Wednesday, October 13, 2010

कल्पना वागळेंचं कुतूहल.

माझा मित्र मला कल्पना वागळेंच्या नृत्याला एकदा घेऊन गेला होता.मी ह्या बाईंचं नांव पूर्वी ऐकलं होतं.पण त्यादिवशी प्रत्यक्षात माझी आणि त्यांची भेट झाली.माझा मित्र त्याला कारण झाला.
मला त्यांचं नृत्य पहाताना, ह्या बाईंना आपल्या नृत्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगायचं आहे हे प्रकर्शाने जाणवत होतं.शहरात ह्यांचे बरेच ठिकाणी क्लासीस आहेत.आणि विद्यार्थीनींची बरीच गर्दी असते असं माझा मित्र मला सांगत होता.असं त्यांच्या शिकवण्यात आणि नृत्यात विशेष काय आहे ? हे समजण्याचं मला कुतूहल होतं.

माझ्या मित्राबरोबरच मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो.मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी त्यांना म्हणालो,
“एव्हडी मंडळी आपल्याकडे नृत्य शिकायला येतात त्याचं गुपीत काय आहे.?”
मला वागळेबाई म्हणाल्या,
“कुतूहल”
“प्रत्येक माणसात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं कुतूहल असतं त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला वाटतं कुतूहल ठेवून जगण्याने अविष्कार आणि अनुकंपा निर्माण होत असते.माझा,संप्रदायावर किंवा सामाजावर, विश्वास आहे. मला वाटतं,अविष्कार आणि अनुकंपा निर्माण करण्याच्या सवयीने समाजाला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं जातं. तसंच मला वाटतं,जीवंत कला निर्माण केल्याने ही कुतूहलता विकसित होत असते,आणि त्याचं परिणामस्वरूप समाज मजबूत करण्यात होतं.म्हणूनच मी वचनबद्धता बाळगून माझ्यात ह्या जीवंत कलेची दिलचस्पी ठेवते आणि त्यामुळे ती माझ्यात आणि इतरात कुतूहल पैदा करते,आणि ज्या जगात आपण रहातो त्यात आपल्यात असलेल्या वचनबद्धतेला बळकटी आणली जाते.”

कल्पनाबाईंचं हे स्पष्टीकरण ऐकून मलाही त्यांचं जरा कौतूक वाटलं.इकडे तिकडे थोडंसं नाचायला आल्यावर किंवा एखाद्या हिंदी सिनेमात “आयटेम गर्ल” म्हणून नाचायला मोका मिळाल्यावर प्रसिद्धीच्या बळावर क्लासीस काढून बरेच जण पैसा कमवायचं हे एक साधन म्हणून धंदा करताना मी पाहिले आहेत.
म्हणून मी त्यांना म्हणालो,
“अगदी लहानपणापासून तुम्ही नृत्य करता का?”

“जरी अगदी माझ्या लहानपणापासून,मला हालचाल करायला यायला आल्यापासून, मी नाच करायला शिकले,तरी मधे माझ्या नृत्यात थोडा खंड पडला. मला बराच मोठा आजार आला होता.पण त्यातून मी बचावले.”
असं म्हणून वागळेबाई सांगायला लागल्या,
“त्यानंतर,परत नाच करायला सुरवात केल्यापासून मी नृत्यात नावीन्य पाहू लागले. मी शीघ्रनृत्यात डुबून गेले असं म्हटलं तरी चालेल.पण त्यासाठी, काहीतरी निर्माण करण्याची वचन बद्धता,मुक्त पसंती आणि रसिकता,तसंच उल्हासपूर्वक अनुकूलता असण्याची जरूरी आहे असं मला वाटायला लागलं.
मला असंही वाटायला लागलंय की शीघ्रता हे रंजनता,प्रामाणिकता आणि अचंबा वाटून घेण्याचं एक साधन आहे.मी सत्यतेची सतत पाठीराखीण आहे.आणि त्याचं मुख्य कारण मी मला स्वतःलाच ओळखून आहे.हाता-पायाच्या हालचाली शिवाय,शरीराच्या मुद्रासह इतर वाद्यांच्या संगतीत अगदी प्रामाणिक आणि साहसिकतेने झालेले हावभाव पाहून,मानवतेच्या कक्षा उघड्याकरून,विस्मयकारीक अपरिचित असलेली एकमेकातली नाती जोडली जातात अशी माझी धारणा आहे.”

