Wednesday, June 29, 2011

टरबूजाची गोष्ट.



“आजुबाजूच्या जगातलं, जसं त्यांना साध्या गोष्टीतून, आनंद आणि सौन्दर्य सापडायचं तसंच ते वर आकाशाकडे बघून सौन्दर्य-करत्या विधात्याचा गौरवही करायचे.”

ज्यांना टरबु्ज-कुणी खरबूजही म्हणतात-खूप आवडायचं,”माझा साष्टांग नमस्कार तुला” ही त्यानीच रचलेल्या कवितेची ओळ म्हणायला आवडायचं,आणि शहरात वकीलीचं शिक्षण घेतलं असल्याने,सुधारलेला पेहराव म्हणून पॅन्ट नेसायला आवडायचं,पॅन्ट त्यांच्या पोटावरच्या बेंबीच्यावर सहाईंच ओढून नेसायचे,त्या माझ्या निर्वतलेल्या आजोबांना नेहमीच वाटणार्‍या आनंदाविषयी मला विशेष वाटायचं.

माझे आजोबा पंचाण्ण्व वर्षं जगले.खायला,गायला आणि पॅन्ट वर ओढून नेसायला त्यांना भरपूर आयुष्य मिळालं.तरीसुद्धा जांभळ्या रंगाची पॅन्ट ते एंशी वयाचे होई तोपर्यंत वापरत नसायचे.आणि त्यानंतर त्यांच्या जांभळ्या रंगाच्याच दोन पॅन्ट्स नेसायला असायच्या.तोपर्यंत,माझी आई सांगायची,
“ते भारी झकपक,फॅशनेबल पोषाख करणारे होते.”
तिला हे माहित असायचं.
“तात्या आजगावकर” माझ्या आईचे वडील.माझे आजोबा.
जेवढा काळ मी त्यांच्या सहवासात होतो, जीवनावर प्रेम कसं करायचं आणि जीवन मजेत कसं जगायचं, हे इतर कुणाहीपेक्षा मला त्यांनी शिकवलं.

त्यांच्या उतार वयात,तात्या आजगांवकर गावातल्या आठवड्याच्या बाजारात जाण्यात विशेष आवड दाखवण्यापेक्षा ते काही वस्तु घेण्यात जास्त आवड दाखवायचे.काहीही वस्तु घेऊ देत,तात्या आजगावकर, न चुकता टरबूज घेऊन यायचे.ह्या लक्षणीय गोष्टीत ते मश्गुल व्हायचे हे पाहून आजुबाजूच्याना, जरा विलक्षण वाटायचं.जास्तीत जास्त लोक सांगायचे की त्यांना असं कधीही टरबूज सापडलं नाही की ते त्यांना आवडलं नाही.प्रत्येक नवं टरबूज त्यांना पहिल्यापेक्षा जास्त चवदार वाटायचं.एखादा शक्की म्हणेल की हे अशक्य आहे.एकदातरी सर्वात उत्तम चवदार टरबूज मिळून गेल्यावर नंतरचं खचीतच कमी चवदार निघावं.पण हे खरं नाही.

तात्या आजगावकरना खरोखरंच प्रत्यक्ष टरबूज जास्त भावायचं असं नाही,फक्त ते चवदार एव्हड्यासाठीच वाटायचं कारण ते खाताना त्यांची मनोभावना तशी असायची.त्यांना ते चांगलंच असायला हवं होतं,आणि ते चांगलंच असणार असं ते स्वतःला सांगत असावेत.असं करण्यामुळेच ते स्वतःची खात्री करायचे की ते चवदारच असणार.प्रत्येक बाबतीत त्यातलं सौन्दर्य पहाण्याच्या इच्छेमुळे माझे आजोबा, तात्या आजगावकर,जमेल तेव्हडं शोधून पहाण्यासारखं मजेदार जीवन जगले.

तात्या आजगावकरांच्या जीवनातल्या आनंदाचा आणि दिलाश्याचा आणखी एक उगम म्हणजे, देवाला ते आपल्याच लिहिलेल्या गीतातून गाऊन दाखवायचे.
“हे ब्रम्हांडकरत्या,किती असशी तू महान”
प्रार्थनेचे शब्द साधे आणि सूंदर होते.

“हे विधात्या,ब्रम्हांडकरत्या
किती असशी तू महान
अद्भूत चमत्कार करून
घडविलेस विश्व दोन्ही करातून
आकाश, सूर्य,चंद्र, तारे निर्मून
वीजा चमकवून अन गडगडून
दाविशी तव शक्ती विश्वाला
माझा साष्टांग नमस्कार तुला”

माझ्या आजोबाना,तात्या आजगांवकराना,ईश्वराच्या गौरवातून आनंद मिळायचा.जरी जीवन कष्टप्राय असलं तरी त्यांचा मुक्तिदाता,त्यांचा त्राता त्यांच्याबरोबर तिथेच असायचा.तात्या आजगावकर ही वास्तविकता लक्षात ठेवून असायचे.
हे त्यांनीच लिहिलेलं गीत तात्या आजगावकरांचं जीवन आणि वारसा प्रतिबिंबित करायचं.
आजुबाजूच्या जगातलं, जसं त्यांना साध्या गोष्टीतून, आनंद आणि सौन्दर्य सापडायचं तसंच ते वर आकाशाकडे बघून सौन्दर्य-करत्या विधात्याचा गौरवही करायचे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com