कवटाळलेल्या लाटेतलं पाणी किती वळकट्या घालतं त्यावर तिला फुटून किती फेस निर्माण व्हावा हे अवलंबून असतं.हे झालं भरतीच्या वेळी.

ओहोटी असली की पाणी चौपाटीपासून इतकं आत गेलेलं असतं की एरव्ही कधीच न दिसणारी खडकं दिसायला लागतात.नदीला जसा अचानक पूर-फ्लॅश फ्लड-येतो तसा समुद्राला ओहोटी आल्यावर अचानक भरती येत नाही. मधे बरेच तास निघून जावे लागतात.त्यामुळे ओहोटीच्यावेळी खडकांपर्यंत समुद्राच्या पोटात बिनदास चालत जावं.

एक दिवशी असंच झालं.रेडीला माझा मुक्काम असताना, चौपाटीवर फिरायला गेलो होतो.ओहोटी येऊन बराच वेळ निघून गेला असावा.आणि भरतीला सुरवात होऊन थोडावेळ झाला होता.दूरवरची खडकं दि़सत होती.काही खडकांवर पाणी आदळत होतं.कडक रखरखीत उन्हाचा तो दिवस होता. खडकावर उभं राहून मासे गळ लावून पकडण्याचं उत्तम वातावरण होतं.मी मासे पकडण्यासाठी गळ घेऊन गेलो होतो.एका उंच खडकाला आपटून लाटा फुटत होत्या. त्याच खडकावर उभं राहून पहावं म्हणून त्या खडकापर्यंत गेलो.ही पहिली चूक केली. दुसरी चूक म्हणजे खडकावर चढून वर जाण्यापूर्वी पायातले बूट काढून घेतले.
खडकावर चढून गेल्यावर एका धारदार जागी माझा पाय पडला.समुद्राच्या पाण्याच्या सततच्या मार्‍याने ही खडकाची जागा घासून घासून धारदार झाली असावी.

खार्‍यापाण्यामुळे माझ्या तळव्याला चूरचूरायला लागलं.मी खडकावरून खाली वाळूत उतरलो.मागे किनार्‍यावर चालत चालत येताना मागे वळून पहात होतो.वाळूत रक्ताची धार दिसत नव्हती.पण नंतर जखमेत वाळू शिरल्यामुळे रक्त यायचं बंद झालं होतं.पण मला तो पाय वापरून चालणं कठीण व्हायला लागलं.किनार्‍यावरचं माझं होटेल अर्ध्या मैलाच्या आत असल्याने लंगडत चालायला मला कठीण झालं नाही.

अभिमानने सांगावसं वाटतं,पहिली गोष्ट म्हणजे,पंधरा,वीस मिनिटांच्या लंगडत चालण्याने मी एकदाचा माझ्या खोलीत पोहोचलो.आणि अभिमानाने सांगावसं अशीच दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक व्रणाची खूण माझ्या तळव्यावर आहे हे शेखी मिरवून सांगता आलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com