खरोखरच नृत्यकलेचा मुलभूत अभ्यास करून,त्या विषयावर गाढं प्रेम करून,तसं करीत असताना त्यात आपल्याकडून काही भर टाकून ती कला विकसित करायचा,त्याचा प्रसार करायचा हा त्यांचा उद्योग बघून,मलाही वाटलं की त्यामुळेच ह्यांच्या क्लासला गर्दी होत असावी.
म्हणून मी त्यांना विचारलं,
“कशा प्रकारच्या स्टूंडंटसना आपण आपल्या क्लासात प्रवेश देता?”
मला म्हणाल्या,
“माझ्याकडे अगदी दर्जेदार नृत्य शिकायला येणार्‍यांची रीघ लागलेली असते.सुरवातीला काहीजण नृत्यात उत्सुकता दाखवतात. पण त्यातले किती टिकून रहातात सांगता येत नाही.पण मी त्याचा विचार करीत नाही. नृत्यावर मनापासून प्रेम करणारे कष्ट घ्यायला हीचकीच करीत नाहीत.असलेच स्टूडंट मला आवडतात.”
असं म्हणून वागळेबाई पुढे सांगू लागल्या,
“कुतूहल, प्रखर करून माझ्या मेंदूत गच्च बसावं अशी एखादी पद्धत विकसनशील करून घ्यायला मी बांधली गेली आहे असं मी मला नेहमीच समजते.आणि हे घडल्यावर आपल्या जवळची अंतरप्रेरणा आणि त्याचा असर त्याच क्षणी एक साथ राहावी याची मी अपेक्षा करते.असं झाल्यावर जोखिम घेण्यासाठी आणि सत्यता पाळण्यासाठी आपलं शरीर आणि सभोवताल तयार होण्यात मदत होईल असं मला खात्रीपूर्वक वाटतं.
सहानभूतिशील कुतूहलाची जोरदार ताकद असल्यावर आपल्यात नम्रपणा येऊन, आपण आदरपूर्वक राहून मनात येणार्‍या आकांक्षा ओळखून घेण्याच्या प्रयत्नात रहातो.”

मला वागळेबाईंचा विचार आवडला मी त्यांना म्हणालो,
“जीवन जगताना वाटेत आपल्याला येणार्‍या अपयशांची कदर केली पाहिजे,तसंच आपणाकडून घेतल्या जाणार्‍या परिश्रमांचाही आदर ठेवला गेला पाहिजे. नृत्याबरोबर तुमचं नातं, तुम्हाला तुमच्यात असलेल्या माणूसकीला, तुमच्याकडून कुतूहल काय ते समजून घ्यायला आव्हान देत असल्याने ते करीत असताना जेव्हडं जमेल तेव्हडं ह्या कलेत सहभागी व्ह्यायला त्यांना आवडलं पाहिजे.”

माझी ही टिप्पणी ऐकून बाईंना खूप बरं वाटलं असं मला दिसलं.
मला म्हणाल्या,
“अलीकडे मला अगदी स्पष्ट व्हायला लागलं आहे की माझी माझ्या नृत्याशी असलेली बांधिलकी नृत्यकलेत येणार्‍या बदलांशी शीघ्र न राहिल्यास, त्याची लोकांशी संबंध न ठेवण्यात परिणीती होऊन माझ्यात आणि माझ्या कलेत बाधा येऊ शकते. अधुनमधून जरी मला माझ्या नृत्यात आणि माझ्या जीवनात येणार्‍या बदलावाशी तत्पर रहाण्यात आणि त्यामुळे येणार्‍या जोखिमेशी तयार रहाण्यात हार होत असल्यासारखं वाटत असलं तरी नृत्यात असलेल्या प्रभावाची किंमत माहित झाली आहे.कारण सरतेशेवटी लोकांशी सहभाग असावा ह्यालाच मी जास्त महत्व देते.”

वागळेबाईंचा प्रामाणिकपणा मला खूपच आवडला.मी त्यांना शेवटी म्हणालो,
तुमच्याशी नृत्याविषयी चर्चा करून मला काहीतरी मिळवल्यासारखं मनापासून वाटतं.
“कस्चं कस्चं”
म्हणत त्यांनी मला कॉफी पिऊन जाण्याचा आग्रह केला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com